शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

माणिकगढ पहाडावरील नागरिकांचे कामाच्या शोधात स्थलांतर

By admin | Updated: November 28, 2015 02:07 IST

दृष्टचक्र आणि शासनाचा नियोजनाचा अभाव यामुळे स्वातंत्र्याच्या अर्धशतकानंतरही पहाडावरील नागरिकांच्या भाकरीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

जिवती : दृष्टचक्र आणि शासनाचा नियोजनाचा अभाव यामुळे स्वातंत्र्याच्या अर्धशतकानंतरही पहाडावरील नागरिकांच्या भाकरीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची पिके हातून गेली. त्यातच मिळालेल्या उत्पनालाही शासनाचा हमी भाव नाही. यामुळे पहाडावरील अनेक गावामधील मजुर यवतमाळ, वणी, कोरपना आदी ठिकाणी कापूस वेचणी करीता तर मराठवाड्यातील परभणी, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर आदी भागात ऊसतोड कामगार म्हणून स्थलांतरित होत आहेत. शाळकरी मुलांना सोबत घेवून अनेक जण जात असल्याने गेल्याने त्यांची लेखणीची बंद झाली आहे. माणिकगढ पहाडावरील नागरिकांचे स्थलांतर हा दरवर्षीचाच गंभीर प्रश्न आहे. दिवाळी झाली की, अख्खे गावचे गावच कामाच्या शोधात लहान-लहान मुलबाळांना घेवून भटकत असल्याने गावे ओस पडली आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यात सिंचनाच्या सोयी-सुविधा अपुऱ्या आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका वारंवार येथील शेतकऱ्यांना बसत असल्याने हंगाम संपण्यापूर्वीच पिकाची पानगळ होवून उत्पन्न कमी आणि खर्च अधिक होत आहे. यामुळे पहाडावरील शेतकऱ्यांचा कणाच मोडला जात असून कर्जाची परतफेडही होत नाही. त्यामुळे जगायचे कसे, व संसाराचा गाडा हाकायचा कसा, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. ग्रामीण भागातून कामाच्या शोधात बाहेर निघालेले मजुर काम मिळेल तिथे झोपड्या टाकून वास्तव्य करीत असले तरी आपली आर्थिक बाजू मजबूत व्हावी यासाठी दिवसंरात्र काम करून त्या ठिकाणी कसलीही सोयी-सुविधा नसतानाही आपल्या संसाराचा गाडा हाकतात. दरवर्षी पडणारा निसर्गाचा कोप दुष्काळामुळे होणारे स्थलांतर आणि स्थलांतरामुळे त्यांच्या मुलाबाळांचे होणारे शैक्षणिक नुकसान हे दरवर्षी होत असल्याने शासनाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम मिळवून देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)