शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मार्शल प्लॅन घेऊन शेतकरी संघटना पुन्हा मैदानात

By admin | Updated: April 14, 2015 01:09 IST

सरकारच्या शेतकऱ्यांविषयक धोरणावर सडकून टीका करीत शेतकरी संघटना पुन्हा ‘मार्शल प्लॅन’ घेऊन नव्याने मैदानात

राज्यभर दौरे : देशव्यापी आंदोलन उभारण्याचा इशाराचंद्रपूर : सरकारच्या शेतकऱ्यांविषयक धोरणावर सडकून टीका करीत शेतकरी संघटना पुन्हा ‘मार्शल प्लॅन’ घेऊन नव्याने मैदानात उतरली आहे. या अंतर्गत राज्यभर दौरे करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आणि देशव्यापी आंदोलन उभारण्याचे नियोजनही शेतकरी संघटनेने केले आहे.शेतकरी संघटनेच्या जिल्हास्तरीय बैठकीसाठी राज्यस्तरीय पदाधिकारी सोमवारी चंद्रपुरात आले असता झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मार्शल प्लॅन जाहीर केला. यावेळी राज्याध्यक्ष गुणवंत पाटील हंबरडेकर, राज्य महिला आघाडी अध्यक्ष शैलजा देशपांडे, प्रांताध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप प्रामुख्याने उपस्थित होते. मार्शल प्लॅन संदर्भात माहिती देताना गुणवंत पाटील हंबरडेकर म्हणाले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे अर्थात कर्ज व वीज बिल संपविणे, शेतकऱ्यांना शेतीसाठी पुन्हा पतपुरवठा करणे आणि शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी उत्पादन मालाला रास्त भाव सरकारने जाहीर करणे या तीन प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचा हा मार्शल प्लॅन आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सरकारने स्वातंत्र देऊन त्यांच्या जीवनमानातील हस्तक्षेप सरकारने संपवायला हवा. देशावर झालेले कर्ज सरकारच्या चुकीमुळे असले तरी त्याचा भुर्दंड मात्र शेतकरी सहन करीत आहेत. सरकारने कर्जमाफी देतानाही सावकाराचेच भले कसे होईल, याचाच अधिक विचार केला. सावकारांना वैध करून त्यांना पैसा वाटण्याचे काम या सरकारने केल्याने सावकारांचे व या सरकारचे लागेबांधे असल्याची शंका येते, असेही ते म्हणाले.नव्या सरकारच्या काळात बदल दिसेल अशी अपेक्षा होती, मात्र धर्मकारणावरच अधिक चर्चा रंगलेली दिसते. हे सरकार उद्योपतींच्या हितरक्षणासाठीच काम करत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलनाचा मार्ग स्विकारल्याशिवाय गत्यंतर नाही, असे ते म्हणाले.अ‍ॅड. चटप म्हणाले, सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील गावातील चाय पे चर्चा कार्यक्रमात शेतकऱ्यांना विकासाचा शब्द दिला होता. मात्र सत्तेत आलेल्या त्यांच्याच सरकारातील मंत्री नितीन गडकरी यांनी, शेतकऱ्यांनी देवावर आणि सरकारवर अवलंबून राहू नये, असे जाहीर भाष्य करून शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. शेतकऱ्यांची अन्न सुरक्षा धोक्यात आणण्याचे काम हे सरकार करीत आहे. शेतीव्यवसाय धोक्यात आणून उद्योगपतींच्या हितरक्षासाठी धावणारे हे सरकार असल्याचा आरोही त्यांनी केला. पत्रकार परिषदेला रामराव कोंडेकर, प्रा. अनिल ठाकूरवार, प्रभाकर दिवे, अरविंद गाठे, श्रीधर बलकी, दिवाकर माणूसमारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)