शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
3
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
4
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
5
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
6
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
7
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
8
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
9
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
10
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
11
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
12
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
13
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
14
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
15
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
16
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
17
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
19
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
20
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

मोदींचे सरकार मूठभर लोकांसाठी - राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 16:35 IST

देशात सत्तेवर असलेले नरेंद्र मोदींचे सरकार १५/२० लोकांसाठीच काम करीत आहे. लोकांच्या खिशातून पैसे काढून अमीर लोकांच्या घरात भरत आहे अशी घणाघाती टीका भा.रा.काँ.चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी नांदेड (चंद्रपूर) येथे सरकारवर केली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या प्रश्नांना दिली उत्तरे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशात सत्तेवर असलेले नरेंद्र मोदींचे सरकार १५/२० लोकांसाठीच काम करीत आहे. सामान्य जनतेशी मोदी सरकारला काहीही देणेघेणे नाही. हे सरकार लोकांच्या खिशातून पैसे काढून  अमीर लोकांच्या घरात भरत आहे अशी घणाघाती टीका भा.रा.काँ.चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी नांदेड (चंद्रपूर ) येथे सरकारवर केली.प्रसिद्ध धानसंशोधक दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राहुल गांधी चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेड येथे आले होते. दादाजींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यांनंतर राहुल गांधीनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मंचावर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहन प्रकाश, अशोक गहलोत, प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे, ब्रम्हपुरीचे आमदार व प्रदेश उपाध्यक्ष विजय वडेट्टीवार, प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले, नांदेडच्या सरपंच दुर्गा कामडी व दादाजी खोब्रागडे यांचा मुलगा व सून उपस्थित होते.सरकारवर हल्ला चढवतांना राहुल गांधी म्हणाले की,कोणत्याही नेत्याचे काम रस्ता दाखविण्याचे असते पण मोदी नुसते खोटे बोलण्यात व्यस्त आहेत. हे आता लोकांच्या लक्षात आहे म्हणूनच शेतकरी व युवकांचा या सरकारवरील विश्वास उडाला आहे. नीरव मोदी, विजय मल्ल्या यांना मोदी सरकारने मदत केली यांनी किती लोकांना रोजगार दिला. अशीच मदत दादाजी खोब्रागडे यांच्यासारख्या शेतकऱ्यांना मिळाली असती तर त्यांनी ५० हजार लोकांना रोजगार दिला असता असेही राहुल गांधी यांनी सागर खोब्रागडे यांनी विचारलेल्या प्रश्नादरम्यान सांगितले .रामकृष्ण देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नावर राहुल म्हणाले की, शेतकरी संकटात आहे. तो घाबरला आहे.शेतकऱ्यांना हिंमत देणे गरजेचे आहे. दादाजींच्याबद्दल मला माहिती मिळाली. मला गरिबांबद्दल कळवळा आहे म्हणून मी येथे आलो. आमचे सरकार सत्तेवर येताच पंजाब, कर्नाटक मधील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. पण केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेवर असलेले सरकार उद्योगपतींचे सरकार आहे. ते शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार नाही असेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले .मोदींची मार्केटिंग १५/२० करतात. या लोकांना मोदींनी सांगितले होते की मी सत्तेवर आलो तर मी तुम्हाला कर्जमुक्त करेल.  हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार नाही. दादाजी खोब्रागडे यांच्यासाठी हे सरकार नाही असेही राहुल यांनी अमिषा रोकडे या महिला शेतकऱ्याच्या प्रश्नावर सांगितले .यावेळी प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांचेही थोडक्यात मार्गदर्शन झाले. यावेळी मंचावर आमदार यशोमती ठाकूर , माजी खासदार नरेश पुगलीया, मारोतराव कोवासे, माजी आमदार अविनाश वारजूकर, आनंदराव गेडाम, अतुल लोंढे, जि.प.चे माजी अध्यक्ष सतिश वारजूकर, ब्लाक काँग्रेस कमेटी अध्यक्ष प्रफुल खापर्डे , पंजाबराव गावंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले तर संचालन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केले.

 

 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी