शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

मोलकरणींना अनेक दरवाजे बंद, कुटुंबाचा गाडा कसा चालणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:27 IST

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता शासनाने कठोर पाऊल उचलले असून, राज्यभरात ...

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता शासनाने कठोर पाऊल उचलले असून, राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. काहींनी घरकाम करणाऱ्या मोलकरणींचे काम बंद केले आहे. त्यामुळे मोलकरणींवर मोठे संकट कोसळले असून, उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. विशेष म्हणजे अनेक मोलकरणींची कुठेच नोंद नसल्यामुळे त्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असून, सध्या स्थितीत कोरोना रुग्णसंख्या दररोज हजारी पार करीत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाची दहशत पसरली आहे. प्रत्येक वाॅर्ड, गल्लीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने घरीच राहण्याचा सल्ला प्रशासन सातत्याने देत आहे. आता तर राज्य सरकारने संचारबंदी लागू केली असून, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईही केली जाणार आहे. त्यामुळे काही नागरिकांनी आपल्याकडे काम करणाऱ्या मोलकरणींना कामावरून काढले आहे. काहींनी काढले नसले तरी मालकांच्या घरापर्यंत जाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे हातचे कामही जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, कोरोना रुग्णसंख्येमुळे काहींनी मोलकरणींनाही घरात न बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संकट अधिकच वाढले आहे. कोरोनामुळे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. मजुरांचा रोजगारही हिरावला आहे. त्यामुळे जगण्याचा प्रश्न प्रत्येक नागरिकावर येऊन ठेपला आहे. आता घरकामगारांवरही संकट ओढवले आहे.

चंद्रपूर शहराचा विचार केल्यास शहरात हजारो नागरिकांकडे मोलकरणी आहे. एका घरून दुसरीकडे त्या काम करतात. मात्र, संचारबंदीमुळे त्यांना जाण्याचा प्रश्न आहे. अशावेळी त्यांना मदत करणे अत्यावश्यक आहे.

बाॅकस्

एक काम करण्यासाठी मिळतात ६०० रुपये

शहरातील काही मोलकरणींच्या मते एका घरात एक काम करण्यासाठी केवळ ६०० रुपये मिळतात. यामध्ये भांडे, कपडे, साफसफाई असे काम केल्यास किमान २०० ते हजारच्या जवळपास मिळतात. असे चार ते पाच घरात काम करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, आता कोरोनामुळे आर्थिक प्रश्न उभा ठाकला आहे. काही घरामध्ये स्वयंपाक केल्यास दीड ते दोन हजार रुपये मिळतात. मात्र, आता जाण्या-येण्याचा प्रश्न असल्यामुळे हातचे काम सोडून देण्याची वेळ आली आहे.

बाॅक्स

नोंदणी नाही

चंद्रपूर शहरात मोठ्या संख्येने मोलकरणींची संख्या आहे. मात्र, प्रत्येकाचीच शासनाकडे नोंदणी झालेली नाही. काही मोजक्या आणि संस्थांकडून काम करीत असलेल्यांचीच नोंदणी आहे. त्यामुळे या मोलकरणींना शासनाकडून कोणतेही अनुदान अथवा शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे शासनाने प्रत्येक मोलकरणींची नोंदणी करून त्यांना आर्थिक लाभ द्यावा, अशी मागणीही केली जात आहे.

कोट

कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून अनेक काम बंद झाले आहे. आता पुन्हा कोरोनामुळे काम करणे कठीण झाले आहे. अनेकांमध्ये कोरोनाची भीतीचे वातावरण आहे. काहीजण काम बंद करीत आहेत. एका वाॅर्डातून दुसऱ्या वाॅर्डात काम करायला जावे लागते. त्यामुळे जाण्या-येण्याचा प्रश्न आहे.

-आम्रपाली कोडापे

कोट

मागील वर्षभरापासून कोरोना संकट आले आहे. मागच्या वर्षी अनेकांनी काम बंद केले. मोठ्या कष्टाने कसे तरी काम मिळविले. मात्र, आता पुन्हा कोरोना संकट आल्यामुळे हातातील काम जाण्याची वेळ आली असून, जगण्याचा प्रश्न आहे. शासनाने नोंदणी नसलेल्या मोलकरणींनाही आर्थिक मदत करावी.

- शोभा वनकर