शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया-बल्लारशाह मार्गावर धावणार ‘डेमो’ऐवजी ‘मेमो’ रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:20 IST

गोंदिया- बल्लारशाह मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात १५ मार्चपासून बदल केल्या जाणार आहे. या मार्गावर आता पॅसेंजरऐवजी ‘मेमो’ गाड्या धावणार आहे. यामध्ये शौचालय व अन्य सुविधा नसल्यामुळे अडचण होणार असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देरेल्वे विभागाचा निर्णय : सुविधा नसल्याचा प्रवाशांचा आरोप

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : गोंदिया- बल्लारशाह मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात १५ मार्चपासून बदल केल्या जाणार आहे. या मार्गावर आता पॅसेंजरऐवजी ‘मेमो’ गाड्या धावणार आहे. यामध्ये शौचालय व अन्य सुविधा नसल्यामुळे अडचण होणार असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.१९९६-९७ रोजी गोंदिया- बल्लारशाह नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्राँडगेजमध्ये रूपांतर झाल्यापासून रेल्वेसेवा अव्याहत सुरू आहे. सुरूवातीला काही महिने या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये शौचालयाची सुविधा नव्हती. त्यामुळे प्रवाशांनी रोष व्यक्त करून शौचालय सुविधायुक्त गाड्या सुरू करण्याची मागणी केली. रेल्वे प्रशासनाने या मागणी दखल घेऊन शौचालययुक्त डेमो गाड्या सुरू केल्या. सध्याच्या पॅसेंजर गाडीतही सुविधा आहेत. मात्र पॅसेंजर बंद करून त्याऐवजी नवीन मेमो गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. १५ मार्चपासून या गाड्यांची सुरूवात होणार आहे. मात्र, या गाड्या प्रवाशांसाठी असुविधाजनक असल्याची माहिती पुढे आली. अनेक ठिकाणी प्लॉटफार्मची उंची-कमी अधिक असल्याने वृद्ध व महिला प्रवाशांना गाडीत चढणे व उतरणे त्रासदायक होणार आहे. नवीन मेमो गाड्यांमध्ये पॅसेंजरपेक्षा कमी डब्बे राहणार आहेत. गोंदिया ते बल्लारशाह हे अंतर २५० किमीचे आहे. यामध्ये लहान-मोठी अनेक रेल्वेस्थानके आहेत. या स्थानकांवरून रोज हजारो प्रवाशी प्रवास करतात. प्रवाशांची संख्या लक्षात घेतल्यास नवीन मेमो गाड्या उपयुक्त ठरणार नाही. यातून प्रवाशांची डोकेदुखी वाढणार आहे.बल्लारशाह- गोंदिया मार्गावर सुरू होणाºया मेमो गाड्या पूर्णत: असुविधाजनक आहेत. या गाड्यांमध्ये शौचालयाची सुविधा नाही. डब्बे कमी असणार आहेत. प्रवासाच्या दृष्टीने उपयुक्त नसल्याने रेल्वे प्रशासनाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा.- संजय गजपुरेविभागीय सदस्य, रेल्वे सल्लागार समिती