शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:30 IST

ब्रम्हपुरी:राज्य सरकारच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी मागील तीन वर्षांपासून नियमितपणे उचल केलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केली आहे, ...

ब्रम्हपुरी:राज्य सरकारच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी मागील तीन वर्षांपासून नियमितपणे उचल केलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतची सानुग्रह राशी परतफेड केली जाईल, असे शासनाने सांगितले होते.

परंतु आजतागायत शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा परतीचा हप्ता मिळाला नाही. त्यामुळे नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून सरकारने एकप्रकारे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे.

त्यामुळे राज्य सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा परतीचा हप्ता त्वरित द्यावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष क्रीष्णा सहारे यांनी केली आहे.

राज्य सरकारने २०२० मध्ये कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर सलग तीन वर्षे कर्जाची मुदतीपूर्वी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची सानुग्रह राशीची परतफेड करू, असे राज्य सरकारने विधिमंडळ अधिवेशना दरम्यान सभागृहात आश्वासन दिले होते. परंतु सध्याच्या परिस्थितीत वरील आश्वासन हवेतच विरले असून सध्या आर्थिक वर्ष संपले तरीसुद्धा नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या सानुग्रह राशीची परतफेड देण्यात आली नाही. त्यामुळे सदर शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या प्रति तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. पोकळ जाहीरनामे, खोटी आश्वासने हा या सरकारचा धंदा असून निवडून येण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर मतांचा जोगवा मागणाऱ्या सरकारला सत्तेवर येताच शेतकऱ्यांच्या समस्यांचा त्यांच्या अडचणींचा विसर पडल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांनी सरकारच्या खोट्या आश्वासनाला बळी पडून होते नव्हते ते विकवाक करून मोठ्या आशेने सलगपणे नियमित कर्जाची परतफेड केली आहे परंतु सरकारला नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांप्रति सध्याच्या परिस्थितीत दयामाया येताना दिसून येत नाही.

बॉक्स

आश्वासन दिले कशाला?

सरकारला जर सदर सानुग्रह राशी द्यायची नव्हती तर भर सभागृहात आश्वासन कशाला दिले, असा प्रतिप्रश्न माजी उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांनी सरकारला केला आहे.

येत्या काही दिवसात सरकारने जर ५० हजार रुपयांची एकरकमी रक्कम दिली नाही तर भविष्यात विदर्भातील शेतकरी सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

सध्याच्या परिस्थितीत ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकरी कोरोना, महापूर, अवकाळी या नैसर्गिक आपत्तीने बेजार झाला असतानाच महावितरण कंपनीने वीज वसुलीचा तगादा लावला. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. अशा अवस्थेत त्वरित ५० हजार रुपयांची सानुग्रह राशी शासनाने ताबडतोब द्यावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांनी केली आहे.