शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जिल्ह्याच्या आराखड्यासाठी आधुनिक नियोजन भवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:01 IST

जिल्ह्यासाठी जिल्ह्याच्या नियोजन भवनाचे वेगळेच महत्त्व असते. जिल्ह्याच्या नियोजन विभागाचे जिल्ह्याच्या प्रगतीत अमूल्य असे स्थान असते. खासदार, आमदार यांची कामे असोत अथवा जिल्ह्याच्या एकूणच विभागाच्या बैठकांना जिल्हा प्रशासनात महत्त्व असते. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निर्माण केलेले नियोजन भवन महाराष्टष्ट्रामध्ये एक देखणी वास्तू म्हणून पुढे आले आहे.

ठळक मुद्देशासकीय कार्यालये होताहेत आधुनिक : भवनातून होतो विकासकामांचा पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना हायटेक करण्याचे काम सध्या झपाट्याने सुरू आहे. देशासाठी संसदेचे, राज्यासाठी विधिमंडळाचे, तसेच जिल्ह्यासाठी जिल्ह्याच्या नियोजन भवनाचे वेगळेच महत्त्व असते. जिल्ह्याच्या नियोजन विभागाचे जिल्ह्याच्या प्रगतीत अमूल्य असे स्थान असते. खासदार, आमदार यांची कामे असोत अथवा जिल्ह्याच्या एकूणच विभागाच्या बैठकांना जिल्हा प्रशासनात महत्त्व असते. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निर्माण केलेले नियोजन भवन महाराष्टष्ट्रामध्ये एक देखणी वास्तू म्हणून पुढे आले आहे.देशामध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या राज्यांच्या विधिमंडळाच्या सभागृहाला शोभेल, अशा पद्धतीची मांडणी या सभागृहाची करण्यात आली आहे. अर्धवर्तुळाकार असणारे हे सभागृह अत्याधुनिक संवाद साधनांनी परिपूर्ण आहे. या सभागृहाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही भागात सभागृहात बसले असल्यास थेट डायसशी आपला संपर्क येतो. या ठिकाणची असणारी दृकश्राव्य माध्यमांची आखणी या सभागृहाच्या वैभवात भर टाकते. बोलणाºया प्रत्येकांची छबी डायसच्या मागील स्क्रिमवर उमटेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये नियोजन विभाग, मानव विकास विभाग, चांदा ते बांदा, पालकमंत्री महोदयांचे संपर्क कार्यालय अशा महत्त्वपूर्ण कार्यालयाचीदेखील रचना करण्यात आली आहे. ७ कोटी २० लाख तरतुदीच्या दोन मजली इमारतीला आतील अर्धवर्तुळाकार बैठक व्यवस्था वेगळेपण देते. या सभागृहात ३०३ व्यक्तिंना बसण्याची क्षमता आहे. याच नियोजन भवनातून जिल्ह्यात होणाऱ्या विविध कामांचा व प्रस्तावित कामांचा मागोवा घेत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. याशिवाय शासकीय इमारतींनाही हायटेक करण्याचे काम जोमाने सुरू आहे. मूल व पोंभूर्णा येथे नवीन प्रशासकीय भवन बांधण्यात आले. या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालये सध्या कार्यरत आहेत. अनेक नवीन आरोग्य केंद्रांना इमारतींसाठी निधी मंजूर झाला आहे.पोलीस ठाण्याचे रुपडे पालटलेजिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांचा चेहरामोहरा आता बदलला आहे. बल्लारपूर व भद्रावती महाराष्टष्ट्रातील उत्तम पोलीस स्टेशनची वास्तू म्हणून गणल्या गेल्या आहेत. बल्लारपूर व भद्रावती या पोलीस ठाण्याला सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल आयएसओ मानांकन मिळाले आहे. २०१८ मध्ये दोन्हीही पोलीस स्टेशनचे लोकार्पण करण्यात आले. बल्लारपूर हे शहर गोंड राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हा इतिहास प्रथमदर्शी दिसावा, अशी देखणी किल्लासदृश वास्तू बल्लारपूर पोलीस ठाण्याची झाली आहे. एखाद्या अभेद्य किल्ल्याप्रमाणे हे पोलीस ठाणे जुन्या पोलीस ठाण्याच्या जागेवरच उभे राहिले आहे. पोलिसांच्या दृष्टीने आवश्यक असणाºया सर्व सोयीसुविधांची उपलब्धता या इमारतीमध्ये करण्यात आली आहे. या लोकार्पणानंतर काही महिन्यांतच या पोलीस स्टेशनला आयएसओ मानांकन मिळाले आहे. भद्रावती येथील पोलीस ठाणेदेखील अद्ययावत करण्यात आले आहे. बल्लारपूर व मूल या ठिकाणी पोलीस दलांच्या निवासासाठी उभारण्यात आलेले संकुलदेखील उच्च दर्जाचे आहे.जिल्ह्यातील विविध विकासकामांचा पाठपुरावा करणारे एखादे स्वतंत्र कार्यालय असावे, असे आपणाला वाटले. जिल्ह्याच्या नियोजन विभागाचे जिल्ह्याच्या प्रगतित अमूल्य असे स्थान असते. खासदार व आमदार यांची कामे असोत वा जिल्ह्याच्या एकूणच विभागाच्या बैठकांना जिल्हा प्रशासनात महत्त्व असते. मात्र चंद्रपुरात असे नियोजन भवन नव्हते. त्यामुळे चंद्रपुरात भव्य व देखणे नियोजन भवन शासनाच्या माध्यमातून उभारले. ही इमारत नजरेत भरते. राज्यातील एक देखणी वास्तू म्हणून आता ते चर्चेला आले आहे.-सुधीर मुनगंटीवार, अर्थ, नियोजन व वनमंत्री, महाराष्ट्र शासन.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार