शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालय क्षेत्र पुनर्रचना आरक्षणाकडे लागले लक्ष

By admin | Updated: April 18, 2016 00:55 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, गडचांदूर व नागभीड या ग्रामपंचायती आता नगरपरिषद तर सिंदेवाही, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना या

राजकुमार चुनारकर ल्ल खडसंगी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, गडचांदूर व नागभीड या ग्रामपंचायती आता नगरपरिषद तर सिंदेवाही, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना या ग्रामपंचायतीनगर नगरपंचायती झाल्या आहेत. यामुळे मिनी म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्था मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यातील जिल्हा परिषदांच्या मतदार संघाची पुनर्रचना अपरिहार्य आहे. त्यामुळे मतदार संघ पुनर्रचना आणि मतदार संघ आरक्षण सोडतीकडे राजकीय पुढाऱ्यांसह दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.जिल्हा परिषद, पंचायत समितीची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे निवडणुकीला अकरा महिन्यांचा कालावधी उरला आहे. याच पार्श्वभूमीवर मतदार संघ पुनर्रचना आणि मतदार संघ आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे.जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायतींना नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला तर सिंदेवाही, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती या ग्रामपंचायतीना शासनाच्या नव्या धोरणानुसार नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे.चिमूर-सावरगाव जिल्हा परिषद मतदार संघात चिमूर ग्रामपंचायतींसह सावरगाव, मालेवाडा, खरकाडा, सोनेगाव, काग या गावांचा समावेश होता. या जि.प. क्षेत्रातून चिमूर नगरपरिषद झाल्याने १५ हजार लोकसंख्येची ग्रामपंचायत जि.प. क्षेत्रातून वगळली जाणार आहे. त्यामुळे चिमूर जि.प. क्षेत्र गोठवण्यात येणार काय, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क काढले जात आहेत.शासनाने काही ग्रामपंचायतीचा विरोध असतानाही नागभीड ग्रामपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा दिला. त्यामुळे नागभीड-सुलेझरी हे क्षेत्रसुद्धा कमी होणार की काय, याकडे राजकीय पुढाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहेत. गडचांदूर ग्रामपंचायतीला सुद्धा नगरपरिषद बनविल्याने या क्षेत्राचे सुद्धा विभाजन होणार आहे. या तिन्ही नगरपरिषदांच्या निर्मितीमुळे या जिल्हा परिषद मतदार संघाची निम्मी लोकसंख्या जिल्हा परिषद मतदार संघातून बाहेर गेली आहे. त्यामुळे पुनर्रचनेच्यावेळी गावांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात आजघडीला ५७ जिल्हा परिषद मतदार संघ आहेत. त्यांपैकी अनेक तालुकास्तरावरील ग्रामपंचायतींना शासनाच्या नवीन धोरणानुसार नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे किती मतदार संघ कमी होणार व कोणत्या-कोणत्या गावांची अदलाबदल होणार याबाबत पुढाऱ्यासह कार्यकर्त्यांमध्ये तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र या सर्व प्रकारामुळे अनेक जिल्हा परिषद पंचायती समिती मतदार संघाच्या क्षेत्रात पुर्नरचनेत अदलाबदल होणार हे मात्र नक्की. अशी होणार पुर्नरचनाजिल्हा परिषद मतदार संघ फेररचनेचे सूत्र महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमन १९६१ मध्ये नमूद केलेले आहे. राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेली जिल्हा परिषद घटक धरली जाते. त््या जिल्हा परिषदेत किमान ५० मतदार संघ असणे आवश्यक आहे. कमी लोकसंख्येची जिल्हा परिषद आणि ५० मतदार संघ हे सुत्र निश्चित करून राज्यातील उर्वरीत जिल्हा परिषदासाठी जिल्हा परिषद मतदार संघाची लोकसंख्या निश्चित केली जाते. त्यावरून मतदार संघ पुनर्रचना केली जाते.असे आहेत मतदार संघतालुकानिहाय जिल्हा परिषद मतदार संघ चिमूर तालुका-०६, ब्रह्मपुरी तालुका -०४, नागभीड तालुका-०५, सिंदेवाही-०४, सावली-०४, पोंभुर्णा-०२, बल्लारपूर-०२, गोंडपिपरी-०३, राजुरा-०४, कोरपना-०४, जिवती-०२, वरोरा-०४, चंद्रपूर तालुका-०६, भद्रावती तालुका-०४ व मूल तालुका-०३ असे एकुण ५७ जिल्हा परिषद क्षेत्र आहेत.