शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
5
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
6
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
7
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
8
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
9
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
10
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
11
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
12
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
13
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
14
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
15
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
16
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
17
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
18
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
19
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
20
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

आदेशाच्या २१ दिवसांनंतरही वैद्यकीय अधिकारी रुजू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST

जिवती : आरोग्य विभागाच्या व ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले टेकामांडवा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अखेर ...

जिवती : आरोग्य विभागाच्या व ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले टेकामांडवा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अखेर सुरू झाले. मात्र, यंत्रणा नसल्याने या उपकेंद्रात शेळ्या-मेंढ्या बांधल्या जात होत्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना महिला संघटिका सिंधूताई जाधव यांनी १५ दिवसांच्या आत उपकेंद्र कार्यान्वित न झाल्यास मुर्दा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. याची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी अवघ्या २४ तासांतच रुग्णालय सुरू करण्याचे आदेश व वैद्यकीय अधिकारी म्हणून श्रद्धा माडूरवार यांची नियुक्ती केली. मात्र, २१ दिवस उलटूनही त्या रुग्णालयात हजर झाल्या नाहीत.

दोन दिवसांत टेकामांडवा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर हजर न झाल्यास जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव घालण्यात येईल, अशा इशारा शिवसेना महिला संघटिका सिंधूताई जाधव यांनी दिला आहे.

परिसरातील जनतेला आरोग्याची सुविधा मिळावी, या हेतूने पाच ते सहा वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून येथे आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात आली. मात्र, कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. मात्र, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी २८ जून २०२१ ला आदेश पत्र काढून डॉ. श्रद्धा माडूरवार यांची नियुक्ती केली होती. मात्र, या डॉक्टर येण्यास नकार देत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे इमारत बांधून तशीच ओसाड पडून आहे. यामुळे परिसरातील सामान्य नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे.

२१ दिवसांचा कालावधी लोटूनही कुठलीच दखल न घेतल्यामुळे आता निवेदन नाही तर सरळ हल्लाबोल, असे म्हणत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव घालृू, असा इशारा शिवसेना महिला संघटिका सिंधूताई जाधव यांनी दिला आहे.

बॉक्स

आरोग्यसेवेसाठी आर्थिक भुर्दंड

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी नियुक्ती आदेश काढून डॉ. श्रद्धा माडूरवार यांच्याकडे या रुग्णालयाची सूत्रे सोपविण्यात आली होती; पण २१ दिवस उलटूनही त्या येथे रुजू झाल्या नाहीत. यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून रुग्णालयाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना आणि परिसरातील नागरिकांची कोरोनाकाळात गैरसोय होत आहे. आजार झाल्यास अकारण खासगी रुग्णालय किंवा जिवती येथील रुग्णालयात जावे लागते. यात गोरगरीब नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.

190721\img-20210719-wa0111.jpg

सिंधुताई जाधव