शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नागभिडात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

हातात मागण्यांचे विविध फलक घेऊन आणि मागण्यांच्या घोषणा देत हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने अतिशय शिस्तबद्ध निघाला. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोर्चा पोहचल्यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या सभेस आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया व जिल्हा भाजपाचे अध्यक्ष हरिश शर्मा यांनी संबोधित केले. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर केल्या नाहीत तर भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

ठळक मुद्देहजारो शेतकरी सहभागी : बंटी भांगडिया यांचे नेतृत्व

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरूवारी मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांनी केले.या मोर्चाची सुरूवात तालुका भाजपाच्या कार्यालयातून करण्यात आली. हातात मागण्यांचे विविध फलक घेऊन आणि मागण्यांच्या घोषणा देत हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने अतिशय शिस्तबद्ध निघाला. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोर्चा पोहचल्यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या सभेस आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया व जिल्हा भाजपाचे अध्यक्ष हरिश शर्मा यांनी संबोधित केले. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर केल्या नाहीत तर भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यानंतर तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी मोर्चाला सामोरे येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. या मोर्चात प्रामुख्याने वसंत वारजूकर, मोरेश्वर ठिकरे, न.प.चे अध्यक्ष प्रा.डॉ.उमाजी हिरे, कृउबासचे सभापती आवेश पठाण, न.प.उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, कृउबासचे उपसभापती रमेश बोरकर, न.प.सभापती सचिन आकूलवार, पं.स.सदस्य संतोष रडके, जि.प.चे माजी सभापती ईश्वर मेश्राम, माजी सभापती डॉ.मदन अवघडे आदी सहभागी झाले होते.या आहेत मागण्यासर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, श्रावणबाळ योजनेची वयोमर्यादा ६० वर्ष करण्यात यावी, अतिवृष्टीची २५ हजार रुपये प्रती हेक्टर नुकसानभरपाई देण्यात यावी, घरगुती व कृषिपंपांचे वीज बील माफ करण्यात यावे, नरभक्षक वाघांचा बंदोबस्त करण्यात यावा, अतिक्रमणधारकांना शेतीचे पट्टे देण्यात यावे, वर्ग २ मध्ये असलेल्या जमिनी वर्ग १ मध्ये करण्यात याव्या, गोसेखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात सोडण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, कृउबासमध्ये धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस देण्यात यावा, वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानभरपाईत वाढ करण्यात यावी आदी विविध मागण्या शेतकºयांकडून यावेळी करण्यात आल्या.राममंदिर चौकात घोषणाराम मंदिर चौक नागभीडचा प्रमुख चौक आहे. या चौकात मोर्चा आल्यानंतर येथे मोर्चा थांबविण्यात आला व विविध घोषणा देण्यात आल्या. या घोषणांनी परिसर चांगलाच दणाणून गेला. दिवसभर या मोर्चाचीच चर्चा होती.सत्तेत येण्यापूर्वी शासनाने शेतकऱ्यांना जी वचने दिली, ती पूर्ण केल्याशिवाय, अतिवृष्टीची प्रति हेक्टर २५ हजार रुपये नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय आणि जे शेतकरी नियमित कर्जाचा भरणा करीत आहेत, अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.- कीर्तीकुमार भांगडियाआमदार, चिमूर विधानसभा क्षेत्र.

टॅग्स :Morchaमोर्चा