शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
3
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
4
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
5
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
6
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
7
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
8
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
9
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
10
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
11
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
12
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
13
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
14
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
15
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
16
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
17
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
18
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
19
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
20
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
Daily Top 2Weekly Top 5

मामा तलावांचे ग्रहण सुटणार

By admin | Updated: February 29, 2016 00:32 IST

मामा तलावांना शेतकऱ्यांचे सुरक्षित सिंचन म्हटले जाते. मात्र मागील काही वर्षात या मामा तलावांची अवस्थाही वाईट झाली आहे.

गाळाचा उपसाही सुरू : जलयुक्त शिवारमध्ये तलावांच्या दुरुस्त्याचंद्रपूर : मामा तलावांना शेतकऱ्यांचे सुरक्षित सिंचन म्हटले जाते. मात्र मागील काही वर्षात या मामा तलावांची अवस्थाही वाईट झाली आहे. वर्षानुवर्षापासून साठलेल्या गाळाचा उपसा नाही, फुटलेल्या तलावांची दुरुस्ती नाही. यामुळे जिल्ह्यातील १६७८ मामा तलावांपैकी ७० टक्के तलावांची साठवण क्षमता अत्यंत कमी होऊन धोक्यात आली आहे. तलावांच्या देखभाल व दुरुस्तीकरिता ज्या मापदंडानुसार निधी दिला जातो, तो अतिशय तोकडा होता. मात्र आता अर्थमंत्र्यांनी या निधीत वाढ करण्याची घोषणा केली असून जलयुक्त शिवार योजनेत व मनरेगामध्ये मोठ्या प्रमाणात मामा तलावांच्या दुरुस्त्या व गाळ काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुढील काळात मामा तलावांची साठवणूक क्षमता वाढण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांची अवस्था सध्या अतिशय नाजूक झाली आहे. निसर्गाचा कोप तर त्याच्या पाचवीलाच पूजला आहे. एवढे कमी आहे की काय, म्हणून अलिकडे शासनही शेतकऱ्यांवर कोपत असल्याचे दिसून येत आहे. काबाडकष्ट करून देशाचे उदर भरणारा शेतकरीच उदरनिर्वाहापासून वंचित होऊ लागला आहे. खरीप हंगाम तोंडावर आला की बियाणे, खतांची टंचाई होऊ देणार नाही, मुबलक प्रमाणात ते उपलब्ध करू, असे शासन व कृषी विभाग सांगत असला तरी प्रत्यक्षात हंगामात चित्र वेगळे असते. प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षितपणाला सामोरे जात शेतकरी कसेबसे बियाणे व खतांची जुळवाजुळव करतो. यासाठी त्याला कृषी केंद्रातील लिंकिंगचाही भुर्दंड पेलावा लागतो. हे झाल्यानंतर पुढे पिकांवरील रोगराई व महागडी कीटकनाशके त्याचे कंबरडे मोडून टाकते. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करून तो हंगाम सावरत असतानाच सिंचनाचा प्रश्न उभा ठाकतो.शेतकऱ्यांसाठी सिंचनाला मोठे महत्त्व आहे. मात्र सध्या सिंचनाचीच समस्या सर्वाधिक गंभीर होत चालली आहे. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत जाऊन आत्महत्येसारखा दुबळा मार्ग नाईलाजाने अवलंबत आहे. सिंचनासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचे मोठमोठे प्रकल्प उभारले आहे. काही प्रकल्प प्रस्तावित असून काही रखङलेले आहेत. असे असले तरी मामा तलावांचे सिंचनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १६७८ मामा तलाव आहेत. यातील ७० टक्के मामा तलावांची दुरुस्ती रखडली होती. वर्षानुवर्ष बुडित क्षेत्रात गाळ साठत आल्यामुळे सर्व तलावांची साठवण क्षमता अत्यंत कमी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ओरड आहे.विशेष म्हणजे, मामा तलाव हे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. या तलावांची सातत्याने काळजी घेणे आवश्यक आहे. हे तलाव क्षतिग्रस्त झाल्याचे सिंचाई विभागालाही माहीत आहे. मात्र तलाव दुरुस्तीसाठी यापूर्वी शासनाकडून व्यापक निधीच येत नव्हता. मात्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मामा तलावांच्या दुरूस्तीसाठी असलेल्या निधीत वाढ करण्याची घोषणा केली. त्यामुळे आता तलावांच्या दुरूस्तीला वाढीव निधी मिळणार आहे. याशिवाय जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेची कामेही धडाक्यात सुरू आहे. या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात तलाव दुरूस्ती व गाळ उपसण्याची कामे सुरू असल्याची माहिती आहे. यासोबतच मनरेगाच्या कामांमध्येही तलाव दुरुस्ती व गाळ उपस्याचे कामे घेण्यात आली आहे. एकट्या नागभीड तालुक्यात २८३ तलावांमधील गाळ उपसण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात या तलावांची स्थिती सुधारून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (शहर प्रतिनिधी)जिल्ह्यात १९६३ शेततळ्यांचे उद्दिष्टयंदा पाणी टंचाईची शक्यताचमामा तलावांच्या दुरुस्त्या होत असल्या तरी यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प कोरडे पडत चालले आहे. पाण्याची पातळी खालावल्याने या उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार, हे निश्चित मानले जात आहे.यावर्षी शासनाने शेततळ्यांचेही उद्दिष्ट वाढविले आहे. शासनाने १७ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयान्वये मागेल त्याला शेततळे ही योजना जाहीर केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यात १९६३ शेततळ्यांचे लक्ष्यांक देण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर ०.६० हेक्टर व त्यापेक्षा जास्त जमीन आहे, ते या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदानही देण्यात येणार आहे.