चिमूर : चिमूर तालुक्यातील खडसंगी परिसरातील खुर्सापार, रेंगाबोडी, बोथली, वहानगाव, भिवकुंड खापरी या गावातील शेतकऱ्यांच्या शेतातून लाल नाला कालवामधील कॅनाॅल जात आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या, त्या जमिनी ओलीत असताना मात्र महसूल प्रशासनाने कोरडवाहू दाखविल्याने शेतजमिनीचे मूल्याकन कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. या अन्यायग्रस्त शेतकऱ्याना न्याय देण्यासाठी आमदार बंटी भांगडिया सरसावले आहेत.
अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आ. भांगडिया यांनी तत्काळ उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, लालनाला प्रकल्पातील बाधित अन्याग्रस्त शेतकरी यांची शुक्रवारी संयुक्त बैठक बोलावली. त्यामध्ये हे प्रकरण तत्काळ निकाली काढण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आमदार भांगडिया यांच्या पुढाकाराने न्याय मिळणार आहे. यावेळी वसंत वारजूकर, डॉ. श्यामजी हटवादे, पं.स. सदस्य अजहर शेख, बकाराम मालोदे, राजू देवतळे, लालनाला प्रकल्पग्रस्त शेतकरी एकनाथ थुटे, जोगेश्वर थुटे, अर्जुन थुटे, सुरेश पानसे, बाबाजी येलेकर, दिलीप कुबडे, तसेच पं.स. सदस्य प्रदीप कामडी, विनोद चोखरे, सूरज नरुले, रमेश कंचर्लावार, सतीश जाधव, संजय कुंभारे प्रशांत चिडे, जयंत गौरकर आदी उपस्थित होते.