शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

मराठी भाषा नोकरीची, व्यवहाराची झाली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:39 IST

अरबी, उर्दू शिकता येते, ती भाषा नोकरी देते. मग मराठी का नाही? १९३४ पासून आंम्ही मराठी विद्यापीठ मागतो आहोत, मिळत नाही आहे. जोपर्यंत मराठी समाज भाषा व संस्कृतीबाबत सजग नाही, तोपर्यंत होणार नाही. ज्यांचे अर्थकारण सक्षम त्यांचे भाषाकारण सक्षम, हे इंग्रजीच्या बाबतीत झाले आहे.

ठळक मुद्देमराठी वाङ्मय मंडळ कार्यक्रम : श्रीपाद जोशी यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : अरबी, उर्दू शिकता येते, ती भाषा नोकरी देते. मग मराठी का नाही? १९३४ पासून आंम्ही मराठी विद्यापीठ मागतो आहोत, मिळत नाही आहे. जोपर्यंत मराठी समाज भाषा व संस्कृतीबाबत सजग नाही, तोपर्यंत होणार नाही. ज्यांचे अर्थकारण सक्षम त्यांचे भाषाकारण सक्षम, हे इंग्रजीच्या बाबतीत झाले आहे. या राज्यात अजूनही मराठी शिक्षणाचा कायदा नाही. स्वभाषा नाही तर विचार नाही, विचार नाही तर अभिव्यक्ती नाही. पोकळ, दिखाऊंच्या संस्कृतीने मेंदूवर आक्रमण केले आहे. तंत्रज्ञानाची साधने प्रगत असतांना जग विकृत होत आहे. वारकऱ्यांनी, वंचितांनीच मराठी जगविली. आपणच मराठीचे मारेकरी आहोत. स्वत:च्या स्वभाषेचे रक्षण दुसऱ्याचे गळे कापून होणार नाही. मराठी समाज एकसंघ, सजग जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत आपली भाषा नोकरीची, व्यवहाराची व संधीची होणार नाही, असे मार्मिक विवेचन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष व श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले.ते येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.विचारपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एन एस कोकोडे तर उपस्थितीत नागपूरचे कवी वसंत वाहोकार, उपप्राचार्य डॉ. धनंजय गहाणे, मराठी विभागप्रमुख डॉ. धनराज खानोरकर, डॉ. प्रकाश वट्टी उपस्थित होते. याप्रसंगी वाहोकरांनी आता काळ तुमचा आहे, अभिव्यक्ती व्यक्त करण्याचा आहे. सर्वांनी व्यक्त आपल्या स्वभाषेत व्हा, असा सल्ला दिला. पाहुण्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. गोंडवाना विद्यापीठाच्या एम ए मराठी परीक्षेत मेरीट विद्यार्थी शितल भानारकर व मनीषा बावणकर यांना गौरविण्यात आले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. कोकोडे म्हणाले, खरं आहे अनेक देश आपल्या स्वभाषेतच तंत्रज्ञान, विज्ञानाचे शोध मांडत आहेत. मेंदूचे भरणपोषण करण्याचे काम साहित्यच करीत असते. भाषा, संस्कृतीचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.प्रास्ताविक डॉ. धनराज खानोरकर तर संचालन डॉ. प्रकाश वट्टी यांनी केले तर आभार प्रा. पद्माकर वानखडे यांनी मानले.