शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

चंद्रपुरात दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: May 25, 2016 01:28 IST

जिल्ह्यासह चंद्रपूर शहरातील अनेक वॉर्डात पाण्यासाठी हाहाकार सुरू असताना लिकेजद्वारे दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय चंद्रपूर शहरात सुरू आहे.

मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष : पाण्यासाठी अनेक वॉर्डात टाहोचंद्रपूर : जिल्ह्यासह चंद्रपूर शहरातील अनेक वॉर्डात पाण्यासाठी हाहाकार सुरू असताना लिकेजद्वारे दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय चंद्रपूर शहरात सुरू आहे. याकडे मनपा प्रशासन व पाणी पुरवठा कंत्राटदार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी केला आहे.एकीकळे महानगरपालिका तसेच अनेक समाजसेवी संस्थाच्या माध्यमातून शहरवासीयांना पाणी बचतीचे धडे दिले जात आहेत. तर दुसरीकळे महानगरपालिकेद्वारे टाकण्यात आलेल्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये अनेक ठिकाणी लिकेज असल्याने त्याद्वारे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र अनेक वॉर्डात दिसून येते.चंद्रपूर शहरामध्ये इरई धरणाद्वारे दररोज ४२ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी चंद्रपूर शहरामध्ये महानगरपालिकाअंतर्गत पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. परंतु, ही पाईपलाईन अनेक ठिकाणी लिकेज आहे. त्यामुळे दररोज २५.४ एमएलडी पाणी वाया जात असल्याचे राजेश बेले यांनी म्हटले आहे. त्यामुळे जेवढा पाणी पुरवठा शहरात केला जातो, त्यापैकी ५० टक्के पाणी वाया जात असल्याचे चित्र शहरात दिसून येते. (नगर प्रतिनिधी)अनेक ठिकाणी लिकेजचंद्रपुरात रामनगर पोलीस ठाण्यापासून गेलेल्या पाईपलाईनमध्ये ११ ठिकाणी, रेल्वे पूलाजवळ ४ ठिकाणी, पाणी पुरवठा कार्यालय ते जिल्हा परिषद पाणी पुरवठा अधिकारी निवासापर्यंत २ लिकेज, तुकूम परिसरातील वाहतूक कार्यालयाजवळील व्हाल्वमध्ये खूप मोठा लिकेज, बाबुपेठ परिसरात सात ठिकाणी, पठाणपुरामध्ये चार ठिकाणी, वरोरा नाका दोन ठिकाणी, जटपुरा परिसरात चार लिकेज आहेत. े नळाच्या पाण्याचा अपव्ययचंद्रपुरातील काही वॉर्डात पहाटे ४ वाजताच्या सुमारास नळ सोडले जातात. नागरिक या वेळेत साखर झोपेत असतात. त्यामुळे बहुतेक नागरिक यावेळेस पाणी भरत नाही. तर ते सकाळी ६ वाजतापासून नळाचे पाणी भरतात. परंतु, अनेकांचे नळ हे पहाटेपासूनच सुरू असतात. त्यामुळे दररोज किमान दोन तास पाणी वाया जात असते.