शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आंब्याची लागवड आता नव्या तंत्राने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:20 IST

बल्लारपूर तालुक्यात पहिला प्रयोग : पारंपरिक पिकांना फाटा मंगल जीवने बल्लारपूर : निसर्गाचा लहरीपणा व तालुक्यात सिंचनाचा अभाव आणि ...

बल्लारपूर तालुक्यात पहिला प्रयोग : पारंपरिक पिकांना फाटा

मंगल जीवने

बल्लारपूर : निसर्गाचा लहरीपणा व तालुक्यात सिंचनाचा अभाव आणि बदलत्या परिस्थितीमुळे मजुरीचे नियोजन या बाबींना अनुसरून शेतीचे व्यवस्थापन ही एक गुंतागुंतीची बाब बनली आहे. पीक हाती येईपर्यंत शेतकऱ्यांचा जीव टांगणीला असतो. यंदा मात्र बल्लारपूर तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना संजीवनी देण्याचे काम केले आहे. नव्या तंत्राने फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंब्याची लागवड करून कृषी विभागाने शेतकऱ्यांचा उत्साह वाढविला आहे. तालुक्यातील हा पहिला प्रयोग इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरणारा आहे.

बल्लारपूर तालुक्यातील २८ किलोमीटरवर असलेले मोहाडी तुकूम हे ३९२ लोकवस्तीचे गाव. या आदिवासीबहुल गावातील शेतकरी सचिन कपूर हा सुमारे २० वर्षांपासून आपल्या शेतात धानाचे पारंपरिक पद्धतीने पीक घेत होता. त्यामधून त्याला जेमतेम उत्पादन मिळत होते. फायदा होत नव्हता. त्याला शेतीत बदल करून काही नवीन करायचे होते. अशात सचिन कृषी विभागाच्या संपर्कात आला. त्यांनी आपली व्यथा कृषी सहायक निलेश इंगळे यांना सांगितली व त्यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची माहिती देऊन मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सचिनने सदर योजनेसाठी प्रस्ताव दिला व आंबा पीक लागवड करण्याची मंजुरी मिळताच त्यांनी स्वतःच्या खर्चाने मनसर जिल्हा नागपूर येथून दशहरी व केशर या वाणाच्या कलमांची खरेदी केली व उन्हाळ्यात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली ०.५० हेक्टरवर २०० आंब्याच्या झाडाची लागवड केली. उन्हाळ्यात झाडांच्या संरक्षणासाठी झाडाच्या सभोवती हिरव्या नेटचा उपयोग केल्यामुळे सघन पद्धतीने लावलेली झाडे सुरक्षित असून वाढीला लागले आहेत. या फळबागेची उपविभागीय कृषी अधिकारी यांनी पाहणी करून योग्य मार्गदर्शन केले व सचिनचा उत्साह वाढविला. यावेळी कृषी सहायक श्रीकांत ठवरे यांनी सांगितले की आंबा उत्पादनाला दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे.

बॉक्स

नव्या तंत्राचे वैशिष्ट्य

-सघन पद्धतीने १२ बाय ४ फुटच्या खड्ड्यात अंतरावर लागवड केल्या जाते. -

-झाडाची उंची १० फुटापर्यंत वाढते.

-कमी उंची असल्याने वादळ वाऱ्याने झाडाचे नुकसान होत नाही.

-एका झाडापासून सरासरी १० ते १५ किलो उत्पादन होते.

कोट

बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेतला पाहिजे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राज्य सरकारने सुरु करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. यासाठी सचिन कपूरने घेतलेला पुढाकार इतरांना प्रेरणादायी ठरणार आहे.

-श्रीधर चव्हाण,तालुका कृषी अधिकारी,बल्लारपूर.

150721\ambaa.jpg

आंब्याच्या लागवडीची माहिती देताना अधिकारी