शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

‘श्रीनिवासन’च्या दुर्दैवी मृत्यूने अनेक प्रश्न

By admin | Updated: May 1, 2017 00:44 IST

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला वैभव प्राप्त करून देण्यात ‘जय’चे जेवढे योगदान तेवढेच योगदान ‘श्रीनिवासन’चे सुद्धा आहे.

उमेरड-कऱ्हांडला अभयारण्य : मानव-वन्यप्राणी संघर्ष ऐरणीवरघनश्याम नवघडे - नागभीडउमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला वैभव प्राप्त करून देण्यात ‘जय’चे जेवढे योगदान तेवढेच योगदान ‘श्रीनिवासन’चे सुद्धा आहे. मात्र याच श्रीनिवासनच्या मृत्यूस एक शेतकरी कारण ठरला असून यावरून श्रीनिवासनच्या मृत्यूबद्दल हळहळ तर व्यक्त होत आहेच. पण त्याचबरोबर शेतीच्या संरक्षणाचा मुद्दाही अधोरेखित करण्यात येत आहे.गेल्या काही वर्षांत वाघ आणि मानव यांच्यातील संघर्ष मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. वाघ जंगल सोडून मानवी वस्तीकडे धाव घेत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. वाघावर हे दिवस का आलेत, याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. वाघाने किंवा तत्सम प्राण्यांनी मानवी वस्तीकडे धाव घेवू नये, यासाठी शासनस्तरावर काही उपाय योजना करता येतील का, अशाही प्रतिक्रिया श्रीनिवासनच्या मृत्यूच्या निमित्ताने व्यक्त होत आहेत. वराहपालन व ससेपालन हा एक उपाय सूचविला जात आहे.ज्या शेतकऱ्याच्या शेतात श्रीनिवासनचा विद्युत प्रवाहाने दुर्दैवी अंत झाला, तो शेतकरी काही उच्च विद्याविभूषित नाही. त्याला कायद्याचे ज्ञान असावे, असेही वाटत नाही. शेतात राबणे आणि आपला प्रपंच चालविणे, हेच त्याचे जग. जीवापाड जपलेलं पीक रानटी डुकरं नष्ट करतात. त्यांच्यापासून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी त्याने शेतात विद्युत प्रवाह सोडला. पण झाले उलटे. प्रख्यात असा श्रीनिवासन नावाचा वाघच यात अडकला.यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी आता वन विभागानेच पुढाकार घेण्याची गरज आहे. गेल्या तीन- चार वर्षांपासून वन विभाग जंगल परिसरातील गावांना एल.पी.जी. गॅसचे वितरण करीत आहे. लोकांनी सरपणासाठी जंगलात जावू नये, जंगल तोड करू नये, शिवाय मानव आणि जंगली पशू यांच्यातील संघर्ष टळावा हा यामागचा उद्देश. अगदी याच धरतीवर जंगल व्याप्त शेतीचे सर्वेक्षण करून अशा शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालणारे व कमी विद्युत प्रवाहाचे कुंपण वितरित करावे. या सोबतच अशा शेतकऱ्यांची वर्षातून एकादी कार्यशाळासुद्धा आयोजित करावी. यात प्रबोधन करावे, अशाही प्रतिक्रिया यासंदर्भात ऐकायला मिळत आहेत.वाघच काय अन्य पशुपक्षीही राष्ट्रीय संपत्ती आहे. या राष्ट्रीय संपत्ती संरक्षण आणि जतन होणे गरजेचे आहे. असाच प्रकार सुरू राहिला तर एक दिवस असा येईल की, हे सर्व पशू पक्षी चित्रातच पाहायला मिळतील. एवढेच काय आज काही प्रमाणात का होईना वाघ आहे म्हणून जंगल तरी शिल्लक आहेत. यासाठीही वाघाचे जतन होणे महत्त्वाचे आहे. जय तर एक वर्षापासून बेपत्ता आहे. आज श्रीनिवासनचा अशाप्रकारे दुर्दैवी शेवट झाला. उद्या अन्य वाघांवरही अशी पाळी येवू शकते आणि म्हणूनच काळाची पावले ओळखून वन विभागाने वाघांच्या व जंगली श्वापदांच्या संरक्षणासाठी उपाययोजना राबविण्याची गरज आहे.