शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
3
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
4
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
5
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
7
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
8
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
9
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."
10
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
11
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
12
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
13
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
14
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
15
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
16
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
17
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
18
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
19
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
20
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!

मिनी मंत्रालयात गदारोळ

By admin | Updated: April 24, 2015 00:51 IST

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या विविध योजना दोन-तीन वर्षानंतरही पूर्णत्वास येऊ शकल्या नाही.

चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या विविध योजना दोन-तीन वर्षानंतरही पूर्णत्वास येऊ शकल्या नाही. या योजनेच्या अंमलबजावणीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आजच्या सभेत चांगलेच धारेवर धरले. सत्ताधाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने सदस्यांनी अखेर सभागृहातच प्रोसेडिंग बुक फाडून व ग्लास फोडून आपला निषेध व्यक्त केला.जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज गुरुवारी स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरुनुले यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या सभेत प्रारंभापासूनच विरोधक आक्रमक असल्याचे दिसून येत होते. अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी सचिवांना सभा सुरू करण्याचे सांगताच विनोद अहीरकर यांनी विविध योजनांवरून प्रश्नाची सरबत्ती केली. त्यानंतर संध्या गुरुनुले यांचाही आवाज चढला. त्यामुळे काही वेळ दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. बांधकाम सभापती देवराव भोंगळे यांनी अध्यक्षांची बाजू घेतल्याने विरोधक आणखी संतापले. २०१२-१३ व २०१३-१४ या वर्षातील जवाहर रोजगार योजनेची व नरेगाची किती कामे झाली आहेत व किती अपूर्ण आहेत, याबाबतचा प्रश्न विनोद अहीरकर यांनी सभागृहात उपस्थित केला. या प्रश्नावर अध्यक्ष संध्या गुरुनुले निरुत्तर झाल्या. अखेर मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलील यांनी मध्यस्थी करीत नरेग व जवाहर योजनेची कामे जूनपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.त्यानंतर सत्ताधारी गटातील माजी पदाधिकारी राहिलेल्या एका सदस्यांनीच आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांवर अनेक आरोप केले. त्यांनी नोटबुक खरेदीचा मुद्दा उपस्थित केला. नोटबुक तीन-तीन महिने ठेवून सडवून खराब झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वाटणार आहात काय, असा संतप्त सवाल सत्ताधारी पक्षातील सदस्यांनीच उपस्थित केला. महाराष्ट्रात आपले सरकार आहे, पालकमंत्री आपले आहेत, तरीही हे हाल आहेत, अशा शब्दात त्यांनी आपली चिड व्यक्त केली. अखेर देवराव भोंगळे यांनी मधे पडून संतप्त सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाबाबत वृत्तपत्रात बातम्या येत असताना त्याचे साधे खंडण करण्याचे औचित्यही अध्यक्षांनी दाखविले नाही, असा आरोपही अध्यक्ष महोदयांवर करण्यात आला. त्यानंतर सतीश वारजूकर यांनी बांधकाम विभागातील काही प्रकरणावर जाब विचारला. मात्र अध्यक्षांनी याकडे लक्ष न देता वारजूकरांनी उपस्थित केलेल्या विषयाला पध्दतशीर बगल दिली. त्यामुळे समाधान न झालेल्या वारजूकर यांनी चक्क प्रोसेडिंग फाडून व ग्लास फोडून आपला निषेध सभागृहापुढे व्यक्त केला. दरम्यान आपण २७ मार्च २०१५ च्या बजेटच्या प्रोसेडींगची माहिती मागितली. मात्र ही माहिती न देता उलट दबावतंत्राचा वापर करीत उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना सभा संपल्याचे घाईघाईने आदेश दिले, असा आरोप सतीश वारजूकर यांनी केला. एकूणच आजची जिल्हा परिषदेतील स्थायी समितीची सभा चांगलीच वादळी ठरली. (शहर प्रतिनिधी)आराखडा देण्यास नकार सत्ताधाऱ्यांनी सत्ता स्थापन होताच विकास आराखडा सरकारकडे मंजूरीसाठी पाठविला होता. तो आराखडा सभागृहात देण्यासाठी सहा महिन्यांपासून मागणी सुरू आहे. परंतु सभागृहाला अजुनही आराखडा दिला नाही. आलेसूर ग्रामपंचायतीत एमआरईएस अंतर्गत पाच लाख रूपये जास्तीचे खर्च केले हाही विषय गाजला. मजगीच्या कामाची अजूनही एकाही ग्रामपंचायतीला माहिती दिली नाही, असा प्रश्न उपस्थित केला असता, त्यावर अध्यक्ष निरूत्तर झाले. एमआरईजीएस मध्ये सिमेंट रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला, यावरही सभागृहात उत्तर देण्यास अध्यक्ष निरूत्तर झाले. गुरूवारच्या सभेत एकाही प्रश्नाचे उत्तर अध्यक्ष समाधानकारक देऊ शकले नाही. त्यामुळे नोटबुक खरेदीमध्ये ५० लाखांचा भ्रष्टाचार, जिल्ह्यात दुधाचे प्रमाण किती वाढले याचेही उत्तर सभागृात कोणीही देऊ शकले नाही. विरोधकांनी प्रश्नांचा भडीमार केला. मात्र सत्ताधाऱ्यांनी एकाही प्रश्नाचे समाधानकार उत्तर न दिल्याने तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.