शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

२८८ वीज ग्राहकांना महावितरणचा दणका

By admin | Updated: December 26, 2016 01:12 IST

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर व गडचिरोली मंडळात खूप मोठ्या प्रमाणात वीज थकबाकी आहे.

वीजपुरवठा खंडीत : थकबाकीदारांविरोधात वीज कापण्याची मोहीम सुरू चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर व गडचिरोली मंडळात खूप मोठ्या प्रमाणात वीज थकबाकी आहे. याचा परिणाम वीज पुरवठ्यावर होत असल्याने चंद्रपूर, गडचिरोली, बल्लारपूर, वरोरा, ब्रम्हपुरी, आलापल्ली या सहाही विभागात थकबाकीदारांची वीज कापण्याची मोहीम वीज कंपनीने सुरू केली आहे. शनिवारच्या मोहीमेत पहिल्याच दिवशी तब्बल २८८ ग्राहकांची वीज कापून थकबाकीदारांना झटका देण्यात आला. त्यामुळे वीज बिलाचा वेळेत भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घरगुती, औद्योगीक व वाणिज्यीक थकबाकीदारांविरोधात वीजपुरवठा ख्ांडीत करण्याची ही धडक मोहीम असून या मोहिमेअंतर्गत एकाच दिवशी २८८ थकबाकीदार ग्राहकांचा १० लाखांच्या थकबाकीसाठी वीजपुरवठा ख्ांडीत करण्यात आला आहे. यात चंद्रपूर विभाातील ५२, बल्लारपूर विभागातील ३४, वरोरा विभागातील ११०, गडचिरोली ४३, आलापल्ली ८१ व ब्रम्हपुरी विभागातील ११ अशा एकंदरीत २८८ ग्राहकांचा समावेश आहे. तसेच ३ हजार ६२८ ग्राहकांकडून थकीत असलेले ४० रूपये थकीत बिलही वसुल करण्यात आले आहे. महावितरणचे वीजबिल आल्या आल्या प्रामाणिकपणे भरणाऱ्या तसेच वीज बिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांची विभागणी गेली आहे. वीजबिलाच्या वसुलीतूनच वसुल झालेल्या महसुलातून वीज खरेदी करणे व ती परत ग्राहकांना पुरविताना महावितरण थकबाकीदारामुळे अडचणीत येत आहे. परिणामी महावितरणला थकबाकीदार ग्राहकांविरोधात ही कारवाई करावी लागली आहे. आगामी काळात ही मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. या मोहिमेअंतगर्तत, बेकायदा वीजपुरवठा वापरणाऱ्या ग्राहकांवरही कठोर कारवाई करण्यात येत आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडीत ग्राहकांसाठी सुरू असलेल्या ‘नवप्रकाष योजनेचा’ कायमस्वरूपी वीजपुरवठा ग्राहकांनी लाभ घ्यावा. जबलाचा वेळेत भरणा करावा, असे आवाहन मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी) २२ कोटी ५६ लाखांची थकबाकी सध्या स्थितीत चंद्रपूर परिमंडळातील सहाही विभागात घरगुती, औद्योगिक व वाणिज्यीक ग्राहकांकडे २२ कोटी ५६ लाखांची थकबाकी आहे. यात चंद्रपूर विभागात ५ कोटी ४८ लाख, वरोरा विभागात ३ कोटी ६३ लाख, बल्लारपूर ५ कोटी ३९ लाख, आलापल्ली २ कोटी ४४ लाख, ब्रम्हपुरी २ कोटी १ लाख व गडचिरोली विभागात ३ कोटी ९ लाख रूपये थकबाकी आहे. ‘ना नफा, ना तोटा’ तत्वावर ग्राहकांपर्यंत वीज पोहोचविणाऱ्या महावितरणला थकबाकीची झळ सोसावी लागत आहे.