शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

जिल्ह्यात दोन वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:20 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील व बाजारपेठेच्या ठिकाणी सर्व दुकाने सकाळी ७ ...

विदर्भ राज्य आंदोलन समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील व बाजारपेठेच्या ठिकाणी सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश निर्गमित करावे, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

राज्यभर १ जून ते १५ जून या कालावधीकरिता लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनाचा अतिप्रादुर्भाव असणाऱ्या जिल्ह्यांकरिता लॉकडाऊन काळात सर्वप्रकारची दुकाने अत्यावश्यक सेवाव्यतिरिक्तची सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. लॉकडाऊनमुळे न्हावी, शिंपी, चांभार, कुंभार, हातगाडीवाले, छोटे व्यापारी, इलेक्ट्रॉनिक्स, कपड्याचे व हार्डवेअर दुकानदार तसेच बांधकाम मजूर आर्थिक संकटात आलेले आहेत. व्यापक जनहित लक्षात घेता, आवश्यक सेवाव्यतिरिक्तची सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन या वेळात सुरू ठेवून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप, जिल्हाध्यक्ष किशोर पोतनवार, जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष किशोर दहेकर, विभागीय सचिव मितीन भागवत, अनिल दिकोंडवार, ईश्वर सहारे, सुदाम राठोड, आनंद अंगलवार, योगेश मुरेकर आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना भेटून मागणीचे निवेदन दिले.