शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

वृक्ष लागवडीतून ‘वननिर्मिती’चा संदेश द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:51 IST

संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षलागवड ही एक चळवळ झाली आहे. पुढच्या पिढीसाठी वृक्ष लागवड आवश्यक असल्याची प्रत्येक नागरिकाची भावना आहे. मात्र हा मनामनातील वृक्ष लागवडीचा संदेश वननिर्मितीत परावर्तीत होऊ द्या, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : पावसाच्या सलामीने चंद्रपूरमध्ये वृक्षदिंडीला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षलागवड ही एक चळवळ झाली आहे. पुढच्या पिढीसाठी वृक्ष लागवड आवश्यक असल्याची प्रत्येक नागरिकाची भावना आहे. मात्र हा मनामनातील वृक्ष लागवडीचा संदेश वननिर्मितीत परावर्तीत होऊ द्या, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.जिल्हा परिषदेमार्फत बुधवारी आयोजित वृक्षदिंडीच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. पावसाळी वातावरणात उत्साहात वृक्षदिंडीला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, आज वनाचा मोठ्या प्रमाणात होणारा ºहास बघता वृक्ष लागवड किती आवश्यक आहे, याबाबत जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. राज्यभर वृक्ष लागवड मोहीमेला उत्सवाचे स्वरुप आले आहे. चंद्रपूर जिल्ह्याने गेल्या वर्षी ४ कोटी वृक्ष लागवडीमध्ये भरीव कार्य केले होते. यावर्षी देखील १३ कोटी वृक्ष लागवडीमध्ये चांगला सहभाग दर्शवा, असे आवाहनही केले.व्यासपीठावर आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, कृषी सभापती अर्चना जिवतोडे, महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, मनपा स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक रविंद्र शिवदास, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले व अन्य अधिकारी उपस्थित होतेयावेळी आ. श्यामकुळे यांनी ना. मुनगंटीवार यांनी २ कोटी, ४ कोटी आणि आता १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प घेतला असून मागील मोहीमेप्रमाणेच यावर्षी देखील ही मोहीम यशस्वी होईल. ना. मुनगंटीवार यांच्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात जागतिक स्तरावरचे उपक्रम, योजना राबविल्या जात आहे. चंद्रपूरमध्ये वाघांची संख्या वाढली. पर्यटक वाढले, वेगवेगळया योजना, उपक्रमातून जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर गेले आहे, असे सांगितले.जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होणार असून ते वृक्षाचे संगोपण करतील, असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेतर्फे तयार करण्यात आलेल्या वृक्षदिंडीच्या चित्ररथाला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.वृक्षाची निगा राखण्यासाठी ‘रिपोर्ट कार्ड’या वृक्षदिंडीच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने सलामी दिली. जिल्हा परिषदेने राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या मोहीमेमध्ये १२ लक्ष वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट घेतले आहे. जिल्हा परिषद १५७१ शाळांमधील १ लाख २५ हजार विद्यार्थ्यांना एक झाड लावायला देणार आहे. त्याची निगा राखण्यासाठी वृक्षसंवर्धन कृषी कार्यक्रम तयार करण्यात आला असून महिनावार रोपाची निगा राखल्याची माहिती भरता यावे, असे रिपोर्टकार्ड तयार करण्यात आले आहे. असेच रिपोर्टकार्ड कर्मचाऱ्यांनाही देण्यात आले आहे. या दोन्ही रिपोर्टकार्डचे प्रकाशन ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते कार्यक्रमादरम्यान करण्यात आले.ग्रीन आर्मीत ८ हजार ५०० वृक्षप्रेमींची नोंदप्रास्ताविकातून मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले, वृक्ष लागवडीच्या मोहिमेला बळकटी देणाºया ग्रीन आर्मी नोंदणीला जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यासाठी आतापर्यंत ८५०० वृक्षप्रेमींची नोंद करण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचारी व प्रत्येक विद्यार्थी एक झाड लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.