शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

मराठी भाषा नोकरीची, व्यवहाराची झाली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:39 IST

अरबी, उर्दू शिकता येते, ती भाषा नोकरी देते. मग मराठी का नाही? १९३४ पासून आंम्ही मराठी विद्यापीठ मागतो आहोत, मिळत नाही आहे. जोपर्यंत मराठी समाज भाषा व संस्कृतीबाबत सजग नाही, तोपर्यंत होणार नाही. ज्यांचे अर्थकारण सक्षम त्यांचे भाषाकारण सक्षम, हे इंग्रजीच्या बाबतीत झाले आहे.

ठळक मुद्देमराठी वाङ्मय मंडळ कार्यक्रम : श्रीपाद जोशी यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : अरबी, उर्दू शिकता येते, ती भाषा नोकरी देते. मग मराठी का नाही? १९३४ पासून आंम्ही मराठी विद्यापीठ मागतो आहोत, मिळत नाही आहे. जोपर्यंत मराठी समाज भाषा व संस्कृतीबाबत सजग नाही, तोपर्यंत होणार नाही. ज्यांचे अर्थकारण सक्षम त्यांचे भाषाकारण सक्षम, हे इंग्रजीच्या बाबतीत झाले आहे. या राज्यात अजूनही मराठी शिक्षणाचा कायदा नाही. स्वभाषा नाही तर विचार नाही, विचार नाही तर अभिव्यक्ती नाही. पोकळ, दिखाऊंच्या संस्कृतीने मेंदूवर आक्रमण केले आहे. तंत्रज्ञानाची साधने प्रगत असतांना जग विकृत होत आहे. वारकऱ्यांनी, वंचितांनीच मराठी जगविली. आपणच मराठीचे मारेकरी आहोत. स्वत:च्या स्वभाषेचे रक्षण दुसऱ्याचे गळे कापून होणार नाही. मराठी समाज एकसंघ, सजग जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत आपली भाषा नोकरीची, व्यवहाराची व संधीची होणार नाही, असे मार्मिक विवेचन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष व श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले.ते येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.विचारपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एन एस कोकोडे तर उपस्थितीत नागपूरचे कवी वसंत वाहोकार, उपप्राचार्य डॉ. धनंजय गहाणे, मराठी विभागप्रमुख डॉ. धनराज खानोरकर, डॉ. प्रकाश वट्टी उपस्थित होते. याप्रसंगी वाहोकरांनी आता काळ तुमचा आहे, अभिव्यक्ती व्यक्त करण्याचा आहे. सर्वांनी व्यक्त आपल्या स्वभाषेत व्हा, असा सल्ला दिला. पाहुण्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. गोंडवाना विद्यापीठाच्या एम ए मराठी परीक्षेत मेरीट विद्यार्थी शितल भानारकर व मनीषा बावणकर यांना गौरविण्यात आले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. कोकोडे म्हणाले, खरं आहे अनेक देश आपल्या स्वभाषेतच तंत्रज्ञान, विज्ञानाचे शोध मांडत आहेत. मेंदूचे भरणपोषण करण्याचे काम साहित्यच करीत असते. भाषा, संस्कृतीचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.प्रास्ताविक डॉ. धनराज खानोरकर तर संचालन डॉ. प्रकाश वट्टी यांनी केले तर आभार प्रा. पद्माकर वानखडे यांनी मानले.