शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

बियाणे न उगविल्याच्या अनेक तक्रारी

By admin | Updated: July 10, 2016 00:36 IST

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील महाबीज कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची उगवन झाली नसल्याचे वृत्त लोकमतमधून प्रकाशित होताच...

महाबीजची बियाणे : शेतकरी न्यायालयात जाण्याच्या तयारीतवरोरा: तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील महाबीज कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची उगवन झाली नसल्याचे वृत्त लोकमतमधून प्रकाशित होताच महाबीज कंपनी व कृषी विभाग खङबडून जागे झाले. आता पुन्हा अनेक शेतकऱ्यांनी आपणही घेतलेले महाबीजचे बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या आहेत. दिवसागणिक तक्रारीमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.वरोरा तालुक्यातील कृषी विभागाच्या वतीने गळीत धान्य योजने अंतर्गत अनेक गावातील शेतकऱ्यांना दोन बॅग महाबीज सोयाबीन बियाणे पुरविण्यात आले. काही शेतकऱ्यांनी महाबीज सोयाबीन बियाण्यांवर अनुदान मिळत असल्याने कृषी केंद्रातून महाबीजचे सोयाबीन बियाणे ेविकत घेवून शेतात पेरणी केली. यामध्ये वरोरा तालुक्यातील एकट्या भेंडाळा गावातील १२३ शेतकऱ्यांच्या शेतातील महाबीजचे सोयाबीन बियाणे उगविलेच नाही. याबाबत तालुका कृषी विभागाने तातडीने संबंधित शेताला भेट देवून पंचनामे करणे सुरु केले आहे. यासोबत साखरा गिरोला, चारगाव, पिंपळगाव आदी गावातील काही शेतकऱ्यांनी महाबीजचे सोयाबीन बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे देणे सुरु केल्याने कृषी विभाग व महाबीज कंपनीचे प्रतिनिधी तक्रारी बघून अवाक झाले आहेत. तक्रारी आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतात जावून पाहणी सुरु केली आहे. नगदी समजले जाणारे सोयाबीेनची उगवन झाली नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले असून यामुळे त्यांना आर्थिक फटकाही सहन करावा लागणार आहे. परिणामी शेतकरी पूर्णत: हताश झाला असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)अतिपावसाचा हास्यास्पद दावा२७ व २८ जून दरम्यान शेतकऱ्यांनी महाबीजच्या बियाण्यांची पेरणी केली. याच कालावधीमध्ये त्याच गावातील इतर शेतकऱ्यांनी दुसऱ्या कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरले. त्यांची उगवन मोठ्या प्रमाणात झाली. २९ जूनला खूप पाऊस परिसरात झाला. त्यामुळे सोयाबीन बियाणे उगविले नाही, असा दावा तज्ज्ञांनी केला. अधिक प्रमाणात पाऊस झाल्यास महाबीज वगळता इतर कंपनीच्या बियाण्यांची कशी उगवन झाली, यावर ते निरुत्तर झाले. त्यामुळे अतिपावसाचा दावा हास्यस्पद ठरला असल्याचे दिसून येत आहे.