शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

मिनी मंत्रालयात गदारोळ

By admin | Updated: April 24, 2015 00:51 IST

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या विविध योजना दोन-तीन वर्षानंतरही पूर्णत्वास येऊ शकल्या नाही.

चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या विविध योजना दोन-तीन वर्षानंतरही पूर्णत्वास येऊ शकल्या नाही. या योजनेच्या अंमलबजावणीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आजच्या सभेत चांगलेच धारेवर धरले. सत्ताधाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने सदस्यांनी अखेर सभागृहातच प्रोसेडिंग बुक फाडून व ग्लास फोडून आपला निषेध व्यक्त केला.जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज गुरुवारी स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरुनुले यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या सभेत प्रारंभापासूनच विरोधक आक्रमक असल्याचे दिसून येत होते. अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी सचिवांना सभा सुरू करण्याचे सांगताच विनोद अहीरकर यांनी विविध योजनांवरून प्रश्नाची सरबत्ती केली. त्यानंतर संध्या गुरुनुले यांचाही आवाज चढला. त्यामुळे काही वेळ दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. बांधकाम सभापती देवराव भोंगळे यांनी अध्यक्षांची बाजू घेतल्याने विरोधक आणखी संतापले. २०१२-१३ व २०१३-१४ या वर्षातील जवाहर रोजगार योजनेची व नरेगाची किती कामे झाली आहेत व किती अपूर्ण आहेत, याबाबतचा प्रश्न विनोद अहीरकर यांनी सभागृहात उपस्थित केला. या प्रश्नावर अध्यक्ष संध्या गुरुनुले निरुत्तर झाल्या. अखेर मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलील यांनी मध्यस्थी करीत नरेग व जवाहर योजनेची कामे जूनपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.त्यानंतर सत्ताधारी गटातील माजी पदाधिकारी राहिलेल्या एका सदस्यांनीच आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांवर अनेक आरोप केले. त्यांनी नोटबुक खरेदीचा मुद्दा उपस्थित केला. नोटबुक तीन-तीन महिने ठेवून सडवून खराब झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वाटणार आहात काय, असा संतप्त सवाल सत्ताधारी पक्षातील सदस्यांनीच उपस्थित केला. महाराष्ट्रात आपले सरकार आहे, पालकमंत्री आपले आहेत, तरीही हे हाल आहेत, अशा शब्दात त्यांनी आपली चिड व्यक्त केली. अखेर देवराव भोंगळे यांनी मधे पडून संतप्त सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाबाबत वृत्तपत्रात बातम्या येत असताना त्याचे साधे खंडण करण्याचे औचित्यही अध्यक्षांनी दाखविले नाही, असा आरोपही अध्यक्ष महोदयांवर करण्यात आला. त्यानंतर सतीश वारजूकर यांनी बांधकाम विभागातील काही प्रकरणावर जाब विचारला. मात्र अध्यक्षांनी याकडे लक्ष न देता वारजूकरांनी उपस्थित केलेल्या विषयाला पध्दतशीर बगल दिली. त्यामुळे समाधान न झालेल्या वारजूकर यांनी चक्क प्रोसेडिंग फाडून व ग्लास फोडून आपला निषेध सभागृहापुढे व्यक्त केला. दरम्यान आपण २७ मार्च २०१५ च्या बजेटच्या प्रोसेडींगची माहिती मागितली. मात्र ही माहिती न देता उलट दबावतंत्राचा वापर करीत उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना सभा संपल्याचे घाईघाईने आदेश दिले, असा आरोप सतीश वारजूकर यांनी केला. एकूणच आजची जिल्हा परिषदेतील स्थायी समितीची सभा चांगलीच वादळी ठरली. (शहर प्रतिनिधी)आराखडा देण्यास नकार सत्ताधाऱ्यांनी सत्ता स्थापन होताच विकास आराखडा सरकारकडे मंजूरीसाठी पाठविला होता. तो आराखडा सभागृहात देण्यासाठी सहा महिन्यांपासून मागणी सुरू आहे. परंतु सभागृहाला अजुनही आराखडा दिला नाही. आलेसूर ग्रामपंचायतीत एमआरईएस अंतर्गत पाच लाख रूपये जास्तीचे खर्च केले हाही विषय गाजला. मजगीच्या कामाची अजूनही एकाही ग्रामपंचायतीला माहिती दिली नाही, असा प्रश्न उपस्थित केला असता, त्यावर अध्यक्ष निरूत्तर झाले. एमआरईजीएस मध्ये सिमेंट रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला, यावरही सभागृहात उत्तर देण्यास अध्यक्ष निरूत्तर झाले. गुरूवारच्या सभेत एकाही प्रश्नाचे उत्तर अध्यक्ष समाधानकारक देऊ शकले नाही. त्यामुळे नोटबुक खरेदीमध्ये ५० लाखांचा भ्रष्टाचार, जिल्ह्यात दुधाचे प्रमाण किती वाढले याचेही उत्तर सभागृात कोणीही देऊ शकले नाही. विरोधकांनी प्रश्नांचा भडीमार केला. मात्र सत्ताधाऱ्यांनी एकाही प्रश्नाचे समाधानकार उत्तर न दिल्याने तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.