शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

मानधन वाटपात अनियमितता

By admin | Updated: May 9, 2014 02:47 IST

तळोधी(बा.) : लोकसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक कार्यप्रणालीत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही त्यांचे मानधन देण्यात आले नाही.

तळोधी(बा.) : लोकसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक कार्यप्रणालीत सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांना अद्यापही त्यांचे मानधन देण्यात आले नाही. प्रक्रीया ओटपताच, प्रशासनाने या कर्मचार्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. प्रक्रीयेदरम्यान वरिष्ठांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक, मतदान केंद्रावर असणारी गैरसोय, कामाचा मोबदला म्हणून मिळणार्‍या मानधनात असणारी तफावत यामुळे शिक्षकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. चिमूर- गडचिरोली लोकसभा मतदार क्षेत्राअंतर्गत चिमूर क्षेत्रात नियुक्त कर्मचार्‍यांचे पहिले प्रशिक्षण चिमूर येथे पार पडले. परंतु यावेळी कर्मचार्‍यांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात आले नाही. शिक्षकांना फक्त उपस्थित राहण्याकरीताच बोलाविले होते. तेथे कोणत्याच कामाचे व्यवस्थापन करण्यात आले नव्हते. याच भागातील कर्मचार्‍यांना दुसर्‍या प्रशिक्षणासाठी ब्रह्मपुरी येथे पाठविण्यात आले होते. प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक व व्यवस्था अगदी उत्तम होती. परंतु ९ एप्रिलला संबंधित कर्मचार्‍यांपैकी राखीव कर्मचार्‍यांना अनुपस्थित कर्मचार्‍यांच्या जागी नियुक्त करताना निवडणूक अधिकार्‍यांनी उपस्थित कर्मचार्‍यांचा केलेला पानऊतारा अद्यापही शिक्षक विसरले नाहीत.

मतदान केंद्राची व्यवस्था करणारे महसूल विभागाचे कर्मचारी मतदान केंद्रावर उपस्थित नव्हते. मतदान केंद्रावरील अपुरी सुविधा गंभीरपणे विचारात घेतल्याच गेली नाही. कित्येक केंद्रावर विजेची व्यवस्था नसल्यामुळे कर्मचार्‍यांना मेनबतीच्या प्रकाशात काम करावे लागले. रात्र जागून काढून मतदानाची प्रक्रिया पार पाडावी लागल्याची व्यथा संंबंधित कर्मचार्‍यांनी ‘लोकमत’ ला सांगितली. इतकेच नव्हते तर अनेक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचारी मतदान केंद्राध्यक्ष तर मुख्याध्यापक मतदान अधिकारी या पदावर काम करताना पहायला मिळाले. ब्रह्मपुरी विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये निवडणूक कामाच्या मानधन वाटपातसुद्धा मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येत आहे. त्यामुळे या कामाच्या मूल्यांकनाची प्रक्रिया काय आहे.

याविषयी कर्मचार्‍यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. यापूर्वी कर्मचार्‍यांचे मानधन हे त्याच्या मूळ पगाराच्या वेतनानुसार दिले जायचे. त्यामध्ये थोडीफार तफावत मान्य केली जात होती. परंतु या वेळच्या निवडणूक प्रक्रियेत एकाच शाळेतील एकाच पदावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मिळालेल्या मानधनात तफावत आढळून आली. इतकेच नव्हे तर अनेक मतदार केंद्रातील केंद्राध्यक्षांना मिळालेले मानधन त्याच केंद्रावरील कर्मचार्‍यांना मिळालेल्या मानधनापेक्षा कमी मिळाले, तर शेवटच्या क्रमांकावरील कर्मचार्‍याला सर्वात अधिक मानधन मिळाल्याची माहिती अनेकांनी दिली. या सर्व प्रकारामुळे मानधन वाटपात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील कर्मचार्‍यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. त्यामुळे ज्या कर्मचार्‍यांना कमी मानधन मिळाले. त्यांना त्यांच्या कार्यालयात उर्वरित मानधन वाढविण्याची व्यवस्था विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील निवडणूक अधिकार्‍यांनी करावी, अशी मागणी निवडणुकीचे काम करणार्‍या शिक्षकांनी केली आहे.(वार्ताहर)