शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

आहार शिजविण्याच्या दरात अल्प वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 21:21 IST

शालेय पोषण आहार योजना विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत १ ते ५ व्या वर्गातील प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार तसेच ६ ते ८ वीतील विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार दिल्या जात आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गाकरिता १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गाकरिता १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो. परंतु, आहार शिजविण्यासाठी केवळ ५.३५ टक्के वाढ केल्याने महिला बचतगटांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देमहिला बचतगटांमध्ये नाराजी : सरकारने महागाईकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शालेय पोषण आहार योजना विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत १ ते ५ व्या वर्गातील प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार तसेच ६ ते ८ वीतील विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार दिल्या जात आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गाकरिता १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गाकरिता १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो. परंतु, आहार शिजविण्यासाठी केवळ ५.३५ टक्के वाढ केल्याने महिला बचतगटांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.केंद्र शासनाने २०१६ च्या आदेशानुसार सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी सन २०१५-१६ च्या अन्न शिजविण्याच्या दरात ७ टक्के वाढ करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार २७ आॅक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयान्वये अन्न शिजविण्याच्या दरासाठीची प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी (१ ते ५ वी) ४ रूपये १३ पैसे आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी (६ ते ८ वी) ६ रूपये १८ पैसेप्रमाणे निश्चित करण्यात आले होते. केंद्र शासनाने १५ नोव्हेंबर २०१८ च्या आदेशानुसार सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता सन २०१६-१७ च्या अन्न शिजविण्याच्या दरात ५.३५ टक्के दरवाढ मंजूर केली आहे. २ फेब्रुवारी २०११ च्या निर्णयान्वये विहित कार्यपद्धतीनुसार यामध्ये वाढ केल्या जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु, दरवाढ न करता जुनाच निर्णय कायम ठेवला. ग्रामीण भागामध्ये तांदळाबरोबरच इतर धान्यादी मालाचा पुरवठा शाळेमध्ये केला जातो. यापासून आहार बनविण्यासाठी प्राथमिक व उच्च प्राथमिक लाभार्थ्यांसाठी निश्चित असलेल्या आहार खर्चाच्या विभागणीवर नजर टाकल्यास आजच्या वाढत्या महागाईकडे सरकारने दुर्लक्ष केले, असा आरोप शालेय आहार शिजविणाऱ्या महिला बचतगटांचा आहे. महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रामध्ये स्वयंसेवी संस्था, बचतगट यांच्यामार्फत शिजविलेल्या तयार आहाराचा पुरवठा शाळांमध्ये केला जात आहे. शहरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीचा वापर करून आहार तयार होतो. शालेय पोषण आहार पुरवठा करणाºया यंत्रणेला नवीन दरानुसार आहार खर्चाचे अनुदान अदा करण्याचे आदेश दिल्याने महिला बचतगटांचा हिरमोड झाला आहे.