शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयांपेक्षा मोबाईलची संख्या अधिक

By admin | Updated: April 8, 2015 00:04 IST

एकीकडे भारत स्वच्छ करण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेवर भर दिला आहे. यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे....

अभियानाचा फज्जा : शौचालयात ठेवली शेतीची अवजारेचंद्रपूर : एकीकडे भारत स्वच्छ करण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेवर भर दिला आहे. यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. विविध योजनांतर्गत जनतेला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जात आहेत. दुसरीकडे ग्रामीण जनता यापासून अनभिज्ञ आहे. आजही ग्रामीण भागात राहणाऱ्या कुटूंबामध्ये शौचालयाला महत्व कमी प्रमाणात आहे. मात्र मोबाईल फोन प्रत्येक कुटूंबात आढळतो. हातात झाडू घेवून प्रधानमंत्री यांनी जनतेला स्वच्छतेचा मंत्र दिला आहे. मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे शासकीय योजना ग्रामीण भागात पोहचत नाहीत. परिणामी या भागात राहणारी गरीब जनता स्वच्छतेच्या योजनेपासून कोसो दूर आहेत. ज्या प्रमाणात विज्ञान युगात प्रत्येक कुटुंबात मोबाईल फोन असणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असणे अती महत्वाचे आहे. स्वच्छतेकडून समृध्दीकडे घेऊन जाण्यासाठी राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानाला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला. सन २०१३ पासून हागणदारी मुक्त संकल्पना पुढे आली. ग्रामीण परिसरातील बऱ्याच गावातील कुटुंंबामध्ये शौचालय नसल्याने निर्मलग्राम योजनेच्या माध्यमातून गावागावांत शौचालय बांधण्यात आले. शौचालयाचा वापर वाढल्यामुळे गावात स्वच्छता पाहायला मिळत होती. १२ निकषाच्या आधारावर निर्मल गावांची निवड करण्यात आली. अशा गावांना राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. निर्मलग्राम झालेल्या गावांना विशेष निधी दिला गेला. मात्र निर्मलग्राम निधी मिळालेल्या गावांना, प्रशासनाला स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात यश आले नाही. त्याचा अनपेक्षीत परिणाम झाल्याचे प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असावे, शौचालयाचा वापर नियमीत करावा म्हणून शासनाकडून जनजागृती केली जात आहे. मात्र जनता याकडे दुर्लक्ष करीत आहे. अनेकांनी शौचालय बांधलेले असले तरी, त्याचा वापर न करता त्यात शेतीची अवजारे ठेवली जात आहे. गावाच्या मुख्य मार्गाच्या कडेलाच ग्रामस्थ पहाटेच शौचास बसतात. गावाच्या वेशीवर नागरिक शौचास बसत असल्याने त्याच्या दुर्गंधीवरूनच गाव आल्याची माहिती कळते. घरी शौचालय असून सुध्दा नागरिक शौचालयाचा वापर न करता रस्त्यावर शौचालयाकरिता जातात. मोबाईल व शौचालयाची मोजणी केल्यास मोबाईल फोन जास्त आढळून येतात. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर शासनाने दंडात्मक कारवाई करण्याचा अध्यादेश काढला असला, तरी तो कायदा अजूनही कागदावरच असल्याने योजनेचा फज्जा उडाला आहे. (प्रतिनिधी)प्रशासन उदासीनएखादी नवी योजना आल्यास तिचा गवगवा केला जातो. वास्तवीक मात्र त्यासाठी ग्रामीण भागांत जाऊन मेहनत केली जात नाही. परिणामी ग्रामीण भागांत या योजना पोहचत नाही. अशात ग्रामीण भागातील जनता या योजनांपासून वंचीत राहते. प्रशासनाची उदासिनता ग्रामीणांसाठी तोट्याचे ठरते.