शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

‘बॅलेट’मधून सामाजिक समतेचा संदेश

By admin | Updated: May 20, 2014 23:31 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवन प्रवासात मानव मुल्यांची जोपासना करणारे कार्य केले. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष केला. सामाजिक व राजकीय सन्मान

बल्लारपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवन प्रवासात मानव मुल्यांची जोपासना करणारे कार्य केले. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष केला. सामाजिक व राजकीय सन्मान मिळवून देण्यासाठी न्याय हक्काची लढाई लढले, याचे दाखले नि:शुल्क असलेल्या ‘बॅलेट’ नाटकाच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश बल्लारपूरकरांना दिला. येथील कल्याण मित्र बहुउद्देशीय संस्था व अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीच्यावतीने येथील सुभाष लॉन परिसरात नुकताच ‘बॅलेट’ नाटकांचा प्रयोग घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रजनी हजारे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून संजय डुंबेरे, माजी आमदार अ‍ॅड. एकनाथ साळवे, चंद्रशेखर गेडाम, कल्याण मित्र संस्थेचे अध्यक्ष जे.टी. रंगारी, सचिव देवराव मेश्राम, अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज वाळके, सचिव आनंदराव ठमके, नत्थू रामटेके, प्रभुदास देवगडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. रजनी हजारे म्हणाल्या, संस्था ही समाजाच्या उत्थानासाठी असली पाहिजे. समाज हिताचे कार्य त्यातून घडते अपेक्षित आहे. यासाठी संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी एकनिष्ठेने कार्य करून लोकाभिमुख कामाला चालना देण्यासाठी झटण्याचा सल्ला त्यांनी भाषणातून दिला. प्रास्ताविक बी.बी. भगत, संचालन सचिव फुलझेले तर आभार पृथ्वीराज वाळके यांनी मानले. यावेळी रामदास आटे, भीमराव भगत, भानुदास गवई, कमलाकर रामटेके, तुळशीराम नगराळे, विष्णू वाकडे, धोपटे, ईश्वर सोमकुंवर, निमसटकर, प्रा. मालती कवाडे, मुख्याध्यापक रत्नमाला वाळके, मेश्राम, अलोने, झांबरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)