शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

‘बॅलेट’मधून सामाजिक समतेचा संदेश

By admin | Updated: May 20, 2014 23:31 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवन प्रवासात मानव मुल्यांची जोपासना करणारे कार्य केले. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष केला. सामाजिक व राजकीय सन्मान

बल्लारपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवन प्रवासात मानव मुल्यांची जोपासना करणारे कार्य केले. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष केला. सामाजिक व राजकीय सन्मान मिळवून देण्यासाठी न्याय हक्काची लढाई लढले, याचे दाखले नि:शुल्क असलेल्या ‘बॅलेट’ नाटकाच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश बल्लारपूरकरांना दिला. येथील कल्याण मित्र बहुउद्देशीय संस्था व अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीच्यावतीने येथील सुभाष लॉन परिसरात नुकताच ‘बॅलेट’ नाटकांचा प्रयोग घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रजनी हजारे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून संजय डुंबेरे, माजी आमदार अ‍ॅड. एकनाथ साळवे, चंद्रशेखर गेडाम, कल्याण मित्र संस्थेचे अध्यक्ष जे.टी. रंगारी, सचिव देवराव मेश्राम, अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज वाळके, सचिव आनंदराव ठमके, नत्थू रामटेके, प्रभुदास देवगडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. रजनी हजारे म्हणाल्या, संस्था ही समाजाच्या उत्थानासाठी असली पाहिजे. समाज हिताचे कार्य त्यातून घडते अपेक्षित आहे. यासाठी संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी एकनिष्ठेने कार्य करून लोकाभिमुख कामाला चालना देण्यासाठी झटण्याचा सल्ला त्यांनी भाषणातून दिला. प्रास्ताविक बी.बी. भगत, संचालन सचिव फुलझेले तर आभार पृथ्वीराज वाळके यांनी मानले. यावेळी रामदास आटे, भीमराव भगत, भानुदास गवई, कमलाकर रामटेके, तुळशीराम नगराळे, विष्णू वाकडे, धोपटे, ईश्वर सोमकुंवर, निमसटकर, प्रा. मालती कवाडे, मुख्याध्यापक रत्नमाला वाळके, मेश्राम, अलोने, झांबरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)