शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांची कोट्यवधींनी फसवणूक

By admin | Updated: November 7, 2016 01:25 IST

गुंतवणूकदाराच्या रकमेवर साडे पाच वर्षात दामदुप्पट रक्कम देण्यासह जीवनविमा देण्याच्या नावावर जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांचे

कंपनीने केला पोबारा : व्यवस्थापकासह १३ जणांवर गुन्हे दाखलचंद्रपूर : गुंतवणूकदाराच्या रकमेवर साडे पाच वर्षात दामदुप्पट रक्कम देण्यासह जीवनविमा देण्याच्या नावावर जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये साई प्रॉपर्टी डेलव्हपमेंट प्रा. लि. या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गंडविल्याचा प्रकार उजेडात आला आहे. कंपनीच्या व्यवस्थापकासह तब्बल १३ कर्मचाऱ्यांवर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे गुंतवणूकदारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.साईप्रकाश आर्गनिक फुड लि. या कंपनीने २०१३ मध्ये चंद्रपूर येथे साई प्रापर्टी डेव्हलपमेंट लिमिटेड या नावाने कार्यालय सुरू केले. चंद्रपुरात कंपनीने बंगाली कॅम्प मार्गावरील मच्छीनालाजवळ कार्यालय उघडले होते. या कार्यालयात काही स्थानिक कर्मचारीही कंपनीने नेमले. यानंतर जिल्हाभरात एजन्ट नेमून नागरिकांना साडेपाच वर्षात दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवत ठेवी ठेवण्यास भाग पाडले. अनेकांनी कंपनीच्या या आमिषाला बळी पडून साई प्रापर्टी डेव्हलपमेंट लिमिटेडमध्ये मोठ्या रकमा गुंतवल्या होत्या. अनेकांची गुंतवणूक ही लाखांच्या घरात असल्याचे सांगितले जाते.जिल्ह्यात कंपनीचे दोनशेवर एजन्ट असून हजार ते बाराशे गुंतवणूकदार असल्याची माहितीे आहे. कार्यालय नियमित सुरू असतानाच २०१५ मध्ये कंपनीने गाशा गुंडाळून पोबारा केला. यानंतरही काही कर्मचारी कार्यालय बंद झाल्याची माहिती दडवून ठेवत गुंतवणूकदारांकडून आणि एजन्टकडून रकमा गुंतवणूक केल्या जात होत्या. दरम्यान, गुंतवणूकदार कार्यालयात आल्यानंतर त्यांना कार्यालय बंद दिसले. त्यांनी चौकशी केल्यानंतर कार्यालय बंद झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली.दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील चिखलगाव येथील सविता कातकडे या महिलेचेही ८३ हजार रुपये कंपनीने गंडविले. सविता कातकडे यांनी स्वत:सह पती आणि मुलाच्या नावाने साडेपाच वर्षासाठी रक्कम फिक्स डिपाझिट केली होती. शिवाय अन्य परिचयातील काही नारिकांनाही साईप्रकाशमध्ये रक्कम गुंतवणूक करण्यास सांगितले होते. त्यांच्या परिचयातील नागरिकांनी साईप्रकाशमध्ये २७ लाखांच्यावर रक्कम गुंतविली होती. तसेच जिल्ह्यातील एजन्टच्या माध्यमातून हजार ते बाराशे गुंतवणूकदारांनी येथे रक्कम गुंतवणूक केल्या आहेत. परंतु फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सविता कातकडे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात २ नोव्हेंबर रोजी कंपनी व्यवस्थापकासह १३ जणांविरोधात तक्रार दिली होती.कातकडे यांच्या तक्रारीच्या आधारे कंपनीचे व्यवस्थापक पुष्पेंद्रसिंग क्रिष्णप्रतापसिंग बघेल, दिलीपसिंग बघेल, चित्तरंजन मंडल, विलास उंदिरवाडे, हसमुख बांबोडे, ईश्वरसिंग गावंडे, मुकरु मांदाडे, छत्रपती वाळके, ओमप्रकाश सिंग, रेवनाथ वालदे, मनोहर गावंडे, अमझिरे, आदींविरोधात भादंवि ४२०, ४०६, ३४, पोटकलम ३, ४ तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे वित्तीय आस्थापनामधील हितसंबंधाचे रक्षण करण्याचे अधिनियम १९९९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शनिवारी काही गुंतवणूकदार आणि एजन्ट्सनी रामनगर पोलीस ठाण्यात गर्दी केल्याने तणावाची स्थिती होती. (शहर प्रतिनिधी)