शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

स्वच्छ भारत अभियान जनचळवळीचे माध्यम बनावे -हंसराज अहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:10 IST

स्वच्छ भारत अभियान हे सामूहिक चळवळीशी जुळणे काळाची गरज असून अशा भूमिकेमधूनच या अभियानाची सफलता शक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासीयान्ाां हाक देताच स्वच्छतेच्या बाबतीत आपण फार मोठी झेप घेतली आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियान हे सामूहिक चळवळीशी जुळणे काळाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वच्छ भारत अभियान हे सामूहिक चळवळीशी जुळणे काळाची गरज असून अशा भूमिकेमधूनच या अभियानाची सफलता शक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासीयान्ाां हाक देताच स्वच्छतेच्या बाबतीत आपण फार मोठी झेप घेतली आहे. असे असले तरी हे अभियान निरंतर प्रक्रियेतून सातत्याने सुरु राहणे व या मोहिमेचे जनचळवळीत रुपांतर करणे, हे प्रत्येक सुज्ञ व्यक्तीची जाबाबदारी व कर्तव्य आहे. केवळ शासकीय पातळीवरुन या अभियानाची यशस्वीता निर्भर नसल्याने लोकांनी एक सामाजिक व राष्टÑापुढील आव्हान समजून स्वच्छतेच्या मोहिमेला वाहून घेत राष्टÑाच्या पर्यायाने लोकांच्या हितासाठी या चळवळीचा धागा बनून कार्य करावे, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.२५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबरपर्यंत राष्टÑीय पातळीवर आयोजित स्वच्छता अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यास संबोधित करताना ते बोलत होते.स्थानिक कोहीनूर क्रीडांगणात चंद्रपूर शहर महानगरपालिका व इको-प्रो या सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी आयोजित स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कोन्हेरी तलाव व या लगतच्या ऐतिहासीक परकोट स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमास महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, इको-प्रोचे बंडू धोतरे, आयुक्त संजय काकडे, उपायुक्त देवळीकर, अधिष्ठाता डॉ. मोरे, डॉ. मंगेश गुलवाडे, मनपा सभापती अनुराधा हजारे, धनंजय हुड, प्रा. रवी जोगी, प्रमोद शास्त्रकार, संजय मिसलवार, राजेंद्र कागदेलवार, राजू घरोटे, अशोक सोनी, श्रीकांत भोयर यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी, इको-प्रोचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.इको-प्रो सारख्या अनेक स्वयंसेवी संस्थानी या कार्यात योगदान देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी ना. हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.