शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

शौचालयांपेक्षा मोबाईलची संख्या अधिक

By admin | Updated: April 8, 2015 00:04 IST

एकीकडे भारत स्वच्छ करण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेवर भर दिला आहे. यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे....

अभियानाचा फज्जा : शौचालयात ठेवली शेतीची अवजारेचंद्रपूर : एकीकडे भारत स्वच्छ करण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेवर भर दिला आहे. यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. विविध योजनांतर्गत जनतेला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जात आहेत. दुसरीकडे ग्रामीण जनता यापासून अनभिज्ञ आहे. आजही ग्रामीण भागात राहणाऱ्या कुटूंबामध्ये शौचालयाला महत्व कमी प्रमाणात आहे. मात्र मोबाईल फोन प्रत्येक कुटूंबात आढळतो. हातात झाडू घेवून प्रधानमंत्री यांनी जनतेला स्वच्छतेचा मंत्र दिला आहे. मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे शासकीय योजना ग्रामीण भागात पोहचत नाहीत. परिणामी या भागात राहणारी गरीब जनता स्वच्छतेच्या योजनेपासून कोसो दूर आहेत. ज्या प्रमाणात विज्ञान युगात प्रत्येक कुटुंबात मोबाईल फोन असणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असणे अती महत्वाचे आहे. स्वच्छतेकडून समृध्दीकडे घेऊन जाण्यासाठी राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानाला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला. सन २०१३ पासून हागणदारी मुक्त संकल्पना पुढे आली. ग्रामीण परिसरातील बऱ्याच गावातील कुटुंंबामध्ये शौचालय नसल्याने निर्मलग्राम योजनेच्या माध्यमातून गावागावांत शौचालय बांधण्यात आले. शौचालयाचा वापर वाढल्यामुळे गावात स्वच्छता पाहायला मिळत होती. १२ निकषाच्या आधारावर निर्मल गावांची निवड करण्यात आली. अशा गावांना राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. निर्मलग्राम झालेल्या गावांना विशेष निधी दिला गेला. मात्र निर्मलग्राम निधी मिळालेल्या गावांना, प्रशासनाला स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात यश आले नाही. त्याचा अनपेक्षीत परिणाम झाल्याचे प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असावे, शौचालयाचा वापर नियमीत करावा म्हणून शासनाकडून जनजागृती केली जात आहे. मात्र जनता याकडे दुर्लक्ष करीत आहे. अनेकांनी शौचालय बांधलेले असले तरी, त्याचा वापर न करता त्यात शेतीची अवजारे ठेवली जात आहे. गावाच्या मुख्य मार्गाच्या कडेलाच ग्रामस्थ पहाटेच शौचास बसतात. गावाच्या वेशीवर नागरिक शौचास बसत असल्याने त्याच्या दुर्गंधीवरूनच गाव आल्याची माहिती कळते. घरी शौचालय असून सुध्दा नागरिक शौचालयाचा वापर न करता रस्त्यावर शौचालयाकरिता जातात. मोबाईल व शौचालयाची मोजणी केल्यास मोबाईल फोन जास्त आढळून येतात. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर शासनाने दंडात्मक कारवाई करण्याचा अध्यादेश काढला असला, तरी तो कायदा अजूनही कागदावरच असल्याने योजनेचा फज्जा उडाला आहे. (प्रतिनिधी)प्रशासन उदासीनएखादी नवी योजना आल्यास तिचा गवगवा केला जातो. वास्तवीक मात्र त्यासाठी ग्रामीण भागांत जाऊन मेहनत केली जात नाही. परिणामी ग्रामीण भागांत या योजना पोहचत नाही. अशात ग्रामीण भागातील जनता या योजनांपासून वंचीत राहते. प्रशासनाची उदासिनता ग्रामीणांसाठी तोट्याचे ठरते.