शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांमध्ये आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:50 IST

मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी हे तालुके धान उत्पादक तालुके म्हणून ओळखले जाते. यावर्षी या तालुक्यांमध्ये समाधानकारक पिक होईल, ....

ठळक मुद्देबाजार समितीचे सेस होणार कमी : धानाचे उत्पादन घटल्याने शुकशुकाट

राजू गेडाम ।आॅनलाईन लोकमतमूल : मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी हे तालुके धान उत्पादक तालुके म्हणून ओळखले जाते. यावर्षी या तालुक्यांमध्ये समाधानकारक पिक होईल, अशी आशा असतानाच मावा, तुडतुडा रोगांनी आक्रमण केल्याने धानाचे उत्पादन घटले आहे. याचा परिणाम कृषी उत्पन्न बाजार समित्यांवरही झाला आहे. यंदा या समित्यांमध्ये धानाला मागील वर्षीपेक्षा चांगला भाव असला तरी समित्यांमध्ये आवक घटली आहे. यामुळे बाजार समित्यांच्या सेसही कमी होणार आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथे सन २०१६-१७ सन २०१७-२०१८ या वर्षातील एप्रिल ते डिसेंबर महिन्याकडे नजर टाकली तर डिसेंबर १७ पर्यंत जुनाच धान बाजार समितीत आल्याचे दिसून येते. जानेवारी २०१८ मधील आकडेवर नजर टाकली तर मागील वर्षीच्या तुलनेत धानाची आवक कमी असल्याचे दिसून येते. २०१६-१७ या वर्षात एप्रिल ते डिसेंबरपर्यंत तीन लाख ३८ हजार ६६८ क्विंटल धान बाजार समितीत आले असून त्याची किंमत ७३ कोटी ६७ लाख २३ हजार ६३२ रुपये आहे. तर सन २०१७-१८ या वर्षात एप्रिल ते डिसेंबरपर्यंत तीन लाख ८५ हजार ४२२ क्विंटल धान आला असून त्याची किंमत ९३ कोटी ८ लाख ८ हजार १५६ रुपये आहे. यात ८९ हजार ५४४ क्विंटल धानाची आवक वाढली आहे. मात्र हा धान जुनाच आणला जात असल्याची माहिती समितीतील अधिकाऱ्यांनी दिली. डिसेंबर, जानेवारी महिन्यात नवीन धान निघतो. मात्र आता जानेवारीमध्ये धानाची आवक कमी झाली आहे. ५ जानेवारी २०१७ ला बाजार समितीत सहा हजार ९२८ पोते तर जानेवारी १८ मध्ये केवळ चार हजार ७७३ पोते आल्याचे दिसून येते. यावरुन दोन हजार १५५ पोत्यांची घट दिसून येत आहे. दिवसेंदिवस ही घट दिसून येणार आहे. कारण उत्पादनात घट झाल्याने बाजार समितीत येणारा धानाचा पुरवठा कमी होणार आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळणारा सेससुद्धा कमी होईल. त्याचा थेट परिणाम बाजार समितीच्या कामकाजावर होईल, असे दिसून येते. विशेष म्हणजे, संपूर्ण धान उत्पादक तालुक्यांमध्ये हीच स्थिती आहे.यावर्षी धानाला भाव समाधानकारक आहे. मात्र हातात धानच नसल्याने शेतकºयांना याचा फायदा होणार नसल्याचे दिसते.यावर्षी शेतकºयांनी काही भागात पाण्याअभावी धानाची पेरणी केली नाही. काहींनी केली तर ऐन हंगामात मावा, तुडतुडा या रोगांनी त्यांचे धान फस्त केले. त्यामुळे शेतकºयांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले. आता शासनाने आणेवारीचा अंतिम अहवाल तयार करुन शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळावा, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाने आतातरी आणेवारी जाहीर करताना शेतकºयांवर अन्याय होऊ नये, याची काळजी घ्यावी, अशीही मागणी केली जात आहे.यावर्षी शेतकºयांच्या पिकांना मावा, तुडतुडा रोगांनी खाऊन टाकले. त्यामुळे धानाच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी शेतकरी चिंतातूर आहेत. शासनाने अंतिम आणेवारी जाहीर करुन धान उत्पादक तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करणे गरजेचे आहे. शेतकºयांना पीक विम्याचा लाभ मिळाल्यास खूपच आधार मिळेल. बाजार समितीत जानेवारी १८ मध्ये येणारी धानाची आवक बघता बाजार समितीच्या उत्पादनातही घट येईल.- घनश्याम येनूरकर , सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, मूल