शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

माणिकगड विकासाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:34 IST

गडचांदूर-जिवती मार्गावरील माणिकगड पहाडावरील निसर्गाने वेढलेला विलोभनीय अतिप्राचीन माणिकगड किल्ल्याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला. विकास निधीसुद्धा मिळाला. बरीच विकास कामे पूर्ण झाली. मात्र अजूनही बरीच विकास कामे प्रलंबित आहेत. ती तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देपर्यटकांची संख्या वाढली : निधी मिळाला; मात्र विकास कामे प्रलंबितच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : गडचांदूर-जिवती मार्गावरील माणिकगड पहाडावरील निसर्गाने वेढलेला विलोभनीय अतिप्राचीन माणिकगड किल्ल्याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला. विकास निधीसुद्धा मिळाला. बरीच विकास कामे पूर्ण झाली. मात्र अजूनही बरीच विकास कामे प्रलंबित आहेत. ती तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे.माणिकगड किल्ला, विष्णू मंदिर, शंकरदेव मंदिर, अमलनाला प्रकल्प ही प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी चंद्रपूर, यवतमाळ, आदिलाबाद, नागपूर, गडचांदूर, अमरावती, वर्धा जिल्ह्यातून पर्यटक मोठ्या प्रमाणात सहकुटूंब येतात. मात्र माणिकगड किल्ल्यावर सुविधा नसल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत असतात. सुटीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी असते. माणिकगड किल्ल्याच्या विकासासाठी तत्कालीन आमदार सुभाष धोटे यांनी शासनाकडून विकास निधी मंजूर करून घेतला. त्यातून बरीच विकास कामे झाली आहे. मात्र अजूनही बरीच विकास कामे शिल्लक आहे. माणिकगड किल्ल्यापर्यंतचा कच्चा रस्ता मुसळधार पावसाने खराब झाला आहे. सिमेंट रस्ता करणे गरजेचे आहे. किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यानंतर लहान मुलांसाठी खेळणी लावली आहे. मात्र ती दुर्लक्षित आहे. सर्वत्र गवत वाढलेले आहे. विकास कामांसाठी आणखी निधी हवा आहे.चंद्रपूर येथून माणिकगड किल्ला बघण्यासाठी कुटुंबासह आलो. किल्ला खुप सुंदर आहे. मात्र स्वच्छता नसल्याने त्रास होतो. परिसर स्वच्छ असावा व किल्ल्यावर फिरण्यासाठी सिमेंट रस्ते तयार करणे गरजेचे आहे.-अजित गेडाम, एक पर्यटकमाणिकगड किल्ला पुरातन असून विद्यार्थी अभ्यासासाठी येतात. या किल्ल्याचा विकास होणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे.- इबादूल हसन सिध्दीकी,घुग्घुस