शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

माणिकगढ पहाडावरील नागरिकांचे कामाच्या शोधात स्थलांतर

By admin | Updated: November 28, 2015 02:07 IST

दृष्टचक्र आणि शासनाचा नियोजनाचा अभाव यामुळे स्वातंत्र्याच्या अर्धशतकानंतरही पहाडावरील नागरिकांच्या भाकरीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

जिवती : दृष्टचक्र आणि शासनाचा नियोजनाचा अभाव यामुळे स्वातंत्र्याच्या अर्धशतकानंतरही पहाडावरील नागरिकांच्या भाकरीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची पिके हातून गेली. त्यातच मिळालेल्या उत्पनालाही शासनाचा हमी भाव नाही. यामुळे पहाडावरील अनेक गावामधील मजुर यवतमाळ, वणी, कोरपना आदी ठिकाणी कापूस वेचणी करीता तर मराठवाड्यातील परभणी, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर आदी भागात ऊसतोड कामगार म्हणून स्थलांतरित होत आहेत. शाळकरी मुलांना सोबत घेवून अनेक जण जात असल्याने गेल्याने त्यांची लेखणीची बंद झाली आहे. माणिकगढ पहाडावरील नागरिकांचे स्थलांतर हा दरवर्षीचाच गंभीर प्रश्न आहे. दिवाळी झाली की, अख्खे गावचे गावच कामाच्या शोधात लहान-लहान मुलबाळांना घेवून भटकत असल्याने गावे ओस पडली आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यात सिंचनाच्या सोयी-सुविधा अपुऱ्या आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका वारंवार येथील शेतकऱ्यांना बसत असल्याने हंगाम संपण्यापूर्वीच पिकाची पानगळ होवून उत्पन्न कमी आणि खर्च अधिक होत आहे. यामुळे पहाडावरील शेतकऱ्यांचा कणाच मोडला जात असून कर्जाची परतफेडही होत नाही. त्यामुळे जगायचे कसे, व संसाराचा गाडा हाकायचा कसा, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. ग्रामीण भागातून कामाच्या शोधात बाहेर निघालेले मजुर काम मिळेल तिथे झोपड्या टाकून वास्तव्य करीत असले तरी आपली आर्थिक बाजू मजबूत व्हावी यासाठी दिवसंरात्र काम करून त्या ठिकाणी कसलीही सोयी-सुविधा नसतानाही आपल्या संसाराचा गाडा हाकतात. दरवर्षी पडणारा निसर्गाचा कोप दुष्काळामुळे होणारे स्थलांतर आणि स्थलांतरामुळे त्यांच्या मुलाबाळांचे होणारे शैक्षणिक नुकसान हे दरवर्षी होत असल्याने शासनाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम मिळवून देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)