शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
3
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
4
किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
5
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
6
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
7
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
8
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
9
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
10
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
11
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
12
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
13
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
14
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
15
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
16
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
17
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या
18
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
19
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
20
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप

मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा

By admin | Updated: January 1, 2015 22:59 IST

मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

नागभीड : मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत सदर योजना काटेकोरपणे राबविण्यासाठी सन २०११-१२ मध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदभरती करताना एमआयएस समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक, सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रीक अधिकारी, लिपीक कम डाटा एन्ट्री आॅपरेटर, लेखापाल अशी पदनिहाय भरती करण्यात आली. सदर भरती ही जिल्हा सेतू व राज्य निधी असोशिएशनमार्फत करण्यात आली. महाराष्ट्रात जवळपास तीन हजार ५०० कंत्राटी कर्मचारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम पाहात आहेत. सन २०११-१२ पासून रोजगार हमी योजनेचे स्वरूप व्यापक झाले असून मोठ्या प्रमाणात मजुरांना कामे उपलब्ध झाली. त्यांच्या मजुरीतसुद्धा वाढ झाली आहे. तसेच इतर भागात मजुरांचे होणारे स्थलांतर थांबले; परंतु मजुरांना कामे उपलब्ध करुन देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना तुटपुंजे मानधन देण्यात येत असून त्यामुळे त्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. मात्र याकडे शासन मागील चार वर्षांपासून दुर्लक्ष करीत आहे. शासकीय परिपत्रकानुसार मंग्रारोहयोअंतर्गत कर्मचाऱ्यांचा मसुदा तयार करण्यात आला होता. मात्र त्या मसुद्यावर अजुनपर्यंत ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. वारंवार शासनाकडे पाठपुरावा करुनसुद्धा याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष पुरवावे व आयसीडीएसच्या धर्तीवरील योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष जागेश्वर नागोसे, तालुका सचिव वर्षा रामटेके, तालुका उपाध्यक्ष दिवाकर बोरकर, संघटक प्रशांत गजभिये, कोषाध्यक्ष पंकज गरफडे, सहसचिव फाल्गुन नागोसे, परमानंद शिंपी सदस्य, अनिल सिडाम, विवेक जुमनाके, प्रशांत खोब्रागडे, मिथुन कुर्झेकर, अजय गजपुरे यांनी तहसीलदार श्रीराम मुंधडा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. (तालुका प्रतिनिधी)