शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

मनपाची घागर उताणी रे...

By admin | Updated: January 13, 2016 01:27 IST

मनपा प्रशासन भरमसाठ कर आकारून नागरिकांची कुचंबना करीत आहे. मात्र आवश्यक गरज असलेले पाणी पुरवठा करण्याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे.

चंद्रपूरकरांना अनियमित पाणी पुरवठ्याचा त्रास : महानगर पालिका प्रशासनाकडून दुर्लक्षचंद्रपूर : पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटी कंपनीच्या मनमानी कारभारामुळे चंद्रपूरकर त्रस्त झाले आहेत. सर्वात महत्त्वपूर्ण गरज समजले जाणारे पाणीच नागरिकांना मिळणे कठीण झाले असून सर्व बाजुने नागरिकांची ओरड सुरू आहे. मनपाच्या सभेत पाणीसमस्येवर चर्चा होते, मात्र कार्यवाही काहीच होत नाही. चंद्रपूरकर पाण्यासाठी आजही टाहो फोडत आहेत. ‘लोकमत लोकसंवाद’च्या माध्यमातून लोकमत साद दिली. त्यावर नागरिकांच्या प्रतिक्रियांचा पाऊद पडला. जनसामान्यांची दखल जनतेचा आवाज लोकसंवादातून मांडत आहेत.मनपा प्रशासनाकडून केला जाणारा पाणी पुरवठा हा अनियमीत असते. यापुर्वी पाणी पुरवठा बंद करण्यापुर्वी सूचना दिली जात होती. मात्र आता कोणतीही सूचना न देता पाणी पुरवठा बंद ठेवला जातो. तुकूम प्रभागातील पाणी पुरवठा रविवार व सोमवारी दोन दिवस बंद होता. त्यामुळे प्रचंड गैरसोय झाली. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपाने विशेष काळजी घ्यावी.- रेखाताई दौड, तुकूम, चंद्रपूर.मनपा प्रशासन भरमसाठ कर आकारून नागरिकांची कुचंबना करीत आहे. मात्र आवश्यक गरज असलेले पाणी पुरवठा करण्याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे कधी नळ येतात, तर कधी नाही. ज्यांच्याकडे नळाव्यतीरिक्त पाण्याचे दुसरे स्त्रोत नाही, त्यांना नळ न आल्यास पाण्यासाठी मोठी पंचाईत होत असते. मनपा प्रशासनाने या भोंगळ कारभाराकडे त्वरीत लक्ष द्यावे. - मनोज शेळकी, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर.पाणी हे आवश्यक गरज आहे. मात्र मनपा प्रशासन ही आवश्यक गरज पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे. अनेकदा गढूळ पाण्याचा पुरवठा होते. त्यामुळे आजार होण्याची भीती असते. अनेकदा याबाबत तक्रारी केल्या. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. नळाला पाणी येते मात्र काही वेळातच पुरवठा बंद होतो. त्यामुळे एका कुटुंबाला आवश्यक गरजांसाठी पाणी पुरेल एवढ्या पाण्याचा पुरवठा करावा. अन्यथा घागर मोर्चा नेण्यात येईल. - अजय सहारकर, समाधी वॉर्ड, चंद्रपूर. आरोग्यासाठी शुद्ध पाण्याची गरज असते. मनपा प्रशासनातर्फे शुद्ध पाणी पुरविण्याचे अभिवचन दिले जाते. परंतु पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराच्या मनमानीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नळाद्धारे कधीच शुद्ध पाणी मिळत नाही. त्यामुळे विविध आजारांचा सामना करावा लागतो. तक्रारी केल्यास तक्रारीची दखलदेखील घेतली जात नाही. -हरिश राऊत, सरकार नगर, चंद्रपूरनळ सुरू झाल्यानंतर किमान अर्धा तास पिवळ्या रंगाचे पाणी येते. अनेकदा मातीमिश्रीत पाणी येते. त्यामुळे बराचवेळ शुद्ध पाण्याची प्रतीक्षा करीत ताटकळत उभे रहावे लागते. हे शुद्ध पाणीदेखील अतिशय अल्पकाळ येते. त्यामुळे नळ असूनदेखील नळाच्या पाण्याचा लाभ मिळत नाही. महानगर पालिकेने तातडीने यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. -ममता इजमुलवार, रामनगर, चंद्रपूरपाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराची अतिशय मनमानी सुरू आहे. नळाला पाणी येण्याच्या वेळा ठरलेल्या नाहीत. कधीही पाणी पुरवठा केला जातो अन् मनात येईल तेव्हा तो बंद केल्या जातो. अनेकदा तर दोन-दोन दिवस नळाला पाणी येत नाही. परिणामी अन्य स्त्रोत नसल्याने पाण्यासाठी हिंडावे लागते. यात वेळेचा अपव्यय होतो. या व्यवस्थेत सुधारणा आणावी. - प्रीती गोजे, वडगाव रोड, चंद्रपूर.अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज आहे. त्यामुळे गटारातील पाणी या पाईपमध्ये शिरते. त्यातून पाणी दूषित होते. महिनोगंती हे लिकेजेस दुरूस्त केले जात नाहीत. त्यामुळे जलजन्य आजाराचा सामना करावा लागतो. ग्राहकांकडून वर्षभराचे करापोटी हजारो रुपये वसुल केले जातात. मात्र सुव्यवस्थित पाणी पुरवठा केला जात नाही. - नितीन गुणशेड्डीवार, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर.