शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

व्यवस्थापन बदलले तरी कामगार कायम राहणार

By admin | Updated: July 17, 2016 00:33 IST

बल्लारपूर पेपरमिल जिल्ह्याची आर्थिक वाहिनी आहे. १९५२ सालापासून हा उद्योग थॉपर उद्योगसमूह चालवित होता.

नरेश पुगलिया : जुलै अखेर कामगारांना सुपर बोनस मिळणारबल्लारपूर : बल्लारपूर पेपरमिल जिल्ह्याची आर्थिक वाहिनी आहे. १९५२ सालापासून हा उद्योग थॉपर उद्योगसमूह चालवित होता. परंतु या उद्योगाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्यामुळे कामगारांचे वेतन थकले आहे. चालू जुलै महिन्याअखेर कार्यरत कामगारांना सुपर बोनसचे वितरण करण्यात येणार असून पेपर मिलचे व्यवस्थापन बदलले तरी कार्यरत कामगार कायम राहतील, असे आश्वासन बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी पेपर मिलच्या द्वारसभेत शनिवारला कामगारांना दिले.बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेच्या वतीने मजदूर कार्यालयासमोरील प्रांगणात कामगारांचे प्रश्न सोडविण्याच्या अनुषंगाने द्वारसभा शनिवारी पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष घनशाम मुलचंदानी, चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष गजानन गावंडे, मजदूर महासंघाचे सचिव वसंत मांढरे, कार्याध्यक्ष तारासिंग कलसी, अशोक नागापुरे, प्रवीण पडवेकर, न.प. गटनेते देवेंद्र आर्य, रामदास वाग्धरकर यांच्यासह मजदूर सभेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पुगलिया म्हणाले, बल्लारपूर पेपर मिलला २००४ ते २०१४ पर्यंत कच्चा माल म्हणून बांबू पुरवठ्याचा करार तत्कालीन राज्य शासनाशी करण्यात आला होता. मात्र तो करार संपुष्टात आल्यानंतर विद्यमान राज्य सरकारने कच्चा माल पुरवठ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. परिणामी पेपर मिल उद्योगाचे उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर येऊन ठेपले आहे. आज पेपर मिलवर १६ हजार कोटींचे कर्ज थकीत असल्यामुळे कामगारांच्या वेतनावर परिणाम झाला आहे. या उद्योगात एक ते सात मशिनच्या माध्यमातून लाखो टन कागदाची निर्मिती केली जाते. उत्पादित केलेला माल विकला जातो. परंतु कर्ज घेतल्यामुळे बँक परस्पर कर्जाची रक्कम कपात करीत असल्याने नाईलाजास्तव कामगारांना दोन ते तीन महिने वेतनासाठी वाट पाहावी लागत आहे. त्यावर व्यवस्थापनाशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी कामगारांना दिले असून सुपर बोनस या महिन्यात देण्यासाठी व्यवस्थापनाला भाग पाडू, असेही पुगलिया म्हणाले.सभेचे संचालन वसंत मांढरे यांनी केले तर आभार तारासिंग कलसी यांनी मानले. यावेळी या सभेला कामगारांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)