शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

पाणीपुरवठा योजनेच्या विहीर बांधकामात गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:28 IST

राजुरा : जिवती तालुक्यातील पल्लेझरी येथील खनिज विकास निधीतून बांधण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचे अंदाजपत्रक वगळून बांधकाम करण्यात आले ...

राजुरा : जिवती तालुक्यातील पल्लेझरी येथील खनिज विकास निधीतून बांधण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचे अंदाजपत्रक वगळून बांधकाम करण्यात आले आहे. या कामात गैरव्यवहार झाला असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या जीवती तालुका संघटिका सिंधू परमेश्वर जाधव यांनी राज्याचे पाणीपुरवठ मंत्री व चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

सन २०१८-१९ या वर्षीच्या खनिज विकास निधीतून पल्लेझरी येथे पाणीपुरवठा योजनेसाठी विहीर मंजूर करण्यात आली होती. यासाठी २७ लाख ९९ हजार ६६७ रुपये एवढी रक्कम मंजूर झाली होती. या गावात पूर्वी पाणीपुरवठ्यासाठी एक विहीर होती; परंतु त्या विहिरीतील पाणी पिल्याने गावात मोठ्या प्रमाणात आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी या विहिरीतील पाण्याची तपासणी केली असता, यात मोठ्या प्रमाणात फ्लोराइडचे प्रमाण मिळाले. शेवटी ही विहीर पाणी पिण्यास अयोग्य घोषित करून येथील पाणी वापरणे बंद करण्यात आले.

यानंतर खनिज विकास निधीतून नवीन विहीर बांधकामासाठी २८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानुसार कार्यादेश देण्यात आला. मात्र, संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांनी संगनमत करून जुन्या फ्लोराइड असलेल्या विहिरीचा गाळ काढून आणि थोडे खोदून त्याच विहिरीचे अर्धवट राहिलेले बांधकाम केले. जुन्या विहिरीचे पाणी फ्लोराइडयुक्त असल्याने नवीन विहिरीची मागणी मंजूर होऊनही अधिकारी व कंत्राटदार यांनी संगनमताने जुन्याच विहिरीचा गाळ काढून तिला बांधकाम केल्याचा मुलामा दिला. वास्तविक खनिज विकास निधीतून नवीन जागेवर गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर बांधणे अपेक्षित होते; परंतु जुन्याच सदोष पाणी असलेल्या विहिरीची डागडुजी करण्यात आली आणि जनतेची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या जीवती तालुका संघटिका सिंधू जाधव आणि पल्लेझरी येथील ग्रामस्थांनी राज्याचे पाणीपुरवठामंत्री आणि चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.