शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

वृक्ष लागवडीतून ‘वननिर्मिती’चा संदेश द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:51 IST

संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षलागवड ही एक चळवळ झाली आहे. पुढच्या पिढीसाठी वृक्ष लागवड आवश्यक असल्याची प्रत्येक नागरिकाची भावना आहे. मात्र हा मनामनातील वृक्ष लागवडीचा संदेश वननिर्मितीत परावर्तीत होऊ द्या, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : पावसाच्या सलामीने चंद्रपूरमध्ये वृक्षदिंडीला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षलागवड ही एक चळवळ झाली आहे. पुढच्या पिढीसाठी वृक्ष लागवड आवश्यक असल्याची प्रत्येक नागरिकाची भावना आहे. मात्र हा मनामनातील वृक्ष लागवडीचा संदेश वननिर्मितीत परावर्तीत होऊ द्या, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.जिल्हा परिषदेमार्फत बुधवारी आयोजित वृक्षदिंडीच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. पावसाळी वातावरणात उत्साहात वृक्षदिंडीला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, आज वनाचा मोठ्या प्रमाणात होणारा ºहास बघता वृक्ष लागवड किती आवश्यक आहे, याबाबत जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. राज्यभर वृक्ष लागवड मोहीमेला उत्सवाचे स्वरुप आले आहे. चंद्रपूर जिल्ह्याने गेल्या वर्षी ४ कोटी वृक्ष लागवडीमध्ये भरीव कार्य केले होते. यावर्षी देखील १३ कोटी वृक्ष लागवडीमध्ये चांगला सहभाग दर्शवा, असे आवाहनही केले.व्यासपीठावर आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, कृषी सभापती अर्चना जिवतोडे, महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, मनपा स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक रविंद्र शिवदास, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले व अन्य अधिकारी उपस्थित होतेयावेळी आ. श्यामकुळे यांनी ना. मुनगंटीवार यांनी २ कोटी, ४ कोटी आणि आता १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प घेतला असून मागील मोहीमेप्रमाणेच यावर्षी देखील ही मोहीम यशस्वी होईल. ना. मुनगंटीवार यांच्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात जागतिक स्तरावरचे उपक्रम, योजना राबविल्या जात आहे. चंद्रपूरमध्ये वाघांची संख्या वाढली. पर्यटक वाढले, वेगवेगळया योजना, उपक्रमातून जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर गेले आहे, असे सांगितले.जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होणार असून ते वृक्षाचे संगोपण करतील, असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेतर्फे तयार करण्यात आलेल्या वृक्षदिंडीच्या चित्ररथाला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.वृक्षाची निगा राखण्यासाठी ‘रिपोर्ट कार्ड’या वृक्षदिंडीच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने सलामी दिली. जिल्हा परिषदेने राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या मोहीमेमध्ये १२ लक्ष वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट घेतले आहे. जिल्हा परिषद १५७१ शाळांमधील १ लाख २५ हजार विद्यार्थ्यांना एक झाड लावायला देणार आहे. त्याची निगा राखण्यासाठी वृक्षसंवर्धन कृषी कार्यक्रम तयार करण्यात आला असून महिनावार रोपाची निगा राखल्याची माहिती भरता यावे, असे रिपोर्टकार्ड तयार करण्यात आले आहे. असेच रिपोर्टकार्ड कर्मचाऱ्यांनाही देण्यात आले आहे. या दोन्ही रिपोर्टकार्डचे प्रकाशन ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते कार्यक्रमादरम्यान करण्यात आले.ग्रीन आर्मीत ८ हजार ५०० वृक्षप्रेमींची नोंदप्रास्ताविकातून मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले, वृक्ष लागवडीच्या मोहिमेला बळकटी देणाºया ग्रीन आर्मी नोंदणीला जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यासाठी आतापर्यंत ८५०० वृक्षप्रेमींची नोंद करण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचारी व प्रत्येक विद्यार्थी एक झाड लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.