शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

बाजार समितीत ‘घाणीचा’ बाजार !

By admin | Updated: June 27, 2015 01:27 IST

शेतमालाला किफायतशीर मूल्य मिळावे, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली.

चंद्रपूर : शेतमालाला किफायतशीर मूल्य मिळावे, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली. बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांसह अडते, व्यापारी, विक्रेते, ग्राहक यांना सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी बाजार समिती प्रशासनाची आहे. मात्र चंद्रपूर बाजार समितीला भेट दिली असता, बाजार समितीत कृषी मालाचा नाही तर ‘घाणीचा बाजार’ भरत असल्याचे दृष्य दिसून आले. येथील घाणीमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून क्षणभर थांबणेही कठीण जाते. येथील दुर्गंधीमुळे सारेच त्रस्त असून बाजार समिती प्रशासन मात्र नियमीत स्वच्छता केली जात असल्याचे सांगत आहे. गुरूवार दुपारी १ वाजताची वेळ, बाजार समितीत काहीसा शुकशुकाट होता. प्रवेशद्वारावरून आत प्रवेश करताच अतिशय खराब दुर्गंधीचा सामना करावा लागला. प्रवेशद्वारालगतच फळ व्यापाऱ्यांचे गाळे आहेत. पावसामुळे खराब झालेले, सडलेले फळ बाजार समितीच्या अगदी प्रवेशद्वारालगत रस्त्याच्या कडेला ढीग टाकण्यात आले होते. या सडलेल्या फळांवर जनावरांचा हौदोस आणि माश्यांचा गोंगाठ दिसून आला. बाजार समितीच्या परिसरात फेरफटका मारला असता, स्वच्छतेबाबत कमालीची दुुर्लक्षता दिसून आली. धान, सोयाबीन, तूर आदी माल खरेदीसाठी असलेले बरेच गाळे आवकअभावी बंद अवस्थेत होते. या गाळ्यांसमोर व बाजार समितीच्या आवारात जनावरांची विष्ठा सर्वत्र पसरलेली होती. तर गाळ्यासमोरील नालीतही मोठ्या प्रमाणात केरकचरा साचल्याचे दिसून आले. सब्जी मंडीतही हाच प्रकार निदर्शनास आला. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सडलेले माल टाकण्यासाठी कचरा कुंडीची व्यवस्था नाही. त्यामुळे सर्व अडते, विक्रेते हे मोकळ्या जागेत कचरा टाकत असतात. फळांची विक्री होत असलेल्या गाळ्यांच्या लगतच बाजार समिती प्रशासनाने कचरा टाकण्याची व्यवस्था केली आहे. मात्र तेथे कोणीही कचरा टाकत नाही. मोकळ्याच जागेत कचरा टाकले जात असल्याने दुर्गंधीमुळे शेतकरी, व्यापारी, अडते सारेच त्रस्त आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)विकत घ्यावे लागते पाणीबाजार समिती परिसरात पाण्यासाठी जलकुुंभ उभारण्यात आले आहे. जलकुंभाद्वारेच बाजार समितीच्या नळांना पाणी पुरवठा होतो. मात्र या टाकींची स्वच्छता होत नसल्याने नळांना दूषित पाणी येते. त्यामुळे अनेक व्यापारी, अडत्यांना पाणी विकत घेऊन प्यावे लागत असल्याचे एका फळ व्यापाऱ्याने सांगितले.बाजार समिती प्रशासनाकडून नियमित स्वच्छता केली जाते. मात्र पावसामुळे फळ, भाजीपाला सडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नियमीत स्वच्छता करूनही दुर्गंधी पूर्णपणे दूर होत नाही. कचरा साचलेल्या जागी स्वच्छता करून दुर्गंधी येऊ नये यासाठी ब्लिचिंग पावडर टाकले जात आहे. कचरा इतरत्र टाकला जाऊ नये, यासाठी कचरा कुंडीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ‘त्या’ कचरा कुंडीत सध्या कचरा टाकले जात नाही. यासाठी लवकरच व्यवस्था करण्यात येणार असून पाण्याच्या टाकीची नियमीत स्वच्छता केली जाते. - संजय पावळे, सचिव, कृउबास चंद्रपूर.