शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

‘मिशन अंत्योदय’चा कौशल्य रथातून जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:20 IST

१ ते १५ आॅक्टोबर पर्यंत मिशन अंत्योदय अंतर्गत जिल्ह्यातील १५७ ग्रामपंचायतीमध्ये पथदर्थी ग्रामसमृध्दी व स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्दे१ ते १५ पर्यंत पंधरवडा : स्वच्छतेच्या कार्यक्रमावर जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : १ ते १५ आॅक्टोबर पर्यंत मिशन अंत्योदय अंतर्गत जिल्ह्यातील १५७ ग्रामपंचायतीमध्ये पथदर्थी ग्रामसमृध्दी व स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्यामध्ये सर्व गावांमध्ये विविध स्वच्छतेच्या कार्यक्रमाचा जागर होत आहे.या पंधरवड्यात लोकांचा ग्रामसभेत सहभाग व गावाचा विकास आराखडा तयार करणे, स्वच्छता विषयी जनजागृती, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या कामास सुरूवात करणे आणि विविध योजनेची जाणीव जागृती करण्याकरिता कौशल्य रथासह कलापथकाची सोबत असल्याने विकासाची गंगा आपल्या दारी येणार आहे. तिचे स्वागत उत्स्फूर्तपणे करण्याचे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी मंगळवारी कौशल्य रथाचे स्वागत करताना केले.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीराम गोगुलवार, गोंडपिपरीचे गटविकास अधिकारी यशवंत मोहितकर, सहाय्यक गटविकास अधिकारी आशा ढवळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख यांच्या उपस्थित कौशल्य रथाला हिरवी झेंडी दाखवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.मिशन अंत्योदय अंतर्गत १५७ ग्रामपंचायतीमध्ये पायाभुत सर्वेक्षणाचे काम १ ते १५ आॅक्टोबर या कालावधीत करण्यात येणार आहे. यामध्ये गावातील विविध संसाधने आणि विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक माहितीची नोंद ‘समृध्द ग्राम’ या अप्लीकेशनवर आॅनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. सदर सर्वेक्षण गावातील महिला बचत गट सदस्य, ग्राम रोजगार सेवक व एक महाविद्यालयीन विद्यार्थी या चमुमार्फत करण्यात येणार आहे. या सर्व चमूंचे प्रशिक्षण तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे.सन २०११ च्या जनगणनेनुसार गावाला आवश्यक सुविधा या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होणार आहे. गावातील सर्वेक्षणातून प्राप्त माहितीचे संकलन झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये माहितीचे प्रमाणीकरण करून त्यानंतर संकलीत माहिती अ‍ॅपवर अंतिम आॅनलाईन भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यात नागरिकांनी सहभागी व्हावे.