शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ३० अतिसंवेदनशील गावांमध्ये शांतता बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 22:18 IST

वनविभाग ब्रह्मपुरी व वाईल्ड लाइफ ट्रस्ट आॅफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्मपुरी वनविभागातील ३० अतिसंवेदनशील गावांमध्ये शांतता बैठकीचे आयोजन सन २०१७-१८ या कालावधीमध्ये करण्यात आले.

ठळक मुद्देगावकऱ्यांनीही सांगितल्या समस्या : विविध विषयांवर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : वनविभाग ब्रह्मपुरी व वाईल्ड लाइफ ट्रस्ट आॅफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्मपुरी वनविभागातील ३० अतिसंवेदनशील गावांमध्ये शांतता बैठकीचे आयोजन सन २०१७-१८ या कालावधीमध्ये करण्यात आले. या बैठकांचे आयोजन गावाच्या मुख्य चौकात, जि.प. शाळा तसेच ग्रामपंचायत भवन परिसरात गावातील पुरुष, महिला, विद्यार्थी, वनविभागाचे कर्मचारी, वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडियाचे पदाधिकारी, गावातील वनसंवर्धनाशी निगडित विविध समित्यांच्या पदाधिकाºयांच्या उपस्थितीत करण्यात आले. सर्वांचा सहभाग या बैठकींमध्ये असावा, या उद्देशाने सायंकाळी ६ वाजताची वेळ ठरविण्यात आली.बैठकीची सुरूवात सर्वांचा परिचय करून गाव, जंगल व जमीन यांचा सहसंबंध दर्शविणारा गावाचा गुगल नकाशा प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवण्यात आला. तसेच ताडोबा-नवेगाव व नागझिरा या मध्ये भारतातील संवधित क्षेत्रांना कशा पद्धतीने गावाचे जंगल जोडले आहे, याबाबत चर्चा करण्यात आली. मानव-वन्यजीव संघर्ष गावात होण्याचे विविध कारणे शोधण्याचा प्रयत्न बैठकीच्या माध्यमातून करण्यात आला. मुख्यत: मोह, तेंदू व इतर गौण वनोपज गोळा करताना तसेच शौचास बाहेर गेल्यास सर्वात जास्त मानव वन्यजीव संघर्ष झाल्याचे गावकºयांनी सांगितले. यावेळी गावकºयांनी घ्यावयाची काळजी यावर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. सर्वांनी शौचालय बांधणे अतिआवश्यक आहे. यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे आवश्यक आहे. गौण वनोपज गोळा करताना, शेतीचे काम एकट्याने न करता समुहाने करणे आवश्यक आहे, असे वाईल्ड लाइफ ट्रस्ट आॅफ इंडियाचे फिल्ड आॅफीसर महेंद्र राऊत यांनी सांगितले. बैठकीत वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडियाचे पशुवैद्यकीय डॉक्टर, विज्ञान तज्ज्ञ, सामाजिक तज्ज्ञ यांनी उपस्थित राहून प्रत्येकजण त्यांच्या विषयाला घेवून गावकºयांशी चर्चा केली. एकात्मिक वाघ अधिवास संवर्धन प्रकल्प आययुसीएन, केएफडब्ल्यू, कोआॅपरेशन, वनविभाग व वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया यांच्या मदतीने जानेवारी २०१७ पासून या भागात आरआरटी व पीआरटी टीम काम करीत आहे. गावकºयांनी त्यांचे प्रश्न बैठकीमध्ये सांगितल्याने वनकर्मचाºयांच्या उपस्थितीमध्ये त्यावर चर्चा करण्यात आली.