शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

पुरुषांना वाटतेय कुटुंब नियोजनाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:35 IST

बल्लारपूर : तालुक्यात महिलांच्या तुलनेत पुरुषांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया नगण्य आहे. नसबंदीबाबत पुरुषांच्या मनातील गैरसमज अद्यापही दूर झाले नसल्याची ...

बल्लारपूर : तालुक्यात महिलांच्या तुलनेत पुरुषांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया नगण्य आहे. नसबंदीबाबत पुरुषांच्या मनातील गैरसमज अद्यापही दूर झाले नसल्याची बाब कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेच्या पुरुषांच्या आकडेवारीवरून लक्षात येते. गेल्या दोन वर्षात बल्लारपूर तालुक्यात दोन वर्षात केवळ २४ पुरुषांनीच ही शस्त्रक्रिया केली आहे. यातुलनेत ४१८ महिलांनी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.

देशातील वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रणासाठी कुटुंबकल्याण कार्यक्रम सुरू करण्यात आला. मात्र तालुक्यातील गेल्या दोन वर्षांची आकडेवारी बघितल्यास या कार्यक्रमास मिळणारा प्रतिसाद चिंताजनक आहे. कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्याकडे स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचा वाटा अल्पसा आहे. यामागे पुरुषी अहंकार कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. शासनाने कुटुंबकल्याण योजनांसाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. सावित्रीबाई फुले योजनेंतर्गत सवलती दिल्या आहेत. स्त्रियांसोबत पुरुषांसाठीही शस्त्रक्रियेची सुविधा आहे. त्यासाठी प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून रोख रकमेची तरतूद आहे. तरीसुद्धा पुरुष शस्त्रक्रियेसाठी समोर येत नाही.

पुरुषांच्या शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट कागदावरच

बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विसापूर या आरोग्य केंद्रात २०१९-२०२० या वर्षात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट १०४ होते. परंतु ८ पुरुष व ३६ स्त्रियांवरच शस्त्रक्रिया झाली. कोठारी आरोग्य केंद्राचे उद्दिष्ट १११ होते, परंतु ३ पुरुष व ५१ स्त्रियांवर शस्त्रक्रिया झाली. तर बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात केवळ १३ पुरुषांवर व १७५ स्त्रियांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत कोठारी आरोग्य केंद्रात ७ स्त्रिया व विसापूर केंद्रात १८ स्त्रियांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तर बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात एकाही पुरुषावर शस्त्रक्रिया झाली नाही. मात्र १३१ स्त्रियांची शस्त्रक्रिया करण्यात आली, हे विशेष. तालुक्यातील बल्लारपूर, कोठारी व विसापूर या आरोग्य केंद्रावर गेल्या दोन वर्षात केवळ २४ पुरुष व ४१८ स्त्रियांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

पुरुषांमध्ये असेही गैरसमज

शस्त्रक्रिया केल्याने आपण कमजोर होतो, हा गैरसमज पुरुषांमध्ये आहे. आता पद्धत बदललेली आहे. शस्त्रक्रिया अयशस्वी होत नाही. मात्र याबाबत आवश्यक ती करण्याची गरज आहे. यासोबतच स्त्रियांच्या वेदनाही पुरुषांनी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

- डॉ. प्रकाश नगराळे, तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर.