शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य शेतमालकाला सातबारावरुन केले बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:06 IST

शेतकºयांना त्यांच्या शेतीची मालकी ही महसूल विभागाकडून मिळणाºया सातबारावरुन ठरत असते. त्यामुळे शेती व स्थावर मालमत्तेसाठी सातबारा हा महत्वाचा दस्ताऐवज समजला जातो.

ठळक मुद्दे सातबारावर केली खोटी नोंद : मृत्यपत्राला दिली बगल

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : शेतकºयांना त्यांच्या शेतीची मालकी ही महसूल विभागाकडून मिळणाºया सातबारावरुन ठरत असते. त्यामुळे शेती व स्थावर मालमत्तेसाठी सातबारा हा महत्वाचा दस्ताऐवज समजला जातो. मात्र चिमूर तालुक्यातील विहीरगाव साजा क्रमांक ३७ येथील भूमापन क्रमांक २१८ मधील ०.४७ हे. आर. व ०.५३ हेक्टर आर जमिनीचे मालक नांगीबाई पुंडलिक मेश्राम यांच्या नावाने वडीलोपार्जीत शेती होती. मात्र महसूल विभागातील खातोडा (वडसी) येथील तलाठी व मंडळ अधिकाºयांनी सातबारामध्ये हेराफेरी करुन मुख्य शेतमालक नांगीबाई मेश्राम यांचे त्यांच्या सातबारावरील नाव खोडून मालमत्तेमधून बेदखल केल्याचा प्रकार पत्रकार परिषेदतून शिवसेना नेते विलास डांगे व वारसदार शिवशंकर बळीराम मेश्राम, सुनील हरिदास मेश्राम रा. खातोडा यांनी उघडकीस आणला आहे.चिमूर तहसील अंतर्गत येणाºया खातोडा (वडसी) येथील नांगीबाई पुंडलिक मेश्राम यांच्या मालकीची भूमापन क्रमांक २१८, साजा क्रमांक ३७ मध्ये साडेचार एकर जमीन होती. मात्र त्यांना मुलबाळ किंवा वारस नसल्याने त्यांनी त्यांचा नातू मसाराम विश्नुदास मेश्राम व पुतणे हरिदास बळीराम मेश्राम यांच्या नावाने स्थावर मालमत्तेचे मृत्यूपत्र करुन ती शेती या दोघांच्या नावाने करुन दिली. त्यामध्ये या दोघांच्या वाटणीला सव्वा दोन एकर जमीन आली. काही कालावधीनंतर नांगीबाई यांचा मृत्यू झाला. हे दोघेही आपसी वाटणीतून शेती करीत होते. मात्र अचानक २०१६ ला या सातबाºयावर खातोडा येथील तलाठी व मंडळ निरीक्षक यांनी मुख्य शेतजमिनीचे मालक नांगीबाई यांचे नाव सातबारावरुन कमी करुन या सातबाºयावर प्रमोद उगस्तरी मेश्राम व दिगांबर उगस्तरी मेश्राम यांची नोंद करुन मुख्य मालकालाच त्यांच्या स्थावर मालकीवरुन बेदखल केले, असा आरोप शिवशंकर मेश्राम व सुनिल मेश्राम यांनी केला आहे.याबाबत सुनील मेश्राम यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली. त्यात भूमापन क्रमांक ९१, १४८, व २०३ च्या सातबाराच्या अभिलेखागारात फेरफार पंजीची पाहणी केली असता या भूमापन क्रमांकात कुठल्याही प्रकारची फेरफार केली नसल्याची माहिती माहिती अधिकारी तथा नायब तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी ३१ आॅगस्ट २०१६ च्या पत्रातून दिली आहे. महसूल विभागात फेरफारची नोंद नसताना या सातबारामध्ये फेरफार कुणी केली व मुख्य मालकाला स्थावर मालमत्तेतून बेदखल कुणी केले, असा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन फेरफार करणाºया दोषी अधिकारी, कर्मचाºयांवर कारवाई करुन फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी शिवसेना नेते विलास डांगे व अन्यायग्रस्त शेतकरी शिवशंकर मेश्राम, सुनील मेश्राम यांनी पत्रकार परिषदेतनू केली आहे.नुकसान भरपाईपासूनही वंचितमुख्य सातबारामध्ये नाव कमी करुन प्रमोद उगस्तरी मेश्राम व दिगांबर उगस्तरी मेश्राम यांच्या नावाने सातबारा असल्याने शासनाची नुकसान भरपाई त्यांना मिळते व मुख्य हक्कदार वंचित राहत आहेत. याच सातबारावर बँक आॅफ इंडिया शाखा नेरी येथून ९० हजार कर्ज घेतले आहे.