शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देशातील अंतर्गत अर्थव्यवस्थेच्या सक्षमतेसाठी मुद्र्रा लोन योजना

By admin | Updated: September 20, 2016 00:38 IST

बुलतेदार आणि कारागिरांच्या कला उपजत असतात. त्यांना कला कुणी शिकवाव्या लागत नाहीत.

केंद्रीय वित्त राज्यमंत्री : अर्थसहाय्यात बँकांची टाळाटाळ नकोचंद्रपूर : बुलतेदार आणि कारागिरांच्या कला उपजत असतात. त्यांना कला कुणी शिकवाव्या लागत नाहीत. मात्र योग्य अर्थसहय्याअभावी ते व्यवसायात मागे पडतात. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून देशाची अंतर्गत अर्थव्यवस्था सक्षम करण्ळासाठी पंतप्रधान मुद्रा योजना आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी ही योजना प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी केले आहे.स्थानिक चांदा क्लब मैदानावर सोमवारी रोजगार व स्वयं रोजगार संकल्प, राष्ट्रीयकृत बँका व विविध शासकीय संस्थांच्या सहकार्याने पंतप्रधान मुद्रा लोन योजनाचा लोन मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर होते. प्रमुख पाहुणे राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे, महापौर राखी कंचलार्वार, आमदार नाना शामकुळे, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, माजी मंत्री संजय देवतळे, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, माजी आमदार जैनुद्दीन जवेरी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, विजय राऊत आदी मंचावर उपस्थित होते.यावेळी बोलताना ना. अर्जुनराम मेघवाल म्हणाले, देशात वित्तीय साक्षरता हळूहळू पुढे सरकत आहे. चंद्रपुरातील या मेळाव्यामुळे आपल्या वित्त विभागाचे काम सोपे झाले आहे, अशा शब्दात त्यांनी या मेळाव्याच्या यशस्वीतेचे कौतूक केले. ते पुढे म्हणाले, व्यवसायासाठी गरजुंना कर्ज देणाऱ्या बँकांचा सन्मान करा, कर्ज देण्यात टाळाटाळ करणाऱ्यांची दखल घ्या. गरीब माणसे कर्ज वेळेवर फेडतात, याची हमी पंतप्रधानांनी घेतली आहे. त्यामुळे पारंपारिक व्यावसायिकांना कर्ज देताना जामीनदाराची गरज भासणार नाही.या योजनेअंतर्गत देशात आजवर पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या एक कोटी १६ लाख लोकांना ४५ हजार ५१४ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. पंतप्रधान मुद्रा लोन योजनेत कृषी कर्जाचा समावेश करण्यात आला असून भविष्यात शहरी जनतेलाही सहभागी केले जाईल.अध्यक्षीय भाषणात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्वकांशी योजना आहे. सर्वसामान्य, कष्टकारी जनतेची गरज ओळखून ही योजना सुरू केली आहे. योजनेचा लाभ पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या सर्व जनतेला व्हावा असे त्यांचे स्वप्न आहे. अधिकाधिक गरजुंना बॅकांच्या सहाय्याने कर्ज मंजूर करुन त्याची पुर्तता करा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हातील २४ बँकांनी सहा हजार ४९१ गरजु लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले. त्यात चार हजार ३३४ शिशु लोन, एक हजार ७७८ लोकांना किशोर लोन तर ३७८ लोकांना तरूण लोन दिल्याची माहिती त्यांनी दिली.प्रारंभी दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते पारंपारिक व्यवसायिकांना कर्जाचे धनादेश वितरित करण्यात आहे. खा. विकास महात्मे व महापौर राखी कंचलार्वार यांचीे समयोचीत भाषणे झालीत.मेळाव्यात विविध राष्ट्रीयकृत २४ बँकांनी स्टॉल लावले होते. पारंपारिक व्यावसायीकांकडून येथे अर्ज भरुन घेण्यात आले. विविध बॅकांच्या अधिकाऱ्यांनी कर्ज घेण्यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन केले.प्रस्ताविक आ. नाना शामकुळे यांनी केले, तर आभार राजेश मुन यांनी मानले. संचालन नासीर खान यांनी केले. पारंपारिक व्यवसायिक कारागिर, सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थी महिला व्यवसायिकांची लक्षणिय उपस्थिती होती. (जिल्हा प्रतिनिधी)