शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे माथाडी कामगार बेरोजगार

By admin | Updated: August 3, 2016 01:58 IST

‘अच्छे दिन येणार’ याची प्रत्येकांना आस लागून आहे. सरकार स्थापन होऊन दोन वर्षे झाली.

पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे : बाजार समित्यातून कामगारांना काढण्याचा डाव चंद्रपूर : ‘अच्छे दिन येणार’ याची प्रत्येकांना आस लागून आहे. सरकार स्थापन होऊन दोन वर्षे झाली. मात्र सरकारची धोरणे व विकासाची दिशा आताही स्पष्ट झालेली दिसून येत नाही. सरकार व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे माथाडी कामगारांवर उपासमारीचे संकट व बेरोजगारी कोसळली आहे. जिल्ह्याला दोन मंत्री मिळाले. परंतु, आपल्याच मतदार संघातल्या कामगारांचे प्रश्न मंत्र्यांना सोडविता न येणे, हे मोठे दुर्देवच म्हणावे लागेल, असे रमजान खा पठाण अशरफी यांनी म्हटले आहे. कामगारांच्या हक्कासाठी त्यांच्याबरोबर आंदोलन करण्याची भाषा करणारे मंत्री आता मात्र कामगारांना विसरले आहेत. कामगारांच्या वारंवारच्या विनंतीकडे दुर्लक्ष करीत आहे, असे रमजान खा पठाण यांनी म्हटले आहे. कामगार कल्याण व त्यांच्या हिताकरिता महाराष्ट्र शासनाने ‘माथाडी कायदा’ अंमलबजावणी केली. मात्र जिल्ह्यात या कायद्याची अंमलबजावणी अडल्याचे प्रशासकीय अधिकारी सांगतात. ज्यामुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या व भात गिरण्यातील कामगार मागील अनेक वर्षांपासून कायद्याच्या लाभाापासून वंचित आहेत. राज्याच्या पणन संचालकांनी वारंवार या कायद्याची अंमलबजावणीचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी अनेक बैठका व सभाद्वारे डी.डी.आर (जिल्हा निंबधक, सहकारी संस्था) यांना निर्देश दिले. परंतु, प्रशासकीय अधिकारी असलेले डी.डी.आर यांनी अंबलबजावणी करण्याबाबत आपल्या अखत्यारीतील बाजार समिती प्रशासनाला निर्देश देण्याऐवजी माथाडी कायद्याची मागणी करणाऱ्या माथाडी कामगारांना बेदखल करून अनधिकृत कामगारांना कामावर लावण्याचे व अधिकृत कामगारांना बेरोजगार करण्याचे निर्देश दिले आहे. या लोकशाहीत आपल्या रास्त मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या माथाडी कामगारावर हुकूमशाहीद्वारे त्यांचे परवाने रद्द करण्याचा व रोजगारापासून वंचित करण्याचा दबाव तंत्राचा वापर डी.डी.आर च्या संगणमताने बाजार समिती प्रशासनाने चालविला आहे. बाजार समित्या शासन व डी.डी. आर. यांच्या अधिन असतानाही शासनाच्या माथाडी कायद्याची अंमलबजावणी न करता बाजार समिती प्रशासनाशी आर्थिक हात मिळवणी करुन कामगारांना डावलण्यात आले आहे. शासनाच्या कायदे, योजना व आदेश, निर्देशाची अवहेलना करणाऱ्या बाजार समिती प्रशासनावर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्यांची डी.डी.आर पाठराखण करीत असल्याचा आरोप रमजान खा पठाण यांनी केला असून माथाडी कामगारांचे प्रश्न निकाली काढण्याची मागणीे केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)