शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या पद्धतीने नुकसान भरपाईचे वाटप

By admin | Updated: June 23, 2014 23:46 IST

गतवर्षी पडलेल्या ओल्या दुष्काळामुळे शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर केली. परंतु, त्यामध्येही कृषी अधिकारी व तलाठी यांनी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या स्वरूपात मदत दिली.

चंद्रपूर : गतवर्षी पडलेल्या ओल्या दुष्काळामुळे शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर केली. परंतु, त्यामध्येही कृषी अधिकारी व तलाठी यांनी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या स्वरूपात मदत दिली. त्यामुळे परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांच्याा धोरणामुळे मदतीपासून वंचित राहावे लागले आहे. शासनाने मदत जाहीर केली. मात्र, भरीव मदत न मिळाल्याने तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार शासनाने केला आहे. दुष्काळाचे सर्वेक्षण करताना कोणत्याही अधिकाऱ्याने शेतावर न जाता कार्यालयात व घरी बसून सर्वेक्षण केले. त्यामुळे बरेच शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपले नाव दिले, त्या शेतकऱ्यांची कोणतीही चौकशी न करता त्यांना चुकीच्या पद्धतीने नुकसान भरपाई दिली आहे.यात कृषी अधिकारी व तलाठी यांची मिलीभगत असल्याचा आरोप होत आहे. मागील वर्षी झालेल्या नुकसानीची भरपाई बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शेतकरी तहसील कार्यालयात चौकशीला गेले असता, शेतकऱ्यांचे चार कोटींचे अनुदान प्राप्त व्हायचे असल्याने शेतकऱ्यांना मदत वाटप करायची असल्याचे सांगितले जात आहे. अनुदान प्राप्त होताच, मदत वाटप वितरीत करण्यात येईल, असे तहसील कार्यालयाकडून सांगितले जात आहे. एक वर्षाचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. मग शासनाकडून शेतकऱ्यांसाठी आलेला निधी गेला कुठे, याची चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे याबाबतत तत्काळ चौकशी करुन शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करुन शेतकऱ्यांचा नुकसानभरपाईची मदत देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)