शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आदेशाच्या २१ दिवसांनंतरही वैद्यकीय अधिकारी रुजू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST

जिवती : आरोग्य विभागाच्या व ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले टेकामांडवा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अखेर ...

जिवती : आरोग्य विभागाच्या व ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले टेकामांडवा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अखेर सुरू झाले. मात्र, यंत्रणा नसल्याने या उपकेंद्रात शेळ्या-मेंढ्या बांधल्या जात होत्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना महिला संघटिका सिंधूताई जाधव यांनी १५ दिवसांच्या आत उपकेंद्र कार्यान्वित न झाल्यास मुर्दा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. याची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी अवघ्या २४ तासांतच रुग्णालय सुरू करण्याचे आदेश व वैद्यकीय अधिकारी म्हणून श्रद्धा माडूरवार यांची नियुक्ती केली. मात्र, २१ दिवस उलटूनही त्या रुग्णालयात हजर झाल्या नाहीत.

दोन दिवसांत टेकामांडवा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर हजर न झाल्यास जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव घालण्यात येईल, अशा इशारा शिवसेना महिला संघटिका सिंधूताई जाधव यांनी दिला आहे.

परिसरातील जनतेला आरोग्याची सुविधा मिळावी, या हेतूने पाच ते सहा वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून येथे आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात आली. मात्र, कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. मात्र, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी २८ जून २०२१ ला आदेश पत्र काढून डॉ. श्रद्धा माडूरवार यांची नियुक्ती केली होती. मात्र, या डॉक्टर येण्यास नकार देत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे इमारत बांधून तशीच ओसाड पडून आहे. यामुळे परिसरातील सामान्य नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे.

२१ दिवसांचा कालावधी लोटूनही कुठलीच दखल न घेतल्यामुळे आता निवेदन नाही तर सरळ हल्लाबोल, असे म्हणत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव घालृू, असा इशारा शिवसेना महिला संघटिका सिंधूताई जाधव यांनी दिला आहे.

बॉक्स

आरोग्यसेवेसाठी आर्थिक भुर्दंड

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी नियुक्ती आदेश काढून डॉ. श्रद्धा माडूरवार यांच्याकडे या रुग्णालयाची सूत्रे सोपविण्यात आली होती; पण २१ दिवस उलटूनही त्या येथे रुजू झाल्या नाहीत. यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून रुग्णालयाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना आणि परिसरातील नागरिकांची कोरोनाकाळात गैरसोय होत आहे. आजार झाल्यास अकारण खासगी रुग्णालय किंवा जिवती येथील रुग्णालयात जावे लागते. यात गोरगरीब नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.

190721\img-20210719-wa0111.jpg

सिंधुताई जाधव