शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

बाजार समित्यांमध्ये आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:50 IST

मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी हे तालुके धान उत्पादक तालुके म्हणून ओळखले जाते. यावर्षी या तालुक्यांमध्ये समाधानकारक पिक होईल, ....

ठळक मुद्देबाजार समितीचे सेस होणार कमी : धानाचे उत्पादन घटल्याने शुकशुकाट

राजू गेडाम ।आॅनलाईन लोकमतमूल : मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी हे तालुके धान उत्पादक तालुके म्हणून ओळखले जाते. यावर्षी या तालुक्यांमध्ये समाधानकारक पिक होईल, अशी आशा असतानाच मावा, तुडतुडा रोगांनी आक्रमण केल्याने धानाचे उत्पादन घटले आहे. याचा परिणाम कृषी उत्पन्न बाजार समित्यांवरही झाला आहे. यंदा या समित्यांमध्ये धानाला मागील वर्षीपेक्षा चांगला भाव असला तरी समित्यांमध्ये आवक घटली आहे. यामुळे बाजार समित्यांच्या सेसही कमी होणार आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथे सन २०१६-१७ सन २०१७-२०१८ या वर्षातील एप्रिल ते डिसेंबर महिन्याकडे नजर टाकली तर डिसेंबर १७ पर्यंत जुनाच धान बाजार समितीत आल्याचे दिसून येते. जानेवारी २०१८ मधील आकडेवर नजर टाकली तर मागील वर्षीच्या तुलनेत धानाची आवक कमी असल्याचे दिसून येते. २०१६-१७ या वर्षात एप्रिल ते डिसेंबरपर्यंत तीन लाख ३८ हजार ६६८ क्विंटल धान बाजार समितीत आले असून त्याची किंमत ७३ कोटी ६७ लाख २३ हजार ६३२ रुपये आहे. तर सन २०१७-१८ या वर्षात एप्रिल ते डिसेंबरपर्यंत तीन लाख ८५ हजार ४२२ क्विंटल धान आला असून त्याची किंमत ९३ कोटी ८ लाख ८ हजार १५६ रुपये आहे. यात ८९ हजार ५४४ क्विंटल धानाची आवक वाढली आहे. मात्र हा धान जुनाच आणला जात असल्याची माहिती समितीतील अधिकाऱ्यांनी दिली. डिसेंबर, जानेवारी महिन्यात नवीन धान निघतो. मात्र आता जानेवारीमध्ये धानाची आवक कमी झाली आहे. ५ जानेवारी २०१७ ला बाजार समितीत सहा हजार ९२८ पोते तर जानेवारी १८ मध्ये केवळ चार हजार ७७३ पोते आल्याचे दिसून येते. यावरुन दोन हजार १५५ पोत्यांची घट दिसून येत आहे. दिवसेंदिवस ही घट दिसून येणार आहे. कारण उत्पादनात घट झाल्याने बाजार समितीत येणारा धानाचा पुरवठा कमी होणार आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळणारा सेससुद्धा कमी होईल. त्याचा थेट परिणाम बाजार समितीच्या कामकाजावर होईल, असे दिसून येते. विशेष म्हणजे, संपूर्ण धान उत्पादक तालुक्यांमध्ये हीच स्थिती आहे.यावर्षी धानाला भाव समाधानकारक आहे. मात्र हातात धानच नसल्याने शेतकºयांना याचा फायदा होणार नसल्याचे दिसते.यावर्षी शेतकºयांनी काही भागात पाण्याअभावी धानाची पेरणी केली नाही. काहींनी केली तर ऐन हंगामात मावा, तुडतुडा या रोगांनी त्यांचे धान फस्त केले. त्यामुळे शेतकºयांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले. आता शासनाने आणेवारीचा अंतिम अहवाल तयार करुन शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळावा, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाने आतातरी आणेवारी जाहीर करताना शेतकºयांवर अन्याय होऊ नये, याची काळजी घ्यावी, अशीही मागणी केली जात आहे.यावर्षी शेतकºयांच्या पिकांना मावा, तुडतुडा रोगांनी खाऊन टाकले. त्यामुळे धानाच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी शेतकरी चिंतातूर आहेत. शासनाने अंतिम आणेवारी जाहीर करुन धान उत्पादक तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करणे गरजेचे आहे. शेतकºयांना पीक विम्याचा लाभ मिळाल्यास खूपच आधार मिळेल. बाजार समितीत जानेवारी १८ मध्ये येणारी धानाची आवक बघता बाजार समितीच्या उत्पादनातही घट येईल.- घनश्याम येनूरकर , सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, मूल