शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेच्या आदल्या रात्रीच धडकला ‘रद्द’चा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:30 IST

राज्य शासनाने आरोग्य विभागातर्फे राज्यभरात गट ‘क’मध्ये २७२५ तर, गट ‘ड’मध्ये ३४६६ पदे भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. यासाठी ...

राज्य शासनाने आरोग्य विभागातर्फे राज्यभरात गट ‘क’मध्ये २७२५ तर, गट ‘ड’मध्ये ३४६६ पदे भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. यासाठी राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. गट ‘क’साठीची परीक्षा २६ सप्टेंबरला नागपूर येथे तर गट ‘ड’साठी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध केंद्रांवर होणे अपेक्षित होते. तसे प्रवेशपत्रही परीक्षार्थ्यांना मिळाले होते. परीक्षा केंद्र वेळेत गाठण्याच्या उद्देशाने अनेक परीक्षार्थी २५ सप्टेंबरलाच नागपूर येथे पोहोचले होते. मात्र रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान परीक्षार्थ्यांना परीक्षा रद्द झाल्याचा मेसेज धडकला. त्यामुळे परीक्षार्थी संतप्त झाले. त्यांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून शासनाच्या अशा निर्णयाबद्दल रोष व्यक्त केला.

बॉक्स

आमचे पैसे देणार कोण?

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ५०० ते १००० रुपयांपर्यंतचे चलान भरले. जिल्ह्यात परीक्षा घेण्यासाठी केंद्र उपलब्ध असतानाही गट ‘ड’साठी नागपूर परीक्षा केंद्र देण्यात आले. अनेकांनी परीक्षा केंद्र वेळत गाठण्यासाठी नागपूरचा प्रवासही केला होता. तर काही वाटेतच असताना त्यांना परीक्षा रद्द झाल्याचा मेसेज धडकला. त्यामुळे विनाकारण प्रवासासाठी ५०० ते ६०० रुपयांचा भुर्दंड परीक्षार्थ्यांना बसला आहे. आमचे विनाकारण खर्च झालेले हे पैसे देणार कोण, असा प्रश्न हे परीक्षार्थी सोशल मीडियावर सरकारला विचारत आहेत.

कोट

माझा कनिष्ठ लिपिक पदाचा पेपर नागपूरला होता. वेळेवर पोहोचता येईल म्हणून मी आदल्याच दिवशी नागपूरला गेलो आणि परीक्षा रद्द झाल्याचे कळले. आई-वडिलांनी गरिबीचे ओझे दूर करण्यासाठी आम्हाला स्पर्धा परीक्षेत उतरविले. परंतु, या बिनडोक्याच्या सरकारने ऐनवेळी परीक्षा रद्द केली. जाण्या-येण्यासाठी जवळपास ६०० रुपये खर्च आला. ते पैसे आता कोण भरून देणार?

- सूरज गुरनुले, परीक्षार्थी

----

कोट

कोरोनामध्ये अनेक परीक्षा रद्द झाल्या. परंतु, देशावर ओढावलेले ते संकट असल्याने आम्ही समजू शकलो. परंतु, आता सर्व सुरळीत असताना परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करून ऐनवेळी परीक्षा रद्द करणे म्हणजेच विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी खेळ करणे होय. मीसुद्धा परीक्षेच्या दृष्टीने नागपूर येथे गेलेलो होतो. परीक्षा रद्द झाल्याने विनाकारण आर्थिक भुर्दंड बसला आहे.

- चेतन रामटेके, परीक्षार्थी