शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

मालमत्ताकराबाबत मनपा आयुक्तांकडून जनतेची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST

२०१५-१६ पासून चंद्रपूर महानगर पालिकेने नागरिकांवर मनमानी व भरमसाठ मालमत्ता कर लादला होता. त्यावेळी झालेल्या जनआंदोलनास शांत करण्यासाठी मनपाने २०१५-१६ साठीचा कर जुन्याच दराने घेतला जाईल, असे जाहीर केले होते. परंतु २०१६-१७ पासूनच्या करात मात्र बेकायदेशीर व घटनाबाह्य अशी जाचक वाढ कायम ठेवली आणि त्यानुसार बिले पाठविली.

ठळक मुद्दे३४ हजार तक्रारकर्त्यांच्या मालमत्ताकराची बिले रद्दचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उच्च न्यायालयाने ४३ हजार नागरिकांची चंद्रपूर महानगर पालिकेची वाढीव मालमत्ताकराची बिले रद्द केली आहे. यामुळे अडचणीत सापडलेले मनपा आयुक्त न्यायालयाचा आदेश हा केवळ ४७ मालमत्ताधारकांसाठीच लागू असल्याचा अपप्रचार करीत आहे, असा आरोप विनोद दत्तात्रेय, बजरंगलाल बागला, शैलेश बागला, मधुसुदन रुंगठा, अजय उपगन्लावार, घनश्याम दरबार, रामकिशोर सारडा व विनोद उपाध्याय या याचिकाकर्त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.२०१५-१६ पासून चंद्रपूर महानगर पालिकेने नागरिकांवर मनमानी व भरमसाठ मालमत्ता कर लादला होता. त्यावेळी झालेल्या जनआंदोलनास शांत करण्यासाठी मनपाने २०१५-१६ साठीचा कर जुन्याच दराने घेतला जाईल, असे जाहीर केले होते. परंतु २०१६-१७ पासूनच्या करात मात्र बेकायदेशीर व घटनाबाह्य अशी जाचक वाढ कायम ठेवली आणि त्यानुसार बिले पाठविली. चंद्रपूरच्या काही नागरिकांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. यावर उच्च न्यायालयाने मालमत्ताकराच्या वसुलीची सक्ती करू नये, असे आदेश दिले होते. याबाबत मनपा आयुक्ताने हा आदेश केवळ याचिकाकर्त्यांच्या वसुलीला लागू आहे. आणि शहरातील इतर मालमत्ताधारकांच्या वसुलीला लागू नाही. यामुळे चंद्रपूरकरांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, याकडेही यावेळी याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले. वास्तविक, उपरोक्त याचिका ही चंद्रपूरच्या मालमत्ताधारकांतर्फे गृहित धरण्यात यावी. सदर अर्ज प्रलंबित असताना उच्च न्यायालयाने ८ जानेवारी २०२० रोजी निकालाद्वारे ज्या नागरिकांनी कराधान नियम १५ अन्वये तक्रारी सादर केल्या, त्या सर्वांची देयके रद्द करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले. त्यावेळी तब्बल ४३ हजार मालमत्ताधारकांनी वाढीव कराच्या विरोधात मनपाकडे तक्रारी केल्या होत्या, याकडेही यावेळी लक्ष वेधले.

टॅग्स :Taxकर