शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मार्शल प्लॅन घेऊन शेतकरी संघटना पुन्हा मैदानात

By admin | Updated: April 14, 2015 01:09 IST

सरकारच्या शेतकऱ्यांविषयक धोरणावर सडकून टीका करीत शेतकरी संघटना पुन्हा ‘मार्शल प्लॅन’ घेऊन नव्याने मैदानात

राज्यभर दौरे : देशव्यापी आंदोलन उभारण्याचा इशाराचंद्रपूर : सरकारच्या शेतकऱ्यांविषयक धोरणावर सडकून टीका करीत शेतकरी संघटना पुन्हा ‘मार्शल प्लॅन’ घेऊन नव्याने मैदानात उतरली आहे. या अंतर्गत राज्यभर दौरे करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आणि देशव्यापी आंदोलन उभारण्याचे नियोजनही शेतकरी संघटनेने केले आहे.शेतकरी संघटनेच्या जिल्हास्तरीय बैठकीसाठी राज्यस्तरीय पदाधिकारी सोमवारी चंद्रपुरात आले असता झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मार्शल प्लॅन जाहीर केला. यावेळी राज्याध्यक्ष गुणवंत पाटील हंबरडेकर, राज्य महिला आघाडी अध्यक्ष शैलजा देशपांडे, प्रांताध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप प्रामुख्याने उपस्थित होते. मार्शल प्लॅन संदर्भात माहिती देताना गुणवंत पाटील हंबरडेकर म्हणाले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे अर्थात कर्ज व वीज बिल संपविणे, शेतकऱ्यांना शेतीसाठी पुन्हा पतपुरवठा करणे आणि शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी उत्पादन मालाला रास्त भाव सरकारने जाहीर करणे या तीन प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचा हा मार्शल प्लॅन आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सरकारने स्वातंत्र देऊन त्यांच्या जीवनमानातील हस्तक्षेप सरकारने संपवायला हवा. देशावर झालेले कर्ज सरकारच्या चुकीमुळे असले तरी त्याचा भुर्दंड मात्र शेतकरी सहन करीत आहेत. सरकारने कर्जमाफी देतानाही सावकाराचेच भले कसे होईल, याचाच अधिक विचार केला. सावकारांना वैध करून त्यांना पैसा वाटण्याचे काम या सरकारने केल्याने सावकारांचे व या सरकारचे लागेबांधे असल्याची शंका येते, असेही ते म्हणाले.नव्या सरकारच्या काळात बदल दिसेल अशी अपेक्षा होती, मात्र धर्मकारणावरच अधिक चर्चा रंगलेली दिसते. हे सरकार उद्योपतींच्या हितरक्षणासाठीच काम करत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलनाचा मार्ग स्विकारल्याशिवाय गत्यंतर नाही, असे ते म्हणाले.अ‍ॅड. चटप म्हणाले, सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील गावातील चाय पे चर्चा कार्यक्रमात शेतकऱ्यांना विकासाचा शब्द दिला होता. मात्र सत्तेत आलेल्या त्यांच्याच सरकारातील मंत्री नितीन गडकरी यांनी, शेतकऱ्यांनी देवावर आणि सरकारवर अवलंबून राहू नये, असे जाहीर भाष्य करून शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. शेतकऱ्यांची अन्न सुरक्षा धोक्यात आणण्याचे काम हे सरकार करीत आहे. शेतीव्यवसाय धोक्यात आणून उद्योगपतींच्या हितरक्षासाठी धावणारे हे सरकार असल्याचा आरोही त्यांनी केला. पत्रकार परिषदेला रामराव कोंडेकर, प्रा. अनिल ठाकूरवार, प्रभाकर दिवे, अरविंद गाठे, श्रीधर बलकी, दिवाकर माणूसमारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)