शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनपाची घागर उताणी रे...

By admin | Updated: January 13, 2016 01:27 IST

मनपा प्रशासन भरमसाठ कर आकारून नागरिकांची कुचंबना करीत आहे. मात्र आवश्यक गरज असलेले पाणी पुरवठा करण्याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे.

चंद्रपूरकरांना अनियमित पाणी पुरवठ्याचा त्रास : महानगर पालिका प्रशासनाकडून दुर्लक्षचंद्रपूर : पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटी कंपनीच्या मनमानी कारभारामुळे चंद्रपूरकर त्रस्त झाले आहेत. सर्वात महत्त्वपूर्ण गरज समजले जाणारे पाणीच नागरिकांना मिळणे कठीण झाले असून सर्व बाजुने नागरिकांची ओरड सुरू आहे. मनपाच्या सभेत पाणीसमस्येवर चर्चा होते, मात्र कार्यवाही काहीच होत नाही. चंद्रपूरकर पाण्यासाठी आजही टाहो फोडत आहेत. ‘लोकमत लोकसंवाद’च्या माध्यमातून लोकमत साद दिली. त्यावर नागरिकांच्या प्रतिक्रियांचा पाऊद पडला. जनसामान्यांची दखल जनतेचा आवाज लोकसंवादातून मांडत आहेत.मनपा प्रशासनाकडून केला जाणारा पाणी पुरवठा हा अनियमीत असते. यापुर्वी पाणी पुरवठा बंद करण्यापुर्वी सूचना दिली जात होती. मात्र आता कोणतीही सूचना न देता पाणी पुरवठा बंद ठेवला जातो. तुकूम प्रभागातील पाणी पुरवठा रविवार व सोमवारी दोन दिवस बंद होता. त्यामुळे प्रचंड गैरसोय झाली. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपाने विशेष काळजी घ्यावी.- रेखाताई दौड, तुकूम, चंद्रपूर.मनपा प्रशासन भरमसाठ कर आकारून नागरिकांची कुचंबना करीत आहे. मात्र आवश्यक गरज असलेले पाणी पुरवठा करण्याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे कधी नळ येतात, तर कधी नाही. ज्यांच्याकडे नळाव्यतीरिक्त पाण्याचे दुसरे स्त्रोत नाही, त्यांना नळ न आल्यास पाण्यासाठी मोठी पंचाईत होत असते. मनपा प्रशासनाने या भोंगळ कारभाराकडे त्वरीत लक्ष द्यावे. - मनोज शेळकी, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर.पाणी हे आवश्यक गरज आहे. मात्र मनपा प्रशासन ही आवश्यक गरज पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे. अनेकदा गढूळ पाण्याचा पुरवठा होते. त्यामुळे आजार होण्याची भीती असते. अनेकदा याबाबत तक्रारी केल्या. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. नळाला पाणी येते मात्र काही वेळातच पुरवठा बंद होतो. त्यामुळे एका कुटुंबाला आवश्यक गरजांसाठी पाणी पुरेल एवढ्या पाण्याचा पुरवठा करावा. अन्यथा घागर मोर्चा नेण्यात येईल. - अजय सहारकर, समाधी वॉर्ड, चंद्रपूर. आरोग्यासाठी शुद्ध पाण्याची गरज असते. मनपा प्रशासनातर्फे शुद्ध पाणी पुरविण्याचे अभिवचन दिले जाते. परंतु पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराच्या मनमानीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नळाद्धारे कधीच शुद्ध पाणी मिळत नाही. त्यामुळे विविध आजारांचा सामना करावा लागतो. तक्रारी केल्यास तक्रारीची दखलदेखील घेतली जात नाही. -हरिश राऊत, सरकार नगर, चंद्रपूरनळ सुरू झाल्यानंतर किमान अर्धा तास पिवळ्या रंगाचे पाणी येते. अनेकदा मातीमिश्रीत पाणी येते. त्यामुळे बराचवेळ शुद्ध पाण्याची प्रतीक्षा करीत ताटकळत उभे रहावे लागते. हे शुद्ध पाणीदेखील अतिशय अल्पकाळ येते. त्यामुळे नळ असूनदेखील नळाच्या पाण्याचा लाभ मिळत नाही. महानगर पालिकेने तातडीने यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. -ममता इजमुलवार, रामनगर, चंद्रपूरपाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराची अतिशय मनमानी सुरू आहे. नळाला पाणी येण्याच्या वेळा ठरलेल्या नाहीत. कधीही पाणी पुरवठा केला जातो अन् मनात येईल तेव्हा तो बंद केल्या जातो. अनेकदा तर दोन-दोन दिवस नळाला पाणी येत नाही. परिणामी अन्य स्त्रोत नसल्याने पाण्यासाठी हिंडावे लागते. यात वेळेचा अपव्यय होतो. या व्यवस्थेत सुधारणा आणावी. - प्रीती गोजे, वडगाव रोड, चंद्रपूर.अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज आहे. त्यामुळे गटारातील पाणी या पाईपमध्ये शिरते. त्यातून पाणी दूषित होते. महिनोगंती हे लिकेजेस दुरूस्त केले जात नाहीत. त्यामुळे जलजन्य आजाराचा सामना करावा लागतो. ग्राहकांकडून वर्षभराचे करापोटी हजारो रुपये वसुल केले जातात. मात्र सुव्यवस्थित पाणी पुरवठा केला जात नाही. - नितीन गुणशेड्डीवार, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर.