शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

मुख्य शेतमालकाला सातबारावरुन केले बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:06 IST

शेतकºयांना त्यांच्या शेतीची मालकी ही महसूल विभागाकडून मिळणाºया सातबारावरुन ठरत असते. त्यामुळे शेती व स्थावर मालमत्तेसाठी सातबारा हा महत्वाचा दस्ताऐवज समजला जातो.

ठळक मुद्दे सातबारावर केली खोटी नोंद : मृत्यपत्राला दिली बगल

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : शेतकºयांना त्यांच्या शेतीची मालकी ही महसूल विभागाकडून मिळणाºया सातबारावरुन ठरत असते. त्यामुळे शेती व स्थावर मालमत्तेसाठी सातबारा हा महत्वाचा दस्ताऐवज समजला जातो. मात्र चिमूर तालुक्यातील विहीरगाव साजा क्रमांक ३७ येथील भूमापन क्रमांक २१८ मधील ०.४७ हे. आर. व ०.५३ हेक्टर आर जमिनीचे मालक नांगीबाई पुंडलिक मेश्राम यांच्या नावाने वडीलोपार्जीत शेती होती. मात्र महसूल विभागातील खातोडा (वडसी) येथील तलाठी व मंडळ अधिकाºयांनी सातबारामध्ये हेराफेरी करुन मुख्य शेतमालक नांगीबाई मेश्राम यांचे त्यांच्या सातबारावरील नाव खोडून मालमत्तेमधून बेदखल केल्याचा प्रकार पत्रकार परिषेदतून शिवसेना नेते विलास डांगे व वारसदार शिवशंकर बळीराम मेश्राम, सुनील हरिदास मेश्राम रा. खातोडा यांनी उघडकीस आणला आहे.चिमूर तहसील अंतर्गत येणाºया खातोडा (वडसी) येथील नांगीबाई पुंडलिक मेश्राम यांच्या मालकीची भूमापन क्रमांक २१८, साजा क्रमांक ३७ मध्ये साडेचार एकर जमीन होती. मात्र त्यांना मुलबाळ किंवा वारस नसल्याने त्यांनी त्यांचा नातू मसाराम विश्नुदास मेश्राम व पुतणे हरिदास बळीराम मेश्राम यांच्या नावाने स्थावर मालमत्तेचे मृत्यूपत्र करुन ती शेती या दोघांच्या नावाने करुन दिली. त्यामध्ये या दोघांच्या वाटणीला सव्वा दोन एकर जमीन आली. काही कालावधीनंतर नांगीबाई यांचा मृत्यू झाला. हे दोघेही आपसी वाटणीतून शेती करीत होते. मात्र अचानक २०१६ ला या सातबाºयावर खातोडा येथील तलाठी व मंडळ निरीक्षक यांनी मुख्य शेतजमिनीचे मालक नांगीबाई यांचे नाव सातबारावरुन कमी करुन या सातबाºयावर प्रमोद उगस्तरी मेश्राम व दिगांबर उगस्तरी मेश्राम यांची नोंद करुन मुख्य मालकालाच त्यांच्या स्थावर मालकीवरुन बेदखल केले, असा आरोप शिवशंकर मेश्राम व सुनिल मेश्राम यांनी केला आहे.याबाबत सुनील मेश्राम यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली. त्यात भूमापन क्रमांक ९१, १४८, व २०३ च्या सातबाराच्या अभिलेखागारात फेरफार पंजीची पाहणी केली असता या भूमापन क्रमांकात कुठल्याही प्रकारची फेरफार केली नसल्याची माहिती माहिती अधिकारी तथा नायब तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी ३१ आॅगस्ट २०१६ च्या पत्रातून दिली आहे. महसूल विभागात फेरफारची नोंद नसताना या सातबारामध्ये फेरफार कुणी केली व मुख्य मालकाला स्थावर मालमत्तेतून बेदखल कुणी केले, असा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन फेरफार करणाºया दोषी अधिकारी, कर्मचाºयांवर कारवाई करुन फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी शिवसेना नेते विलास डांगे व अन्यायग्रस्त शेतकरी शिवशंकर मेश्राम, सुनील मेश्राम यांनी पत्रकार परिषदेतनू केली आहे.नुकसान भरपाईपासूनही वंचितमुख्य सातबारामध्ये नाव कमी करुन प्रमोद उगस्तरी मेश्राम व दिगांबर उगस्तरी मेश्राम यांच्या नावाने सातबारा असल्याने शासनाची नुकसान भरपाई त्यांना मिळते व मुख्य हक्कदार वंचित राहत आहेत. याच सातबारावर बँक आॅफ इंडिया शाखा नेरी येथून ९० हजार कर्ज घेतले आहे.