शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषा नोकरीची, व्यवहाराची झाली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:39 IST

अरबी, उर्दू शिकता येते, ती भाषा नोकरी देते. मग मराठी का नाही? १९३४ पासून आंम्ही मराठी विद्यापीठ मागतो आहोत, मिळत नाही आहे. जोपर्यंत मराठी समाज भाषा व संस्कृतीबाबत सजग नाही, तोपर्यंत होणार नाही. ज्यांचे अर्थकारण सक्षम त्यांचे भाषाकारण सक्षम, हे इंग्रजीच्या बाबतीत झाले आहे.

ठळक मुद्देमराठी वाङ्मय मंडळ कार्यक्रम : श्रीपाद जोशी यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : अरबी, उर्दू शिकता येते, ती भाषा नोकरी देते. मग मराठी का नाही? १९३४ पासून आंम्ही मराठी विद्यापीठ मागतो आहोत, मिळत नाही आहे. जोपर्यंत मराठी समाज भाषा व संस्कृतीबाबत सजग नाही, तोपर्यंत होणार नाही. ज्यांचे अर्थकारण सक्षम त्यांचे भाषाकारण सक्षम, हे इंग्रजीच्या बाबतीत झाले आहे. या राज्यात अजूनही मराठी शिक्षणाचा कायदा नाही. स्वभाषा नाही तर विचार नाही, विचार नाही तर अभिव्यक्ती नाही. पोकळ, दिखाऊंच्या संस्कृतीने मेंदूवर आक्रमण केले आहे. तंत्रज्ञानाची साधने प्रगत असतांना जग विकृत होत आहे. वारकऱ्यांनी, वंचितांनीच मराठी जगविली. आपणच मराठीचे मारेकरी आहोत. स्वत:च्या स्वभाषेचे रक्षण दुसऱ्याचे गळे कापून होणार नाही. मराठी समाज एकसंघ, सजग जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत आपली भाषा नोकरीची, व्यवहाराची व संधीची होणार नाही, असे मार्मिक विवेचन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष व श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले.ते येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.विचारपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एन एस कोकोडे तर उपस्थितीत नागपूरचे कवी वसंत वाहोकार, उपप्राचार्य डॉ. धनंजय गहाणे, मराठी विभागप्रमुख डॉ. धनराज खानोरकर, डॉ. प्रकाश वट्टी उपस्थित होते. याप्रसंगी वाहोकरांनी आता काळ तुमचा आहे, अभिव्यक्ती व्यक्त करण्याचा आहे. सर्वांनी व्यक्त आपल्या स्वभाषेत व्हा, असा सल्ला दिला. पाहुण्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. गोंडवाना विद्यापीठाच्या एम ए मराठी परीक्षेत मेरीट विद्यार्थी शितल भानारकर व मनीषा बावणकर यांना गौरविण्यात आले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. कोकोडे म्हणाले, खरं आहे अनेक देश आपल्या स्वभाषेतच तंत्रज्ञान, विज्ञानाचे शोध मांडत आहेत. मेंदूचे भरणपोषण करण्याचे काम साहित्यच करीत असते. भाषा, संस्कृतीचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.प्रास्ताविक डॉ. धनराज खानोरकर तर संचालन डॉ. प्रकाश वट्टी यांनी केले तर आभार प्रा. पद्माकर वानखडे यांनी मानले.