शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

मामा तलावांचे ग्रहण सुटणार

By admin | Updated: February 29, 2016 00:32 IST

मामा तलावांना शेतकऱ्यांचे सुरक्षित सिंचन म्हटले जाते. मात्र मागील काही वर्षात या मामा तलावांची अवस्थाही वाईट झाली आहे.

गाळाचा उपसाही सुरू : जलयुक्त शिवारमध्ये तलावांच्या दुरुस्त्याचंद्रपूर : मामा तलावांना शेतकऱ्यांचे सुरक्षित सिंचन म्हटले जाते. मात्र मागील काही वर्षात या मामा तलावांची अवस्थाही वाईट झाली आहे. वर्षानुवर्षापासून साठलेल्या गाळाचा उपसा नाही, फुटलेल्या तलावांची दुरुस्ती नाही. यामुळे जिल्ह्यातील १६७८ मामा तलावांपैकी ७० टक्के तलावांची साठवण क्षमता अत्यंत कमी होऊन धोक्यात आली आहे. तलावांच्या देखभाल व दुरुस्तीकरिता ज्या मापदंडानुसार निधी दिला जातो, तो अतिशय तोकडा होता. मात्र आता अर्थमंत्र्यांनी या निधीत वाढ करण्याची घोषणा केली असून जलयुक्त शिवार योजनेत व मनरेगामध्ये मोठ्या प्रमाणात मामा तलावांच्या दुरुस्त्या व गाळ काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुढील काळात मामा तलावांची साठवणूक क्षमता वाढण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांची अवस्था सध्या अतिशय नाजूक झाली आहे. निसर्गाचा कोप तर त्याच्या पाचवीलाच पूजला आहे. एवढे कमी आहे की काय, म्हणून अलिकडे शासनही शेतकऱ्यांवर कोपत असल्याचे दिसून येत आहे. काबाडकष्ट करून देशाचे उदर भरणारा शेतकरीच उदरनिर्वाहापासून वंचित होऊ लागला आहे. खरीप हंगाम तोंडावर आला की बियाणे, खतांची टंचाई होऊ देणार नाही, मुबलक प्रमाणात ते उपलब्ध करू, असे शासन व कृषी विभाग सांगत असला तरी प्रत्यक्षात हंगामात चित्र वेगळे असते. प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षितपणाला सामोरे जात शेतकरी कसेबसे बियाणे व खतांची जुळवाजुळव करतो. यासाठी त्याला कृषी केंद्रातील लिंकिंगचाही भुर्दंड पेलावा लागतो. हे झाल्यानंतर पुढे पिकांवरील रोगराई व महागडी कीटकनाशके त्याचे कंबरडे मोडून टाकते. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करून तो हंगाम सावरत असतानाच सिंचनाचा प्रश्न उभा ठाकतो.शेतकऱ्यांसाठी सिंचनाला मोठे महत्त्व आहे. मात्र सध्या सिंचनाचीच समस्या सर्वाधिक गंभीर होत चालली आहे. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत जाऊन आत्महत्येसारखा दुबळा मार्ग नाईलाजाने अवलंबत आहे. सिंचनासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचे मोठमोठे प्रकल्प उभारले आहे. काही प्रकल्प प्रस्तावित असून काही रखङलेले आहेत. असे असले तरी मामा तलावांचे सिंचनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १६७८ मामा तलाव आहेत. यातील ७० टक्के मामा तलावांची दुरुस्ती रखडली होती. वर्षानुवर्ष बुडित क्षेत्रात गाळ साठत आल्यामुळे सर्व तलावांची साठवण क्षमता अत्यंत कमी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ओरड आहे.विशेष म्हणजे, मामा तलाव हे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. या तलावांची सातत्याने काळजी घेणे आवश्यक आहे. हे तलाव क्षतिग्रस्त झाल्याचे सिंचाई विभागालाही माहीत आहे. मात्र तलाव दुरुस्तीसाठी यापूर्वी शासनाकडून व्यापक निधीच येत नव्हता. मात्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मामा तलावांच्या दुरूस्तीसाठी असलेल्या निधीत वाढ करण्याची घोषणा केली. त्यामुळे आता तलावांच्या दुरूस्तीला वाढीव निधी मिळणार आहे. याशिवाय जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेची कामेही धडाक्यात सुरू आहे. या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात तलाव दुरूस्ती व गाळ उपसण्याची कामे सुरू असल्याची माहिती आहे. यासोबतच मनरेगाच्या कामांमध्येही तलाव दुरुस्ती व गाळ उपस्याचे कामे घेण्यात आली आहे. एकट्या नागभीड तालुक्यात २८३ तलावांमधील गाळ उपसण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात या तलावांची स्थिती सुधारून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (शहर प्रतिनिधी)जिल्ह्यात १९६३ शेततळ्यांचे उद्दिष्टयंदा पाणी टंचाईची शक्यताचमामा तलावांच्या दुरुस्त्या होत असल्या तरी यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प कोरडे पडत चालले आहे. पाण्याची पातळी खालावल्याने या उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार, हे निश्चित मानले जात आहे.यावर्षी शासनाने शेततळ्यांचेही उद्दिष्ट वाढविले आहे. शासनाने १७ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयान्वये मागेल त्याला शेततळे ही योजना जाहीर केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यात १९६३ शेततळ्यांचे लक्ष्यांक देण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर ०.६० हेक्टर व त्यापेक्षा जास्त जमीन आहे, ते या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदानही देण्यात येणार आहे.