शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

सरपंचपदासाठी आरक्षण सोडत २६ मार्चला

By admin | Updated: March 14, 2015 01:02 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील पंधराही तालुक्यामध्ये २६ मार्च रोजी सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

सावली : चंद्रपूर जिल्ह्यातील पंधराही तालुक्यामध्ये २६ मार्च रोजी सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.ग्रामपंचायतीच्या सन २०१५ ते २०२० या कालावधीकरीता होणाऱ्या सार्वत्रीक निवडणुका लक्षात घेता बिगर अनुसुचित क्षेत्रात येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण तालुकानिहाय व गावनिहाय निश्चित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच, उपसरपंच) निवडणूक अधिनियम १९६४ च्या नियम २ अ (१) (२) नुसार पाच वर्षाच्या कालावधीसाठी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागासवर्गाचा प्रवर्ग आणि खुला व महिलांकरिताचा प्रवर्ग आरक्षित ठेवण्यात येणार आहे.शासन निर्णयान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पंधराही तालुक्यातील आरक्षण सोडत २६ मार्च रोजी काढण्याचा अध्यादेश जारी केलेला आहे. दुपारी २ वाजता तालुकास्तरावरील उपलब्ध सभागृहामध्ये आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याने कार्यरत व इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सावली येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार वंदना सौरंगपते यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)