शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...  
2
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
3
सामाजिक कार्यकर्त्याची पत्नीकडूनच हत्या; रात्री २.३० च्या सुमारास..., चिंचवड हादरले
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा; म्हणाले, 'सहा महिन्यांत परिणाम कळेल!'
5
बदलणार पेमेंटची पद्धत! म्युच्युअल फंडमधून थेट UPI पेमेंट करा; काय आहे ‘Pay with Mutual Fund’ फीचर?
6
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
7
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
8
प्रसिद्ध गायक सचिनला अटक! लग्नाचं आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप
9
KVP Investment Scheme: पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम
10
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
11
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
12
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
13
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
14
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
15
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
16
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
17
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
18
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
19
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
20
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर

नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:30 IST

ब्रम्हपुरी:राज्य सरकारच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी मागील तीन वर्षांपासून नियमितपणे उचल केलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केली आहे, ...

ब्रम्हपुरी:राज्य सरकारच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी मागील तीन वर्षांपासून नियमितपणे उचल केलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतची सानुग्रह राशी परतफेड केली जाईल, असे शासनाने सांगितले होते.

परंतु आजतागायत शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा परतीचा हप्ता मिळाला नाही. त्यामुळे नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून सरकारने एकप्रकारे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे.

त्यामुळे राज्य सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा परतीचा हप्ता त्वरित द्यावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष क्रीष्णा सहारे यांनी केली आहे.

राज्य सरकारने २०२० मध्ये कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर सलग तीन वर्षे कर्जाची मुदतीपूर्वी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची सानुग्रह राशीची परतफेड करू, असे राज्य सरकारने विधिमंडळ अधिवेशना दरम्यान सभागृहात आश्वासन दिले होते. परंतु सध्याच्या परिस्थितीत वरील आश्वासन हवेतच विरले असून सध्या आर्थिक वर्ष संपले तरीसुद्धा नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या सानुग्रह राशीची परतफेड देण्यात आली नाही. त्यामुळे सदर शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या प्रति तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. पोकळ जाहीरनामे, खोटी आश्वासने हा या सरकारचा धंदा असून निवडून येण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर मतांचा जोगवा मागणाऱ्या सरकारला सत्तेवर येताच शेतकऱ्यांच्या समस्यांचा त्यांच्या अडचणींचा विसर पडल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांनी सरकारच्या खोट्या आश्वासनाला बळी पडून होते नव्हते ते विकवाक करून मोठ्या आशेने सलगपणे नियमित कर्जाची परतफेड केली आहे परंतु सरकारला नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांप्रति सध्याच्या परिस्थितीत दयामाया येताना दिसून येत नाही.

बॉक्स

आश्वासन दिले कशाला?

सरकारला जर सदर सानुग्रह राशी द्यायची नव्हती तर भर सभागृहात आश्वासन कशाला दिले, असा प्रतिप्रश्न माजी उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांनी सरकारला केला आहे.

येत्या काही दिवसात सरकारने जर ५० हजार रुपयांची एकरकमी रक्कम दिली नाही तर भविष्यात विदर्भातील शेतकरी सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

सध्याच्या परिस्थितीत ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकरी कोरोना, महापूर, अवकाळी या नैसर्गिक आपत्तीने बेजार झाला असतानाच महावितरण कंपनीने वीज वसुलीचा तगादा लावला. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. अशा अवस्थेत त्वरित ५० हजार रुपयांची सानुग्रह राशी शासनाने ताबडतोब द्यावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांनी केली आहे.