शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

पाणी बचतीची सुरूवात स्वत:पासून करा

By admin | Updated: March 17, 2016 01:00 IST

पाण्याचा अपव्यय टाळणे, हिच पाणी बचत असून प्रत्येकाने आपल्यापासून पाणी बचतीस सुरुवात केल्यास भविष्यातील पाणी संकट टाळता येईल,...

संध्या गुरुनुले : जल सप्ताहाचा शुभारंभ, पाच नद्यांवर जलपूजनचंद्रपूर : पाण्याचा अपव्यय टाळणे, हिच पाणी बचत असून प्रत्येकाने आपल्यापासून पाणी बचतीस सुरुवात केल्यास भविष्यातील पाणी संकट टाळता येईल, असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी केले. जलसंपदा व पाटबंधारे विभागाच्या वतीने दाताळा पुलाजवळील इरई नदीच्या काठी आयोजित जल सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अधीक्षक अभियंता जी. मो. शेख, नगरसेवक संजय वैद्य व अंजली घोटेकर उपस्थित होत्या. विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या वैनगंगा, पैनगंगा, इरई, झरपट व वर्धा नदीतील पाण्याच्या कलशाचे पूजन करुन जिल्हाधिकारी व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जल सप्ताहाचे उद्घाटन झाले. कमी होत चाललेला पावसाळा व घटत चाललेली भूगर्भातील पाण्याची पातळी पाहता भविष्यात गंभीर जल संकट निर्माण होऊ शकते, असे सांगत जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणाल्या, घरगुती वापरापासून पाण्याची बचत केल्यास भविष्यात भासणाऱ्या पाणी संकटावर मात करण्याची सुरुवात ठरु शकते. जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व शाळांमध्ये पाणी बचतीचे महत्त्व पटवून देणारे कार्यक्रम सप्ताहात घेण्यात येणार आहेत, असे सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सातत्याने पाणी उपसा होत असल्याने भूगर्भातील पाणी पातळी कमी होत आहे. याचा परिणाम पर्जन्यमानावर झाला असून त्याचे परिणाम मराठवाड्यातील पाणी टंचाईवरुन दिसून येते. सुदैवाने आपल्या जिल्ह्यात मराठवाड्यासारखी स्थिती नसली तरी वेळीच उपाययोजना न केल्यास ही परिस्थिती केव्हाही येऊ शकते, ही बाब लक्षात घेता पाणी बचत अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्रास्ताविक अधिक्षक अभियंता जी.मो. शेख यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या जल जागृती पोस्टरचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी) शाळांमध्ये जनजागृतीनागरिकांनी छोट्या छोटया प्रयत्नातून पाणी बचत केल्यास पाणी वाचवा ही संकल्पना पूर्णत्वास जाऊ शकते असे डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले. जिल्हा परिषदेतर्फे शाळांमध्ये पाणी वाचवा या विषयी जागृती करण्याचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे १७ शाळांमध्ये पाण्याचे महत्त्व पटवून देणारे विविध कार्यक्रम, व्याख्यान, स्पर्धा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.