शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: August 12, 2014 23:39 IST

जिल्ह्यात पावसाळयाची सुरुवात झाल्यापासून कुठेही पर्जन्यमान न झाल्याने शेतकऱ्यांचे बेहाल झाले आहे. शेतकऱ्यांची पीके करपून गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुख्यमंत्र्यांकडे मागणी : सुभाष धोटेचंद्रपूर : जिल्ह्यात पावसाळयाची सुरुवात झाल्यापासून कुठेही पर्जन्यमान न झाल्याने शेतकऱ्यांचे बेहाल झाले आहे. शेतकऱ्यांची पीके करपून गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता कमी झाली आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर उभे झाले आहे. शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ उद्भवलेली आहे. दुबार तिबार पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे बी- बियाणे नाहीत यासाठी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, मोफत बी-बियाणे उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांना असलेले कर्ज माफझ करावे यासाठी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी केली आहे. सन २०१३ मध्ये संततधार पाऊस व महापुरामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान विस्कळीत झाले होते. त्यामध्ये खरीपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली. काही शेतकऱ्यांना अद्यापी शासनाची मदत सुद्धा मिळालेली नाही. अश्यातच जगाचा पोशिंंदा असलेल्या शेतकऱ्यांवर पावसाअभावी दुबार, तिबार पेरणीची वेळ उद्भवली आहे. यात ज्वारी, कापूस, सोयाबीन, भात, इत्यादी हातच्या पीकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले व संपूर्ण पीके हातून गेल्यात जमा आहेत. निसर्ग कोपला आहे. शेतकऱ्यांचे हाल केले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले. खरीप पीक करपून गेले. त्यामुळे शेतकरी पूर्णत: कोलमडून गेला आहे. महागाईने होरपळलेल्या, कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या गरीब शेतकऱ्यांचे पावसाअभावी कंबरडेच मोडले आहे. अशा वेळी पावसाअभावी नुकसान झालेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मदत व पुनर्वसन कार्यमंत्री डॉ. पतंगराव कदम यांना निवेदन देवून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत, बँकेचे कर्जमाफ व मोफत बी-बियाणे देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. (नगर प्रतिनिधी)