शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

माणिकगढ पहाडावरील नागरिकांचे कामाच्या शोधात स्थलांतर

By admin | Updated: November 28, 2015 02:07 IST

दृष्टचक्र आणि शासनाचा नियोजनाचा अभाव यामुळे स्वातंत्र्याच्या अर्धशतकानंतरही पहाडावरील नागरिकांच्या भाकरीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

जिवती : दृष्टचक्र आणि शासनाचा नियोजनाचा अभाव यामुळे स्वातंत्र्याच्या अर्धशतकानंतरही पहाडावरील नागरिकांच्या भाकरीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची पिके हातून गेली. त्यातच मिळालेल्या उत्पनालाही शासनाचा हमी भाव नाही. यामुळे पहाडावरील अनेक गावामधील मजुर यवतमाळ, वणी, कोरपना आदी ठिकाणी कापूस वेचणी करीता तर मराठवाड्यातील परभणी, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर आदी भागात ऊसतोड कामगार म्हणून स्थलांतरित होत आहेत. शाळकरी मुलांना सोबत घेवून अनेक जण जात असल्याने गेल्याने त्यांची लेखणीची बंद झाली आहे. माणिकगढ पहाडावरील नागरिकांचे स्थलांतर हा दरवर्षीचाच गंभीर प्रश्न आहे. दिवाळी झाली की, अख्खे गावचे गावच कामाच्या शोधात लहान-लहान मुलबाळांना घेवून भटकत असल्याने गावे ओस पडली आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यात सिंचनाच्या सोयी-सुविधा अपुऱ्या आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका वारंवार येथील शेतकऱ्यांना बसत असल्याने हंगाम संपण्यापूर्वीच पिकाची पानगळ होवून उत्पन्न कमी आणि खर्च अधिक होत आहे. यामुळे पहाडावरील शेतकऱ्यांचा कणाच मोडला जात असून कर्जाची परतफेडही होत नाही. त्यामुळे जगायचे कसे, व संसाराचा गाडा हाकायचा कसा, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. ग्रामीण भागातून कामाच्या शोधात बाहेर निघालेले मजुर काम मिळेल तिथे झोपड्या टाकून वास्तव्य करीत असले तरी आपली आर्थिक बाजू मजबूत व्हावी यासाठी दिवसंरात्र काम करून त्या ठिकाणी कसलीही सोयी-सुविधा नसतानाही आपल्या संसाराचा गाडा हाकतात. दरवर्षी पडणारा निसर्गाचा कोप दुष्काळामुळे होणारे स्थलांतर आणि स्थलांतरामुळे त्यांच्या मुलाबाळांचे होणारे शैक्षणिक नुकसान हे दरवर्षी होत असल्याने शासनाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम मिळवून देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)