शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

‘बॅलेट’मधून सामाजिक समतेचा संदेश

By admin | Updated: May 20, 2014 23:31 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवन प्रवासात मानव मुल्यांची जोपासना करणारे कार्य केले. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष केला. सामाजिक व राजकीय सन्मान

बल्लारपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवन प्रवासात मानव मुल्यांची जोपासना करणारे कार्य केले. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष केला. सामाजिक व राजकीय सन्मान मिळवून देण्यासाठी न्याय हक्काची लढाई लढले, याचे दाखले नि:शुल्क असलेल्या ‘बॅलेट’ नाटकाच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश बल्लारपूरकरांना दिला. येथील कल्याण मित्र बहुउद्देशीय संस्था व अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीच्यावतीने येथील सुभाष लॉन परिसरात नुकताच ‘बॅलेट’ नाटकांचा प्रयोग घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रजनी हजारे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून संजय डुंबेरे, माजी आमदार अ‍ॅड. एकनाथ साळवे, चंद्रशेखर गेडाम, कल्याण मित्र संस्थेचे अध्यक्ष जे.टी. रंगारी, सचिव देवराव मेश्राम, अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज वाळके, सचिव आनंदराव ठमके, नत्थू रामटेके, प्रभुदास देवगडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. रजनी हजारे म्हणाल्या, संस्था ही समाजाच्या उत्थानासाठी असली पाहिजे. समाज हिताचे कार्य त्यातून घडते अपेक्षित आहे. यासाठी संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी एकनिष्ठेने कार्य करून लोकाभिमुख कामाला चालना देण्यासाठी झटण्याचा सल्ला त्यांनी भाषणातून दिला. प्रास्ताविक बी.बी. भगत, संचालन सचिव फुलझेले तर आभार पृथ्वीराज वाळके यांनी मानले. यावेळी रामदास आटे, भीमराव भगत, भानुदास गवई, कमलाकर रामटेके, तुळशीराम नगराळे, विष्णू वाकडे, धोपटे, ईश्वर सोमकुंवर, निमसटकर, प्रा. मालती कवाडे, मुख्याध्यापक रत्नमाला वाळके, मेश्राम, अलोने, झांबरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)