शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

मिनी मंत्रालय क्षेत्र पुनर्रचना आरक्षणाकडे लागले लक्ष

By admin | Updated: April 18, 2016 00:55 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, गडचांदूर व नागभीड या ग्रामपंचायती आता नगरपरिषद तर सिंदेवाही, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना या

राजकुमार चुनारकर ल्ल खडसंगी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, गडचांदूर व नागभीड या ग्रामपंचायती आता नगरपरिषद तर सिंदेवाही, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना या ग्रामपंचायतीनगर नगरपंचायती झाल्या आहेत. यामुळे मिनी म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्था मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यातील जिल्हा परिषदांच्या मतदार संघाची पुनर्रचना अपरिहार्य आहे. त्यामुळे मतदार संघ पुनर्रचना आणि मतदार संघ आरक्षण सोडतीकडे राजकीय पुढाऱ्यांसह दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.जिल्हा परिषद, पंचायत समितीची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे निवडणुकीला अकरा महिन्यांचा कालावधी उरला आहे. याच पार्श्वभूमीवर मतदार संघ पुनर्रचना आणि मतदार संघ आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे.जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायतींना नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला तर सिंदेवाही, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती या ग्रामपंचायतीना शासनाच्या नव्या धोरणानुसार नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे.चिमूर-सावरगाव जिल्हा परिषद मतदार संघात चिमूर ग्रामपंचायतींसह सावरगाव, मालेवाडा, खरकाडा, सोनेगाव, काग या गावांचा समावेश होता. या जि.प. क्षेत्रातून चिमूर नगरपरिषद झाल्याने १५ हजार लोकसंख्येची ग्रामपंचायत जि.प. क्षेत्रातून वगळली जाणार आहे. त्यामुळे चिमूर जि.प. क्षेत्र गोठवण्यात येणार काय, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क काढले जात आहेत.शासनाने काही ग्रामपंचायतीचा विरोध असतानाही नागभीड ग्रामपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा दिला. त्यामुळे नागभीड-सुलेझरी हे क्षेत्रसुद्धा कमी होणार की काय, याकडे राजकीय पुढाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहेत. गडचांदूर ग्रामपंचायतीला सुद्धा नगरपरिषद बनविल्याने या क्षेत्राचे सुद्धा विभाजन होणार आहे. या तिन्ही नगरपरिषदांच्या निर्मितीमुळे या जिल्हा परिषद मतदार संघाची निम्मी लोकसंख्या जिल्हा परिषद मतदार संघातून बाहेर गेली आहे. त्यामुळे पुनर्रचनेच्यावेळी गावांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात आजघडीला ५७ जिल्हा परिषद मतदार संघ आहेत. त्यांपैकी अनेक तालुकास्तरावरील ग्रामपंचायतींना शासनाच्या नवीन धोरणानुसार नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे किती मतदार संघ कमी होणार व कोणत्या-कोणत्या गावांची अदलाबदल होणार याबाबत पुढाऱ्यासह कार्यकर्त्यांमध्ये तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र या सर्व प्रकारामुळे अनेक जिल्हा परिषद पंचायती समिती मतदार संघाच्या क्षेत्रात पुर्नरचनेत अदलाबदल होणार हे मात्र नक्की. अशी होणार पुर्नरचनाजिल्हा परिषद मतदार संघ फेररचनेचे सूत्र महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमन १९६१ मध्ये नमूद केलेले आहे. राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेली जिल्हा परिषद घटक धरली जाते. त््या जिल्हा परिषदेत किमान ५० मतदार संघ असणे आवश्यक आहे. कमी लोकसंख्येची जिल्हा परिषद आणि ५० मतदार संघ हे सुत्र निश्चित करून राज्यातील उर्वरीत जिल्हा परिषदासाठी जिल्हा परिषद मतदार संघाची लोकसंख्या निश्चित केली जाते. त्यावरून मतदार संघ पुनर्रचना केली जाते.असे आहेत मतदार संघतालुकानिहाय जिल्हा परिषद मतदार संघ चिमूर तालुका-०६, ब्रह्मपुरी तालुका -०४, नागभीड तालुका-०५, सिंदेवाही-०४, सावली-०४, पोंभुर्णा-०२, बल्लारपूर-०२, गोंडपिपरी-०३, राजुरा-०४, कोरपना-०४, जिवती-०२, वरोरा-०४, चंद्रपूर तालुका-०६, भद्रावती तालुका-०४ व मूल तालुका-०३ असे एकुण ५७ जिल्हा परिषद क्षेत्र आहेत.