शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

‘मिशन अंत्योदय’चा कौशल्य रथातून जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:20 IST

१ ते १५ आॅक्टोबर पर्यंत मिशन अंत्योदय अंतर्गत जिल्ह्यातील १५७ ग्रामपंचायतीमध्ये पथदर्थी ग्रामसमृध्दी व स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्दे१ ते १५ पर्यंत पंधरवडा : स्वच्छतेच्या कार्यक्रमावर जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : १ ते १५ आॅक्टोबर पर्यंत मिशन अंत्योदय अंतर्गत जिल्ह्यातील १५७ ग्रामपंचायतीमध्ये पथदर्थी ग्रामसमृध्दी व स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्यामध्ये सर्व गावांमध्ये विविध स्वच्छतेच्या कार्यक्रमाचा जागर होत आहे.या पंधरवड्यात लोकांचा ग्रामसभेत सहभाग व गावाचा विकास आराखडा तयार करणे, स्वच्छता विषयी जनजागृती, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या कामास सुरूवात करणे आणि विविध योजनेची जाणीव जागृती करण्याकरिता कौशल्य रथासह कलापथकाची सोबत असल्याने विकासाची गंगा आपल्या दारी येणार आहे. तिचे स्वागत उत्स्फूर्तपणे करण्याचे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी मंगळवारी कौशल्य रथाचे स्वागत करताना केले.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीराम गोगुलवार, गोंडपिपरीचे गटविकास अधिकारी यशवंत मोहितकर, सहाय्यक गटविकास अधिकारी आशा ढवळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख यांच्या उपस्थित कौशल्य रथाला हिरवी झेंडी दाखवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.मिशन अंत्योदय अंतर्गत १५७ ग्रामपंचायतीमध्ये पायाभुत सर्वेक्षणाचे काम १ ते १५ आॅक्टोबर या कालावधीत करण्यात येणार आहे. यामध्ये गावातील विविध संसाधने आणि विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक माहितीची नोंद ‘समृध्द ग्राम’ या अप्लीकेशनवर आॅनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. सदर सर्वेक्षण गावातील महिला बचत गट सदस्य, ग्राम रोजगार सेवक व एक महाविद्यालयीन विद्यार्थी या चमुमार्फत करण्यात येणार आहे. या सर्व चमूंचे प्रशिक्षण तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे.सन २०११ च्या जनगणनेनुसार गावाला आवश्यक सुविधा या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होणार आहे. गावातील सर्वेक्षणातून प्राप्त माहितीचे संकलन झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये माहितीचे प्रमाणीकरण करून त्यानंतर संकलीत माहिती अ‍ॅपवर अंतिम आॅनलाईन भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यात नागरिकांनी सहभागी व्हावे.