शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

माणिकगढ पहाडावरील नागरिकांचे कामाच्या शोधात स्थलांतर

By admin | Updated: November 28, 2015 02:07 IST

दृष्टचक्र आणि शासनाचा नियोजनाचा अभाव यामुळे स्वातंत्र्याच्या अर्धशतकानंतरही पहाडावरील नागरिकांच्या भाकरीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

जिवती : दृष्टचक्र आणि शासनाचा नियोजनाचा अभाव यामुळे स्वातंत्र्याच्या अर्धशतकानंतरही पहाडावरील नागरिकांच्या भाकरीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची पिके हातून गेली. त्यातच मिळालेल्या उत्पनालाही शासनाचा हमी भाव नाही. यामुळे पहाडावरील अनेक गावामधील मजुर यवतमाळ, वणी, कोरपना आदी ठिकाणी कापूस वेचणी करीता तर मराठवाड्यातील परभणी, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर आदी भागात ऊसतोड कामगार म्हणून स्थलांतरित होत आहेत. शाळकरी मुलांना सोबत घेवून अनेक जण जात असल्याने गेल्याने त्यांची लेखणीची बंद झाली आहे. माणिकगढ पहाडावरील नागरिकांचे स्थलांतर हा दरवर्षीचाच गंभीर प्रश्न आहे. दिवाळी झाली की, अख्खे गावचे गावच कामाच्या शोधात लहान-लहान मुलबाळांना घेवून भटकत असल्याने गावे ओस पडली आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यात सिंचनाच्या सोयी-सुविधा अपुऱ्या आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका वारंवार येथील शेतकऱ्यांना बसत असल्याने हंगाम संपण्यापूर्वीच पिकाची पानगळ होवून उत्पन्न कमी आणि खर्च अधिक होत आहे. यामुळे पहाडावरील शेतकऱ्यांचा कणाच मोडला जात असून कर्जाची परतफेडही होत नाही. त्यामुळे जगायचे कसे, व संसाराचा गाडा हाकायचा कसा, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. ग्रामीण भागातून कामाच्या शोधात बाहेर निघालेले मजुर काम मिळेल तिथे झोपड्या टाकून वास्तव्य करीत असले तरी आपली आर्थिक बाजू मजबूत व्हावी यासाठी दिवसंरात्र काम करून त्या ठिकाणी कसलीही सोयी-सुविधा नसतानाही आपल्या संसाराचा गाडा हाकतात. दरवर्षी पडणारा निसर्गाचा कोप दुष्काळामुळे होणारे स्थलांतर आणि स्थलांतरामुळे त्यांच्या मुलाबाळांचे होणारे शैक्षणिक नुकसान हे दरवर्षी होत असल्याने शासनाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम मिळवून देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)