शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

मोदी लाटेसोबत पक्षातील विरोधकांचा वडेट्टीवारांना फटका

By admin | Updated: May 17, 2014 00:07 IST

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातून डॉ. नामदेव उसेंडी यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर होताच, अगदी सहज वाटणारी निवडणूक काँग्रेस मोठय़ा मताधिक्याने हरली.

घनश्याम नवघडे - चंद्रपूर

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातून डॉ. नामदेव उसेंडी यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर होताच, अगदी सहज वाटणारी निवडणूक काँग्रेस मोठय़ा मताधिक्याने हरली. यामागे मोदी लाट हे प्रमुख कारण असले तरी या क्षेत्रातील प्रमुख नेत्यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर काढलेला राग असेच या पराभवाचे वर्णन करता येईल.

मागील लोकसभा निवडणुकीत आमदार विजय वडेट्टीवार यांनी मारोतराव कोवासे यांना तिकीट मिळवून देण्यापासून तर त्यांना विजयी करण्यापर्यंत मोलाची भूमिका पार पाडली. पण निवडून आल्यानंतर काही दिवसातच कोवासे आणि वडेट्टीवार यांच्यातील सख्य संपले आणि कोवासे एकाकी पडले. मतदारांशी त्यांचा संपर्कच तुटला. ज्या गतीने कोवासे यांचा मतदारांशी संपर्क संपला, त्याच गतीने कोवासे यांच्या लोकप्रियतेत घट होत गेली. एक वेळ अशी आली की, काँग्रेसने कोणीही उमेदवार दिला तरी चालेल पण कोवासे नको, असे मतदार उघडपणे बोलायला लागले.

मतदारांच्या या नाराजीचा कानोसा घेत आमदार विजय वडेट्टीवार यांनी खासदार कोवासे यांच्या विरोधात उघड भूमिका घेवून गडचिरोलीचे युवा आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या उमेदवारीसाठी आकाशपाताळ एक केले. उसेंडी हे कसे वरचढ उमेदवार ठरू शकतात, हेसुद्धा पक्षश्रेष्ठींना पटवून देण्यात वडेट्टीवार यशस्वी झाले आणि आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांना गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राची काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होताच, काँग्रेसला ही निवडणूक सहज वाटत होती. एक युवा आणि उच्च विद्याविभूषित, इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषांवर सारखेच प्रभूत्व असलेला, लोकसभेत या भागाचे प्रश्न मांडू शकणारा उमेदवार म्हणून सामान्य मतदारांनीही डॉ. उसेंडी यांच्या उमेदवारीचे स्वागत केले. एवढेच नाही तर उसेंडी यांच्या उमेदवारीने भाजपमध्ये चांगलीच धडकी भरली होती.

परिस्थिती अनुकूल असतानाही डॉ. नामदेव उसेंडी यांचे प्रमुख कारण मोदी लाट हे सांगता येईल. कोणी कितीही नाकारले तरी संपूर्ण मतदार संघात मोदींची एक सुप्त लाट दिसत होती. एकदा मोदीचा अनुभव घ्यायला काय हरकत आहे, असे प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर मतदार बोलू लागले.

डॉ. नामदेव उसेंडी यांच्या पराभवामागे हे प्रमुख कारण तर आहेच; पण चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी संपूर्ण निवडणूक अंगावर घेतल्याने डॉ. उसेंडी यांचा विजय झाला तर विजय वडेट्टीवार यांचे राजकीय वजन चांगलेच वधारेल, असा ग्रह त्यांच्या राजकीय विरोधकांनी करून घेतला.

गेल्या पाच वर्षात दिल्ली मुंबईच्या राजकीय वतरुळात ज्या गतीने वडेट्टीवार यांनी आपले स्थान निर्माण केले त्याच गतीने या क्षेत्रात त्यांचे राजकीय शत्रूही तयार झालेत. हे कारण सुद्धा उसेंडी यांच्या पराभवाला तेवढेच पोषक ठरले, अशी चर्चा आता ऐकायला मिळत आहे.