शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

बंद कोळसा खाणीतून कोट्यवधींच्या कोळशाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:28 IST

तालुक्यातील बरांज मोकासा या भागातील कर्नाटका एम्टा ही खुली कोळसा खाण गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. सुरू असताना साठवून ठेवलेला जवळपास दीड लाख टन कोळसा चोरी जात असल्याची धक्कादायक माहिती सामोर आली आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी लक्ष द्यावे : दोन वर्षांपासून खाण आहे बंदस्टिंग आॅपरेशन

विनायक येसेकर।आॅनलाईन लोकमतभद्रावती : तालुक्यातील बरांज मोकासा या भागातील कर्नाटका एम्टा ही खुली कोळसा खाण गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. सुरू असताना साठवून ठेवलेला जवळपास दीड लाख टन कोळसा चोरी जात असल्याची धक्कादायक माहिती सामोर आली आहे. ‘लोकमत’ने या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता अनेक ठिकाणी वाहनांच्या चाकांच्या खुणा आढळून आल्या. आजपर्यंत या खाणीतून कोट्यवधी रुपयांचा कोळसा चोरीस गेला आहे. या प्रकारामुळे एम्टाचे सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाºयांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहे.शासनाने देशातील अनेक कोळसा खाणी बंद केल्या. त्यात तालुक्यातील बरांज मोकासा येथील कर्नाटका एम्टा या खुल्या कोळसा खाणीचासुद्धा समावेश आहे. ही कोळसा खाण मार्च २०१५ ला बंद करण्यात आली. खाण सुरू असताना काढलेला कोळसा एका ठिकाणी साठवून ठेवण्यात आला. परंतु बंदीमुळे तो त्या ठिकाणी तसाच राहिला. या ठिकाणी एम्टा कंपनीच्या सुरक्षा अधिकाºयांसह ५० च्या वर सुरक्षा कर्मचारी नियुक्त करून ठेवले आहे. बंदच्या काळात त्याठिकाणी कंपनीने काढून ठेवलेला दीड लाख टन कोळसा आता हळूहळू चोरी जात आहे. या कोळशाची किंमत हजारो कोटींच्या घरात आहे. या खाणीतून रात्री जेसीबीच्या साहाय्याने ट्रकांमध्ये कोळसा भरून वणी व इतर ठिकाणी विकला जात आहे. हे काम गेल्या वर्षभरापासून सर्रास सुरू आहे. याव्यतिरिक्त दररोज पहाटेच्या वेळेस २० ते २५ दुचाकी मोटारसायकलस्वार एकाच वेळी एका गाडीवर ४-४ पोती कोळसा भरून त्याची वाहतूक करीत आहे.कोळसा वाहतुकीच्या वाहनाने अपघातही घडलेआठवडाभरापूर्वी दुचाकीने कोळसा वाहतूक करताना एका चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकी वाहनधारक गंभीर जखमी झाल्याची घटना मानोरा फाट्याजवळ घडली होती. यापूर्वीही अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. करिता या प्रकरणाची जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. खाण चालू असताना स्टॉक रजिस्टरमध्ये नमुद केलेला कोळसा त्याठिकाणी उपलब्ध असणे गरजेचे आहे. आता कोळशाच्या भागाला आग लावून तो जळून राख झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे.