शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

आंब्याची लागवड आता नव्या तंत्राने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:20 IST

बल्लारपूर तालुक्यात पहिला प्रयोग : पारंपरिक पिकांना फाटा मंगल जीवने बल्लारपूर : निसर्गाचा लहरीपणा व तालुक्यात सिंचनाचा अभाव आणि ...

बल्लारपूर तालुक्यात पहिला प्रयोग : पारंपरिक पिकांना फाटा

मंगल जीवने

बल्लारपूर : निसर्गाचा लहरीपणा व तालुक्यात सिंचनाचा अभाव आणि बदलत्या परिस्थितीमुळे मजुरीचे नियोजन या बाबींना अनुसरून शेतीचे व्यवस्थापन ही एक गुंतागुंतीची बाब बनली आहे. पीक हाती येईपर्यंत शेतकऱ्यांचा जीव टांगणीला असतो. यंदा मात्र बल्लारपूर तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना संजीवनी देण्याचे काम केले आहे. नव्या तंत्राने फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंब्याची लागवड करून कृषी विभागाने शेतकऱ्यांचा उत्साह वाढविला आहे. तालुक्यातील हा पहिला प्रयोग इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरणारा आहे.

बल्लारपूर तालुक्यातील २८ किलोमीटरवर असलेले मोहाडी तुकूम हे ३९२ लोकवस्तीचे गाव. या आदिवासीबहुल गावातील शेतकरी सचिन कपूर हा सुमारे २० वर्षांपासून आपल्या शेतात धानाचे पारंपरिक पद्धतीने पीक घेत होता. त्यामधून त्याला जेमतेम उत्पादन मिळत होते. फायदा होत नव्हता. त्याला शेतीत बदल करून काही नवीन करायचे होते. अशात सचिन कृषी विभागाच्या संपर्कात आला. त्यांनी आपली व्यथा कृषी सहायक निलेश इंगळे यांना सांगितली व त्यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची माहिती देऊन मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सचिनने सदर योजनेसाठी प्रस्ताव दिला व आंबा पीक लागवड करण्याची मंजुरी मिळताच त्यांनी स्वतःच्या खर्चाने मनसर जिल्हा नागपूर येथून दशहरी व केशर या वाणाच्या कलमांची खरेदी केली व उन्हाळ्यात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली ०.५० हेक्टरवर २०० आंब्याच्या झाडाची लागवड केली. उन्हाळ्यात झाडांच्या संरक्षणासाठी झाडाच्या सभोवती हिरव्या नेटचा उपयोग केल्यामुळे सघन पद्धतीने लावलेली झाडे सुरक्षित असून वाढीला लागले आहेत. या फळबागेची उपविभागीय कृषी अधिकारी यांनी पाहणी करून योग्य मार्गदर्शन केले व सचिनचा उत्साह वाढविला. यावेळी कृषी सहायक श्रीकांत ठवरे यांनी सांगितले की आंबा उत्पादनाला दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे.

बॉक्स

नव्या तंत्राचे वैशिष्ट्य

-सघन पद्धतीने १२ बाय ४ फुटच्या खड्ड्यात अंतरावर लागवड केल्या जाते. -

-झाडाची उंची १० फुटापर्यंत वाढते.

-कमी उंची असल्याने वादळ वाऱ्याने झाडाचे नुकसान होत नाही.

-एका झाडापासून सरासरी १० ते १५ किलो उत्पादन होते.

कोट

बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेतला पाहिजे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राज्य सरकारने सुरु करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. यासाठी सचिन कपूरने घेतलेला पुढाकार इतरांना प्रेरणादायी ठरणार आहे.

-श्रीधर चव्हाण,तालुका कृषी अधिकारी,बल्लारपूर.

150721\ambaa.jpg

आंब्याच्या लागवडीची माहिती देताना अधिकारी