शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

कन्नमवारांच्या पुतळा स्वच्छतेवरून महापौरांची टोलवाटोलवी

By admin | Updated: January 13, 2016 00:53 IST

चंद्रपूरचे सुपुत्र असलेले दिवंगत माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांचा चंद्रपुरातील पुतळा सध्या स्वच्छतेच्या मुद्यावरून चर्चेत आला आहे.

गोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूरचंद्रपूरचे सुपुत्र असलेले दिवंगत माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांचा चंद्रपुरातील पुतळा सध्या स्वच्छतेच्या मुद्यावरून चर्चेत आला आहे. कन्नमवारांच्या जयंती दिनी पुतळा आणि हा परिसर कुणीही स्वच्छ न केल्यामुळे अखेर नागरिकांनी नळावरून पाणी घेऊन पुतळा स्वच्छ केला होता. हा पुतळा जिल्हा परिषदेने बांधलेल्या वसंत भवनच्या हद्दीत असल्याने पुतळ्याच्या स्वच्छतेची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे, अशी भूमिका महापौर राखी कंचर्लावार यांनी घेतली आहे, तर पुतळ्यांची आणि त्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी कधीपासून जिल्हा परिषदेकडे आली, असा सवाल जिल्हा परिषदेचे बांधकाम व शिक्षण सभापती देवराव भोंगळे यांनी केला आहे.कन्नमवारांची जयंती होऊन दोन दिवस उलटले तरी अद्याप कुणाचाही स्वच्छतेचा झाडू या पुतळा परिसरात फिरला नाही. परिणामत: चंद्रपूरचे प्रवेशद्वार असलेल्या जटपुरा गेटजवळील वसंत भवनसमोर असलेला या महाराष्ट्र भूषणाचा पुतळा आजही झुडूपात आणि आडव्याउभ्या वाढलेल्या कचऱ्यातच उभा आहे.१० जानेवारीला कन्नमवार जयंतीच्या दिवशी या पुतळ्याची असलेली उपेक्षा बघून ‘लोकमत’ने वस्तुस्थिती चव्हाट्यावर आणली होती. त्यावर ११ जानेवारीला ‘लोकमत’जवळ प्रतिक्रिया देताना महापौर राखी कंचर्लावार यांनी या अस्वच्छतेबाबत दखल घेऊ आणि संबंधितांना जाब विचारू असे म्हटले होते. मात्र दुसऱ्या दिवशीही स्वच्छता न दिसल्याने विचारणा केली असता, पुतळा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात आहे, त्यामुळे स्वच्छतेची जबाबदारी त्यांची होती. आपल्याकडे कुणाचे तसे पत्रच आले नाही, त्यामुळे स्वच्छता करण्याचा विषयच येत नाही, असे सांगत चक्क चंद्रपूरकरांना आश्चर्यात पाडले आहे.दरम्यान, महानगर पालिका आणि जिल्हा परिषदेकडून होत असलेल्या पुतळ्याच्या या उपेक्षेबद्दल नागरिकांनी प्रचंड चिड व्यक्त केली आहे. क्षेत्र कुणाहेची असो, स्वच्छतेची जबाबदारी महानगर पालिका कशी काय टाळू शकते, असा प्रश्न आता सवर स्तरातून उपस्थित होत आहे. चंद्रपूर जिल्हा बेलदार समाज संघटनेचे सचिव अवधुत कोट्टेवार यांनीही या प्रकाराबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ज्या जिल्ह्यातून मोठे झाले आणि घडले त्या कन्नमवारांच्या महानतेची कुणालाही जाणीव होत नसेल तर आपल्यासारखे कृतघ्न आपणच ठरू शकतो, अशा शब्दात ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी संवेदना व्यक्त केली आहे. ‘तो’ पुतळा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात : महापौरचंद्रपुरातील वसंत भवनसमोर असलेला पुतळा महानगर पालिकेच्या कक्षात येत नसून जिल्हा परिषदेच्या कक्षात येतो. त्यामुळे या पुतळयाच्या आणि पुतळा परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे, अशी प्रतिक्रिया महापौर राखी कंचर्लावार यांनी दिली. त्या म्हणाल्या, मागील वर्षी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती देवराव भोंगळे यांना सांगून आपण पुतळ्याच्या गेटची रंगरंगोटी करून घेतली होती. शहरातील कोणत्याही ले-आऊट अथवा कोणत्याही ठिकाणच्या स्वच्छतेसाठी आपल्याकडे अर्ज आणावा, आपण गावभर स्वच्छता करून देऊ. मात्र या पुतळयाच्या स्वच्छतेसाठी आपल्याकडे कुणाचाही अर्ज आला नव्हता, त्यामुळे स्वच्छता करण्याचा प्रश्न येत नाही, असेही त्या म्हणाल्या. एवढ्या वर्षांपासून जयंती साजरी करणाऱ्या संबंधित समाज संघटनेच्या पदाधिकांना तरी हे क्षेत्र कुणाकडे आहे, हे माहीत असायला हवे, असेही त्या म्हणाल्या.पुतळे कधीपासून जिल्हा परिषदेकडे आले ? : भोंगळेंचा सवालमहानगर पालिकेच्या क्षेत्रातील पुतळे जिल्हा परिषदेकडे कधीपासून आले, याचे उत्तर महापौरांनी द्यावे, असा प्रतिप्रश्न जिल्हा परिषदेने बांधकाम आणि शिक्षण सभापती देवराव भोंगळे यांनी उपस्थित केला आहे. कोणत्याही पुतळ्याच्या स्वच्छतेची आणि देखभाल दुरूस्तीची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असते. हे शहर आणि पुुतळा महानगर पालिकेच्या क्षेत्रात येत असल्याने महापौर ही जबाबदारी कशी काय काय टाळतात, याचे आश्चर्य आहे, असेही ते म्हणाले. वसंत भवनसमोर हा पुतळा असल्याने दर २६ जानेवारी आणि १५ आगस्टला जिल्हा परिषदेकडून तेथे स्वच्छता होते. याचा अर्थ महानगरपालिकेने आपली जबाबदारी जिल्हा परिषदेवर ढकलावी, असा होत नाही, असेही ते म्हणाले.