शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

स्वच्छ भारत अभियान जनचळवळीचे माध्यम बनावे -हंसराज अहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:10 IST

स्वच्छ भारत अभियान हे सामूहिक चळवळीशी जुळणे काळाची गरज असून अशा भूमिकेमधूनच या अभियानाची सफलता शक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासीयान्ाां हाक देताच स्वच्छतेच्या बाबतीत आपण फार मोठी झेप घेतली आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियान हे सामूहिक चळवळीशी जुळणे काळाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वच्छ भारत अभियान हे सामूहिक चळवळीशी जुळणे काळाची गरज असून अशा भूमिकेमधूनच या अभियानाची सफलता शक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासीयान्ाां हाक देताच स्वच्छतेच्या बाबतीत आपण फार मोठी झेप घेतली आहे. असे असले तरी हे अभियान निरंतर प्रक्रियेतून सातत्याने सुरु राहणे व या मोहिमेचे जनचळवळीत रुपांतर करणे, हे प्रत्येक सुज्ञ व्यक्तीची जाबाबदारी व कर्तव्य आहे. केवळ शासकीय पातळीवरुन या अभियानाची यशस्वीता निर्भर नसल्याने लोकांनी एक सामाजिक व राष्टÑापुढील आव्हान समजून स्वच्छतेच्या मोहिमेला वाहून घेत राष्टÑाच्या पर्यायाने लोकांच्या हितासाठी या चळवळीचा धागा बनून कार्य करावे, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.२५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबरपर्यंत राष्टÑीय पातळीवर आयोजित स्वच्छता अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यास संबोधित करताना ते बोलत होते.स्थानिक कोहीनूर क्रीडांगणात चंद्रपूर शहर महानगरपालिका व इको-प्रो या सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी आयोजित स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कोन्हेरी तलाव व या लगतच्या ऐतिहासीक परकोट स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमास महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, इको-प्रोचे बंडू धोतरे, आयुक्त संजय काकडे, उपायुक्त देवळीकर, अधिष्ठाता डॉ. मोरे, डॉ. मंगेश गुलवाडे, मनपा सभापती अनुराधा हजारे, धनंजय हुड, प्रा. रवी जोगी, प्रमोद शास्त्रकार, संजय मिसलवार, राजेंद्र कागदेलवार, राजू घरोटे, अशोक सोनी, श्रीकांत भोयर यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी, इको-प्रोचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.इको-प्रो सारख्या अनेक स्वयंसेवी संस्थानी या कार्यात योगदान देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी ना. हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.