शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

बाजार समितीत ‘घाणीचा’ बाजार !

By admin | Updated: June 27, 2015 01:27 IST

शेतमालाला किफायतशीर मूल्य मिळावे, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली.

चंद्रपूर : शेतमालाला किफायतशीर मूल्य मिळावे, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली. बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांसह अडते, व्यापारी, विक्रेते, ग्राहक यांना सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी बाजार समिती प्रशासनाची आहे. मात्र चंद्रपूर बाजार समितीला भेट दिली असता, बाजार समितीत कृषी मालाचा नाही तर ‘घाणीचा बाजार’ भरत असल्याचे दृष्य दिसून आले. येथील घाणीमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून क्षणभर थांबणेही कठीण जाते. येथील दुर्गंधीमुळे सारेच त्रस्त असून बाजार समिती प्रशासन मात्र नियमीत स्वच्छता केली जात असल्याचे सांगत आहे. गुरूवार दुपारी १ वाजताची वेळ, बाजार समितीत काहीसा शुकशुकाट होता. प्रवेशद्वारावरून आत प्रवेश करताच अतिशय खराब दुर्गंधीचा सामना करावा लागला. प्रवेशद्वारालगतच फळ व्यापाऱ्यांचे गाळे आहेत. पावसामुळे खराब झालेले, सडलेले फळ बाजार समितीच्या अगदी प्रवेशद्वारालगत रस्त्याच्या कडेला ढीग टाकण्यात आले होते. या सडलेल्या फळांवर जनावरांचा हौदोस आणि माश्यांचा गोंगाठ दिसून आला. बाजार समितीच्या परिसरात फेरफटका मारला असता, स्वच्छतेबाबत कमालीची दुुर्लक्षता दिसून आली. धान, सोयाबीन, तूर आदी माल खरेदीसाठी असलेले बरेच गाळे आवकअभावी बंद अवस्थेत होते. या गाळ्यांसमोर व बाजार समितीच्या आवारात जनावरांची विष्ठा सर्वत्र पसरलेली होती. तर गाळ्यासमोरील नालीतही मोठ्या प्रमाणात केरकचरा साचल्याचे दिसून आले. सब्जी मंडीतही हाच प्रकार निदर्शनास आला. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सडलेले माल टाकण्यासाठी कचरा कुंडीची व्यवस्था नाही. त्यामुळे सर्व अडते, विक्रेते हे मोकळ्या जागेत कचरा टाकत असतात. फळांची विक्री होत असलेल्या गाळ्यांच्या लगतच बाजार समिती प्रशासनाने कचरा टाकण्याची व्यवस्था केली आहे. मात्र तेथे कोणीही कचरा टाकत नाही. मोकळ्याच जागेत कचरा टाकले जात असल्याने दुर्गंधीमुळे शेतकरी, व्यापारी, अडते सारेच त्रस्त आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)विकत घ्यावे लागते पाणीबाजार समिती परिसरात पाण्यासाठी जलकुुंभ उभारण्यात आले आहे. जलकुंभाद्वारेच बाजार समितीच्या नळांना पाणी पुरवठा होतो. मात्र या टाकींची स्वच्छता होत नसल्याने नळांना दूषित पाणी येते. त्यामुळे अनेक व्यापारी, अडत्यांना पाणी विकत घेऊन प्यावे लागत असल्याचे एका फळ व्यापाऱ्याने सांगितले.बाजार समिती प्रशासनाकडून नियमित स्वच्छता केली जाते. मात्र पावसामुळे फळ, भाजीपाला सडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नियमीत स्वच्छता करूनही दुर्गंधी पूर्णपणे दूर होत नाही. कचरा साचलेल्या जागी स्वच्छता करून दुर्गंधी येऊ नये यासाठी ब्लिचिंग पावडर टाकले जात आहे. कचरा इतरत्र टाकला जाऊ नये, यासाठी कचरा कुंडीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ‘त्या’ कचरा कुंडीत सध्या कचरा टाकले जात नाही. यासाठी लवकरच व्यवस्था करण्यात येणार असून पाण्याच्या टाकीची नियमीत स्वच्छता केली जाते. - संजय पावळे, सचिव, कृउबास चंद्रपूर.