शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
3
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
4
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
6
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
7
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
8
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
9
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
10
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
11
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
12
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
13
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
14
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
15
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
16
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
17
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
18
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
19
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
20
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन

आंब्याची लागवड आता नव्या तंत्राने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:20 IST

बल्लारपूर तालुक्यात पहिला प्रयोग : पारंपरिक पिकांना फाटा मंगल जीवने बल्लारपूर : निसर्गाचा लहरीपणा व तालुक्यात सिंचनाचा अभाव आणि ...

बल्लारपूर तालुक्यात पहिला प्रयोग : पारंपरिक पिकांना फाटा

मंगल जीवने

बल्लारपूर : निसर्गाचा लहरीपणा व तालुक्यात सिंचनाचा अभाव आणि बदलत्या परिस्थितीमुळे मजुरीचे नियोजन या बाबींना अनुसरून शेतीचे व्यवस्थापन ही एक गुंतागुंतीची बाब बनली आहे. पीक हाती येईपर्यंत शेतकऱ्यांचा जीव टांगणीला असतो. यंदा मात्र बल्लारपूर तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना संजीवनी देण्याचे काम केले आहे. नव्या तंत्राने फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंब्याची लागवड करून कृषी विभागाने शेतकऱ्यांचा उत्साह वाढविला आहे. तालुक्यातील हा पहिला प्रयोग इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरणारा आहे.

बल्लारपूर तालुक्यातील २८ किलोमीटरवर असलेले मोहाडी तुकूम हे ३९२ लोकवस्तीचे गाव. या आदिवासीबहुल गावातील शेतकरी सचिन कपूर हा सुमारे २० वर्षांपासून आपल्या शेतात धानाचे पारंपरिक पद्धतीने पीक घेत होता. त्यामधून त्याला जेमतेम उत्पादन मिळत होते. फायदा होत नव्हता. त्याला शेतीत बदल करून काही नवीन करायचे होते. अशात सचिन कृषी विभागाच्या संपर्कात आला. त्यांनी आपली व्यथा कृषी सहायक निलेश इंगळे यांना सांगितली व त्यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची माहिती देऊन मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सचिनने सदर योजनेसाठी प्रस्ताव दिला व आंबा पीक लागवड करण्याची मंजुरी मिळताच त्यांनी स्वतःच्या खर्चाने मनसर जिल्हा नागपूर येथून दशहरी व केशर या वाणाच्या कलमांची खरेदी केली व उन्हाळ्यात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली ०.५० हेक्टरवर २०० आंब्याच्या झाडाची लागवड केली. उन्हाळ्यात झाडांच्या संरक्षणासाठी झाडाच्या सभोवती हिरव्या नेटचा उपयोग केल्यामुळे सघन पद्धतीने लावलेली झाडे सुरक्षित असून वाढीला लागले आहेत. या फळबागेची उपविभागीय कृषी अधिकारी यांनी पाहणी करून योग्य मार्गदर्शन केले व सचिनचा उत्साह वाढविला. यावेळी कृषी सहायक श्रीकांत ठवरे यांनी सांगितले की आंबा उत्पादनाला दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे.

बॉक्स

नव्या तंत्राचे वैशिष्ट्य

-सघन पद्धतीने १२ बाय ४ फुटच्या खड्ड्यात अंतरावर लागवड केल्या जाते. -

-झाडाची उंची १० फुटापर्यंत वाढते.

-कमी उंची असल्याने वादळ वाऱ्याने झाडाचे नुकसान होत नाही.

-एका झाडापासून सरासरी १० ते १५ किलो उत्पादन होते.

कोट

बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेतला पाहिजे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राज्य सरकारने सुरु करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. यासाठी सचिन कपूरने घेतलेला पुढाकार इतरांना प्रेरणादायी ठरणार आहे.

-श्रीधर चव्हाण,तालुका कृषी अधिकारी,बल्लारपूर.

150721\ambaa.jpg

आंब्याच्या लागवडीची माहिती देताना अधिकारी