शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

समीरच्या आजारापुढे वैद्यकशास्त्रही पांगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:07 IST

अलिकडे वैद्यक शास्त्राने चांगलीच प्रगती केली आहे. अनेक रोगांवर त्यांनी उपचार पद्धती शोधली आहे. हृदय ट्रान्सप्लांटसारख्या शस्त्रक्रियाही करण्याचे तंत्रज्ञान त्यांनी शोधले आहे.

ठळक मुद्देउपचारच नाही : १४ वर्षीय समीर मस्क्युलरडिस्ट्रफी नावाच्या आजाराने ग्रस्त

आशिष घुमे ।लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : अलिकडे वैद्यक शास्त्राने चांगलीच प्रगती केली आहे. अनेक रोगांवर त्यांनी उपचार पद्धती शोधली आहे. हृदय ट्रान्सप्लांटसारख्या शस्त्रक्रियाही करण्याचे तंत्रज्ञान त्यांनी शोधले आहे. मात्र समीरला झालेल्या मस्क्युलर डिस्ट्रफी या आजारापुढे वैद्यक शास्त्राने हात टेकले असून अजून कुठलीही उपचारपद्धती शोधण्यास वैद्यकशास्त्र असमर्थ ठरत आहे.या धकाधकीच्या जीवनात नवनवीन आजार समोर येत आहेत. चिकनगुनिया असो की मग बर्ड फ्ल्यू, असे नवीनच आजार नागरिकांना जडत आहेत. या रोगावर उपचारपद्धती वैधक शास्त्राने शोधून काढली आहे. मात्र वरोरा शहरातील कॉलरी वॉर्ड येथील रहिवासी नरेश वाटकर यांच्या मुलाला गेल्या काही वर्षांपासून मस्क्युलर डिस्ट्रफी या नावाच्या मासपेशींच्या आजाराने ग्रासले आहे. त्यांनी जिल्हातील तसेच विदर्भातील संपूर्ण दवाखाने पालथे घालूनही त्यांचा मुलाचा उपचार होऊ शकला नाही.वैद्यक शास्त्रात या आजारावर उपचार पद्धती किंवा कुठलेही औषध अजूनही शोधले नाही, असे म्हणत त्यांना परत पाठविले. वर्धा येथील एका नामवंत दवाखान्यात समीरला जवळपास एक महिना भरती करून ठेवले होते. त्याच्या रोगाबद्दल तेथील डॉक्टरांनी विदेशात झालेल्या कान्फरन्समध्ये चर्चाही केली. मात्र हा रोग नेमका कसा होतो आणि त्याच्यावर उपाय काय, हे कुणीही सांगू शकले नाही, समीरचे वडील नरेश वाटकर यांनी सांगितले.तालुकयातील आमडी (वंडकेश्वर) या गावातील मूळ रहिवासी वाटकर दाम्पत्याला एक मुलगीव एक मुलगा आहे. त्यात १४ वषार्पूर्वी समीरचा जन्म झाला. जन्माच्या वेळी व वयाच्या ७ वर्षापर्यंत सामान्य असणारा समीर पहिल्या वर्गात शिक्षण घेत होता. सामान्य मुलांना जसे आजार होतात, तसेच त्यालाही व्हायचे. त्याचे आई-वडील त्याला शहरातील जनरल फिजीशियनकडे दाखवायचे. औषधोपचार केला की तो बरा व्हायचा. शाळेत पहिल्या वर्गात असताना वैद्यकीय तपासणीकरिता एक चमू शाळेत आली होती. त्यांनी समीरची आणि इतर मुलांची तपासणी केली. त्यात समीरला मस्क्युलर डिस्ट्रफी नावाचा आजार झाला असल्याचे निष्पन्न झाले.आधी फिजीओथेरपी आणि काही दिवसानंतर त्याला शहरातील संपूर्ण खासगी दवाखान्यात तसेच चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालय तसेच इतर खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. सर्व उपाय करून थकल्यावर त्यांनी वर्धा येथील एका नामवंत दवाखान्यात समीरला नेले. तिथे त्याच्या पूर्ण तपासण्या केल्या. मात्र त्याला झालेल्या रोगावर कुठलीही औषधी नसून वैद्यकशास्त्रात कुठलाच उपचार नसल्याचे सांगून त्याला घरी पाठविण्यात आले. आता समीर १४ वर्षांचा झाला असून त्याला ९० टक्के अपंगत्व आले आहे.स्वत:च्या हाताने तो जेऊही शकत नाही. प्रचंड अशक्तपणा त्याला आला आहे. त्याला बरा करणे आज वैद्यक शास्त्रापुढे मोठे आव्हान असून ते कोण पेलेल, याकडे शहरवासींचे लक्ष लागले आहे.