शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

मार्शल प्लॅन घेऊन शेतकरी संघटना पुन्हा मैदानात

By admin | Updated: April 14, 2015 01:09 IST

सरकारच्या शेतकऱ्यांविषयक धोरणावर सडकून टीका करीत शेतकरी संघटना पुन्हा ‘मार्शल प्लॅन’ घेऊन नव्याने मैदानात

राज्यभर दौरे : देशव्यापी आंदोलन उभारण्याचा इशाराचंद्रपूर : सरकारच्या शेतकऱ्यांविषयक धोरणावर सडकून टीका करीत शेतकरी संघटना पुन्हा ‘मार्शल प्लॅन’ घेऊन नव्याने मैदानात उतरली आहे. या अंतर्गत राज्यभर दौरे करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आणि देशव्यापी आंदोलन उभारण्याचे नियोजनही शेतकरी संघटनेने केले आहे.शेतकरी संघटनेच्या जिल्हास्तरीय बैठकीसाठी राज्यस्तरीय पदाधिकारी सोमवारी चंद्रपुरात आले असता झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मार्शल प्लॅन जाहीर केला. यावेळी राज्याध्यक्ष गुणवंत पाटील हंबरडेकर, राज्य महिला आघाडी अध्यक्ष शैलजा देशपांडे, प्रांताध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप प्रामुख्याने उपस्थित होते. मार्शल प्लॅन संदर्भात माहिती देताना गुणवंत पाटील हंबरडेकर म्हणाले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे अर्थात कर्ज व वीज बिल संपविणे, शेतकऱ्यांना शेतीसाठी पुन्हा पतपुरवठा करणे आणि शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी उत्पादन मालाला रास्त भाव सरकारने जाहीर करणे या तीन प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचा हा मार्शल प्लॅन आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सरकारने स्वातंत्र देऊन त्यांच्या जीवनमानातील हस्तक्षेप सरकारने संपवायला हवा. देशावर झालेले कर्ज सरकारच्या चुकीमुळे असले तरी त्याचा भुर्दंड मात्र शेतकरी सहन करीत आहेत. सरकारने कर्जमाफी देतानाही सावकाराचेच भले कसे होईल, याचाच अधिक विचार केला. सावकारांना वैध करून त्यांना पैसा वाटण्याचे काम या सरकारने केल्याने सावकारांचे व या सरकारचे लागेबांधे असल्याची शंका येते, असेही ते म्हणाले.नव्या सरकारच्या काळात बदल दिसेल अशी अपेक्षा होती, मात्र धर्मकारणावरच अधिक चर्चा रंगलेली दिसते. हे सरकार उद्योपतींच्या हितरक्षणासाठीच काम करत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलनाचा मार्ग स्विकारल्याशिवाय गत्यंतर नाही, असे ते म्हणाले.अ‍ॅड. चटप म्हणाले, सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील गावातील चाय पे चर्चा कार्यक्रमात शेतकऱ्यांना विकासाचा शब्द दिला होता. मात्र सत्तेत आलेल्या त्यांच्याच सरकारातील मंत्री नितीन गडकरी यांनी, शेतकऱ्यांनी देवावर आणि सरकारवर अवलंबून राहू नये, असे जाहीर भाष्य करून शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. शेतकऱ्यांची अन्न सुरक्षा धोक्यात आणण्याचे काम हे सरकार करीत आहे. शेतीव्यवसाय धोक्यात आणून उद्योगपतींच्या हितरक्षासाठी धावणारे हे सरकार असल्याचा आरोही त्यांनी केला. पत्रकार परिषदेला रामराव कोंडेकर, प्रा. अनिल ठाकूरवार, प्रभाकर दिवे, अरविंद गाठे, श्रीधर बलकी, दिवाकर माणूसमारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)