शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

बियाणे न उगविल्याच्या अनेक तक्रारी

By admin | Updated: July 10, 2016 00:36 IST

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील महाबीज कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची उगवन झाली नसल्याचे वृत्त लोकमतमधून प्रकाशित होताच...

महाबीजची बियाणे : शेतकरी न्यायालयात जाण्याच्या तयारीतवरोरा: तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील महाबीज कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची उगवन झाली नसल्याचे वृत्त लोकमतमधून प्रकाशित होताच महाबीज कंपनी व कृषी विभाग खङबडून जागे झाले. आता पुन्हा अनेक शेतकऱ्यांनी आपणही घेतलेले महाबीजचे बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या आहेत. दिवसागणिक तक्रारीमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.वरोरा तालुक्यातील कृषी विभागाच्या वतीने गळीत धान्य योजने अंतर्गत अनेक गावातील शेतकऱ्यांना दोन बॅग महाबीज सोयाबीन बियाणे पुरविण्यात आले. काही शेतकऱ्यांनी महाबीज सोयाबीन बियाण्यांवर अनुदान मिळत असल्याने कृषी केंद्रातून महाबीजचे सोयाबीन बियाणे ेविकत घेवून शेतात पेरणी केली. यामध्ये वरोरा तालुक्यातील एकट्या भेंडाळा गावातील १२३ शेतकऱ्यांच्या शेतातील महाबीजचे सोयाबीन बियाणे उगविलेच नाही. याबाबत तालुका कृषी विभागाने तातडीने संबंधित शेताला भेट देवून पंचनामे करणे सुरु केले आहे. यासोबत साखरा गिरोला, चारगाव, पिंपळगाव आदी गावातील काही शेतकऱ्यांनी महाबीजचे सोयाबीन बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे देणे सुरु केल्याने कृषी विभाग व महाबीज कंपनीचे प्रतिनिधी तक्रारी बघून अवाक झाले आहेत. तक्रारी आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतात जावून पाहणी सुरु केली आहे. नगदी समजले जाणारे सोयाबीेनची उगवन झाली नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले असून यामुळे त्यांना आर्थिक फटकाही सहन करावा लागणार आहे. परिणामी शेतकरी पूर्णत: हताश झाला असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)अतिपावसाचा हास्यास्पद दावा२७ व २८ जून दरम्यान शेतकऱ्यांनी महाबीजच्या बियाण्यांची पेरणी केली. याच कालावधीमध्ये त्याच गावातील इतर शेतकऱ्यांनी दुसऱ्या कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरले. त्यांची उगवन मोठ्या प्रमाणात झाली. २९ जूनला खूप पाऊस परिसरात झाला. त्यामुळे सोयाबीन बियाणे उगविले नाही, असा दावा तज्ज्ञांनी केला. अधिक प्रमाणात पाऊस झाल्यास महाबीज वगळता इतर कंपनीच्या बियाण्यांची कशी उगवन झाली, यावर ते निरुत्तर झाले. त्यामुळे अतिपावसाचा दावा हास्यस्पद ठरला असल्याचे दिसून येत आहे.