शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

जिल्ह्याच्या आराखड्यासाठी आधुनिक नियोजन भवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:01 IST

जिल्ह्यासाठी जिल्ह्याच्या नियोजन भवनाचे वेगळेच महत्त्व असते. जिल्ह्याच्या नियोजन विभागाचे जिल्ह्याच्या प्रगतीत अमूल्य असे स्थान असते. खासदार, आमदार यांची कामे असोत अथवा जिल्ह्याच्या एकूणच विभागाच्या बैठकांना जिल्हा प्रशासनात महत्त्व असते. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निर्माण केलेले नियोजन भवन महाराष्टष्ट्रामध्ये एक देखणी वास्तू म्हणून पुढे आले आहे.

ठळक मुद्देशासकीय कार्यालये होताहेत आधुनिक : भवनातून होतो विकासकामांचा पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना हायटेक करण्याचे काम सध्या झपाट्याने सुरू आहे. देशासाठी संसदेचे, राज्यासाठी विधिमंडळाचे, तसेच जिल्ह्यासाठी जिल्ह्याच्या नियोजन भवनाचे वेगळेच महत्त्व असते. जिल्ह्याच्या नियोजन विभागाचे जिल्ह्याच्या प्रगतीत अमूल्य असे स्थान असते. खासदार, आमदार यांची कामे असोत अथवा जिल्ह्याच्या एकूणच विभागाच्या बैठकांना जिल्हा प्रशासनात महत्त्व असते. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निर्माण केलेले नियोजन भवन महाराष्टष्ट्रामध्ये एक देखणी वास्तू म्हणून पुढे आले आहे.देशामध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या राज्यांच्या विधिमंडळाच्या सभागृहाला शोभेल, अशा पद्धतीची मांडणी या सभागृहाची करण्यात आली आहे. अर्धवर्तुळाकार असणारे हे सभागृह अत्याधुनिक संवाद साधनांनी परिपूर्ण आहे. या सभागृहाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही भागात सभागृहात बसले असल्यास थेट डायसशी आपला संपर्क येतो. या ठिकाणची असणारी दृकश्राव्य माध्यमांची आखणी या सभागृहाच्या वैभवात भर टाकते. बोलणाºया प्रत्येकांची छबी डायसच्या मागील स्क्रिमवर उमटेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये नियोजन विभाग, मानव विकास विभाग, चांदा ते बांदा, पालकमंत्री महोदयांचे संपर्क कार्यालय अशा महत्त्वपूर्ण कार्यालयाचीदेखील रचना करण्यात आली आहे. ७ कोटी २० लाख तरतुदीच्या दोन मजली इमारतीला आतील अर्धवर्तुळाकार बैठक व्यवस्था वेगळेपण देते. या सभागृहात ३०३ व्यक्तिंना बसण्याची क्षमता आहे. याच नियोजन भवनातून जिल्ह्यात होणाऱ्या विविध कामांचा व प्रस्तावित कामांचा मागोवा घेत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. याशिवाय शासकीय इमारतींनाही हायटेक करण्याचे काम जोमाने सुरू आहे. मूल व पोंभूर्णा येथे नवीन प्रशासकीय भवन बांधण्यात आले. या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालये सध्या कार्यरत आहेत. अनेक नवीन आरोग्य केंद्रांना इमारतींसाठी निधी मंजूर झाला आहे.पोलीस ठाण्याचे रुपडे पालटलेजिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांचा चेहरामोहरा आता बदलला आहे. बल्लारपूर व भद्रावती महाराष्टष्ट्रातील उत्तम पोलीस स्टेशनची वास्तू म्हणून गणल्या गेल्या आहेत. बल्लारपूर व भद्रावती या पोलीस ठाण्याला सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल आयएसओ मानांकन मिळाले आहे. २०१८ मध्ये दोन्हीही पोलीस स्टेशनचे लोकार्पण करण्यात आले. बल्लारपूर हे शहर गोंड राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हा इतिहास प्रथमदर्शी दिसावा, अशी देखणी किल्लासदृश वास्तू बल्लारपूर पोलीस ठाण्याची झाली आहे. एखाद्या अभेद्य किल्ल्याप्रमाणे हे पोलीस ठाणे जुन्या पोलीस ठाण्याच्या जागेवरच उभे राहिले आहे. पोलिसांच्या दृष्टीने आवश्यक असणाºया सर्व सोयीसुविधांची उपलब्धता या इमारतीमध्ये करण्यात आली आहे. या लोकार्पणानंतर काही महिन्यांतच या पोलीस स्टेशनला आयएसओ मानांकन मिळाले आहे. भद्रावती येथील पोलीस ठाणेदेखील अद्ययावत करण्यात आले आहे. बल्लारपूर व मूल या ठिकाणी पोलीस दलांच्या निवासासाठी उभारण्यात आलेले संकुलदेखील उच्च दर्जाचे आहे.जिल्ह्यातील विविध विकासकामांचा पाठपुरावा करणारे एखादे स्वतंत्र कार्यालय असावे, असे आपणाला वाटले. जिल्ह्याच्या नियोजन विभागाचे जिल्ह्याच्या प्रगतित अमूल्य असे स्थान असते. खासदार व आमदार यांची कामे असोत वा जिल्ह्याच्या एकूणच विभागाच्या बैठकांना जिल्हा प्रशासनात महत्त्व असते. मात्र चंद्रपुरात असे नियोजन भवन नव्हते. त्यामुळे चंद्रपुरात भव्य व देखणे नियोजन भवन शासनाच्या माध्यमातून उभारले. ही इमारत नजरेत भरते. राज्यातील एक देखणी वास्तू म्हणून आता ते चर्चेला आले आहे.-सुधीर मुनगंटीवार, अर्थ, नियोजन व वनमंत्री, महाराष्ट्र शासन.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार