शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

बियाणे न उगविल्याच्या अनेक तक्रारी

By admin | Updated: July 10, 2016 00:36 IST

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील महाबीज कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची उगवन झाली नसल्याचे वृत्त लोकमतमधून प्रकाशित होताच...

महाबीजची बियाणे : शेतकरी न्यायालयात जाण्याच्या तयारीतवरोरा: तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील महाबीज कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची उगवन झाली नसल्याचे वृत्त लोकमतमधून प्रकाशित होताच महाबीज कंपनी व कृषी विभाग खङबडून जागे झाले. आता पुन्हा अनेक शेतकऱ्यांनी आपणही घेतलेले महाबीजचे बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या आहेत. दिवसागणिक तक्रारीमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.वरोरा तालुक्यातील कृषी विभागाच्या वतीने गळीत धान्य योजने अंतर्गत अनेक गावातील शेतकऱ्यांना दोन बॅग महाबीज सोयाबीन बियाणे पुरविण्यात आले. काही शेतकऱ्यांनी महाबीज सोयाबीन बियाण्यांवर अनुदान मिळत असल्याने कृषी केंद्रातून महाबीजचे सोयाबीन बियाणे ेविकत घेवून शेतात पेरणी केली. यामध्ये वरोरा तालुक्यातील एकट्या भेंडाळा गावातील १२३ शेतकऱ्यांच्या शेतातील महाबीजचे सोयाबीन बियाणे उगविलेच नाही. याबाबत तालुका कृषी विभागाने तातडीने संबंधित शेताला भेट देवून पंचनामे करणे सुरु केले आहे. यासोबत साखरा गिरोला, चारगाव, पिंपळगाव आदी गावातील काही शेतकऱ्यांनी महाबीजचे सोयाबीन बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे देणे सुरु केल्याने कृषी विभाग व महाबीज कंपनीचे प्रतिनिधी तक्रारी बघून अवाक झाले आहेत. तक्रारी आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतात जावून पाहणी सुरु केली आहे. नगदी समजले जाणारे सोयाबीेनची उगवन झाली नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले असून यामुळे त्यांना आर्थिक फटकाही सहन करावा लागणार आहे. परिणामी शेतकरी पूर्णत: हताश झाला असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)अतिपावसाचा हास्यास्पद दावा२७ व २८ जून दरम्यान शेतकऱ्यांनी महाबीजच्या बियाण्यांची पेरणी केली. याच कालावधीमध्ये त्याच गावातील इतर शेतकऱ्यांनी दुसऱ्या कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरले. त्यांची उगवन मोठ्या प्रमाणात झाली. २९ जूनला खूप पाऊस परिसरात झाला. त्यामुळे सोयाबीन बियाणे उगविले नाही, असा दावा तज्ज्ञांनी केला. अधिक प्रमाणात पाऊस झाल्यास महाबीज वगळता इतर कंपनीच्या बियाण्यांची कशी उगवन झाली, यावर ते निरुत्तर झाले. त्यामुळे अतिपावसाचा दावा हास्यस्पद ठरला असल्याचे दिसून येत आहे.